शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

पाणी पुरवठ्याला पुन्हा ग्रहण

By admin | Updated: July 9, 2017 00:41 IST

चंद्रपूरच्या पाणी पुरवठ्याबाबत वारंवार ओरड होत आहे. नागरिकांसह नगरसेवकही याबाबत संतप्त आहेत.

नागरिक वैतागले : दोन दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्पलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरच्या पाणी पुरवठ्याबाबत वारंवार ओरड होत आहे. नागरिकांसह नगरसेवकही याबाबत संतप्त आहेत. असे असतानाही पाणी वितरण व्यवस्था अजूनही सुरळीत झालेली नाही. गेल्या दोन दिवसांपासून चंद्रपुरातील अनेक भागात पाणी पुरवठा ठप्प आहे. यामुळे नागरिक वैतागले असून अनेकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दिवसेंदिवस चंद्रपूर शहराचा व्यास वाढत चालला आहे. लोकसंख्याही चार लाखांच्या घरात गेली आहे. चंद्रपुरातील महानगरपालिका अस्तित्वात आल्यामुळे पुढे आणखी शहराच्या सीमा वाढणार आहे. असे असले तरी या शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन ५० ते ६० वर्ष जुनी आहे. आता ती अत्यंत खिळखिळी झाली असून मनपा प्रशासनानेही ती कालबाह्य झाली असल्याचे मान्य केले आहे. मान्य केले असले तरी अद्याप ती बदलविण्यात आलेली नाही. या खिळखिळ्या पाईपलाईनमुळे अनेक वेळा तांत्रिक बिघाड होऊन पाणी पुरवठा ठप्प पडतो. पूर्वी शहराच्या पाणी पुरवठ्याची जबाबदारी नगरपालिकाच सांभाळत होती. त्यामुळे पाणी पुरवठ्याबाबत नागरिक थेट पालिकेकडे तक्रार करीत होते. आणि त्याची वेळीच दखल घेतली जात होती. मात्र अलिकडच्या काळात पाणी पुरवठ्याचे खासगीकरण करण्यात आले. उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीला पाणी पुरवठ्याचे कंत्राट देण्यात आले आहे. खासगीकरण झाल्यानंतरच पाणी पुरवठ्याचे धिंडवडे उडाले. वितरण व्यवस्थाच अस्तित्वात आहे की नाही, असेच वाटायले लागले. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या इरई धरणात बऱ्यापैकी जलसाठा आहे. तरीही पाणी पुरवठा अनियमित असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.मागील दोन दिवसांपासून चंद्रपूर शहरातील काही वॉर्डाचा अपवाद सोडला तर बहुतांश वॉर्डातील पाणी पुरवठा ठप्प आहे. हॉस्पीटल वार्ड, सिव्हील लाईन, रामनगर, जगन्नाथ बाबा नगर, जीवन ज्योती कॉलनी परिसर, नगिना बाग परिसर, पठाणपुरा, विठ्ठल मंदिर वॉर्ड, भानापेठ वॉर्ड, बालाजी वॉर्ड, एकोरी वार्ड, घुटकाळा वॉर्ड, तुकुम परिसरातील वार्ड आदी भागात पाणी पुरवठा खंडित झाला. यातील काही वॉर्डात शुक्रवारी नळ आले नाही, पण शनिवारी आले. तर काही वॉर्डात शुक्रवार आणि शनिवार या दोन्ही दिवशी पाणी पुरवठा ठप्प होता.नळाला पाणी कमीचशहराला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात सध्या मुबलक पाणीसाठा असला तरी पाणी पुरवठा करताना तो मुबलक केला जात नाही. कुठे एक तास तर कुठे त्याहून कमी पाणी येते. त्यातही धारही मोठी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठे हाल सहन करावे लागत आहे. विशेष म्हणजे, नळ आल्यानंतर प्रारंभी काही वेळ दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी वापरता येत नाही. काही भागात तर केवळ अर्ध्या तासातच नळाची धार गुल होते, अशाही तक्रारी आहेत. तक्रार केली की आर्थिक भुर्दंडनवीन कनेक्शन देऊन ही कंत्राटी कंपनी मोकळी होते. पुढे त्या कनेक्शनधारकाला व्यवस्थित पाणी मिळत आहे की नाही, हे पाहण्याचे सौजन्यही दाखविले जात आहे. एखाद्याने पाणी मिळत नाही, अशी तक्रार केली की काहीतरी तांत्रिक कारण सांगितले जाते व तक्रारकर्त्याला पुन्हा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.