शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठ्याला पुन्हा ग्रहण

By admin | Updated: July 9, 2017 00:41 IST

चंद्रपूरच्या पाणी पुरवठ्याबाबत वारंवार ओरड होत आहे. नागरिकांसह नगरसेवकही याबाबत संतप्त आहेत.

नागरिक वैतागले : दोन दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्पलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरच्या पाणी पुरवठ्याबाबत वारंवार ओरड होत आहे. नागरिकांसह नगरसेवकही याबाबत संतप्त आहेत. असे असतानाही पाणी वितरण व्यवस्था अजूनही सुरळीत झालेली नाही. गेल्या दोन दिवसांपासून चंद्रपुरातील अनेक भागात पाणी पुरवठा ठप्प आहे. यामुळे नागरिक वैतागले असून अनेकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दिवसेंदिवस चंद्रपूर शहराचा व्यास वाढत चालला आहे. लोकसंख्याही चार लाखांच्या घरात गेली आहे. चंद्रपुरातील महानगरपालिका अस्तित्वात आल्यामुळे पुढे आणखी शहराच्या सीमा वाढणार आहे. असे असले तरी या शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन ५० ते ६० वर्ष जुनी आहे. आता ती अत्यंत खिळखिळी झाली असून मनपा प्रशासनानेही ती कालबाह्य झाली असल्याचे मान्य केले आहे. मान्य केले असले तरी अद्याप ती बदलविण्यात आलेली नाही. या खिळखिळ्या पाईपलाईनमुळे अनेक वेळा तांत्रिक बिघाड होऊन पाणी पुरवठा ठप्प पडतो. पूर्वी शहराच्या पाणी पुरवठ्याची जबाबदारी नगरपालिकाच सांभाळत होती. त्यामुळे पाणी पुरवठ्याबाबत नागरिक थेट पालिकेकडे तक्रार करीत होते. आणि त्याची वेळीच दखल घेतली जात होती. मात्र अलिकडच्या काळात पाणी पुरवठ्याचे खासगीकरण करण्यात आले. उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीला पाणी पुरवठ्याचे कंत्राट देण्यात आले आहे. खासगीकरण झाल्यानंतरच पाणी पुरवठ्याचे धिंडवडे उडाले. वितरण व्यवस्थाच अस्तित्वात आहे की नाही, असेच वाटायले लागले. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या इरई धरणात बऱ्यापैकी जलसाठा आहे. तरीही पाणी पुरवठा अनियमित असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.मागील दोन दिवसांपासून चंद्रपूर शहरातील काही वॉर्डाचा अपवाद सोडला तर बहुतांश वॉर्डातील पाणी पुरवठा ठप्प आहे. हॉस्पीटल वार्ड, सिव्हील लाईन, रामनगर, जगन्नाथ बाबा नगर, जीवन ज्योती कॉलनी परिसर, नगिना बाग परिसर, पठाणपुरा, विठ्ठल मंदिर वॉर्ड, भानापेठ वॉर्ड, बालाजी वॉर्ड, एकोरी वार्ड, घुटकाळा वॉर्ड, तुकुम परिसरातील वार्ड आदी भागात पाणी पुरवठा खंडित झाला. यातील काही वॉर्डात शुक्रवारी नळ आले नाही, पण शनिवारी आले. तर काही वॉर्डात शुक्रवार आणि शनिवार या दोन्ही दिवशी पाणी पुरवठा ठप्प होता.नळाला पाणी कमीचशहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात सध्या मुबलक पाणीसाठा असला तरी पाणी पुरवठा करताना तो मुबलक केला जात नाही. कुठे एक तास तर कुठे त्याहून कमी पाणी येते. त्यातही धारही मोठी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठे हाल सहन करावे लागत आहे. विशेष म्हणजे, नळ आल्यानंतर प्रारंभी काही वेळ दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी वापरता येत नाही. काही भागात तर केवळ अर्ध्या तासातच नळाची धार गुल होते, अशाही तक्रारी आहेत. तक्रार केली की आर्थिक भुर्दंडनवीन कनेक्शन देऊन ही कंत्राटी कंपनी मोकळी होते. पुढे त्या कनेक्शनधारकाला व्यवस्थित पाणी मिळत आहे की नाही, हे पाहण्याचे सौजन्यही दाखविले जात आहे. एखाद्याने पाणी मिळत नाही, अशी तक्रार केली की काहीतरी तांत्रिक कारण सांगितले जाते व तक्रारकर्त्याला पुन्हा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.