शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जलस्वराज्य प्रकल्पातून शुद्ध पाणी मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 22:28 IST

जलस्वराज्य दोनमध्ये महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर असून सात निमशहरी व ३३ पाणी गुणवत्ता बाधित गावांमध्ये जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हा पथदर्शी प्रकल्प आहे. त्यामुळे योग्य नियोजन करून प्रकल्प पूर्ण करावे. गावातील प्रत्येक व्यक्तीला पिण्याचे शुद्ध पाणी देणे ही महाराष्ट्र जीवन प्राधीकरण व जिल्हा परिषदेची जबाबदारी आहे, असे मत जागतिक बँकेचे प्रतिनिधी सत्या पल्लागणी यांनी केले.

ठळक मुद्देसत्या पल्लागणी : जागतिक बँकेच्या प्रतिनिधींकडून कामांची तांत्रिक पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जलस्वराज्य दोनमध्ये महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर असून सात निमशहरी व ३३ पाणी गुणवत्ता बाधित गावांमध्ये जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हा पथदर्शी प्रकल्प आहे. त्यामुळे योग्य नियोजन करून प्रकल्प पूर्ण करावे. गावातील प्रत्येक व्यक्तीला पिण्याचे शुद्ध पाणी देणे ही महाराष्ट्र जीवन प्राधीकरण व जिल्हा परिषदेची जबाबदारी आहे, असे मत जागतिक बँकेचे प्रतिनिधी सत्या पल्लागणी यांनी केले.गुरूवारी जलस्वराज्य- दोनमधील सरू असलेल्या कामांची तांत्रिक पाहणी करताना ते वरोरा तालुक्यातील एकाजुर्ना येथे बोलत होते.यावेळी एकाजुर्नाचे सरपंच राजू रणदिवे, पाणी पुरवठा समिती अध्यक्ष लक्ष्मण चिंचोळकर, ग्रामसेवक चाफले, कुचनाचे सरपंच ठाकरे, ग्रामसेवक मेश्राम, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण कार्यकारी अभियंता संजय वाघ, शाखा अभियंता बाराहाते, भालाधरे, स्नेहा रॉय, प्रवीण खंडारे, कुणाल शितोळे, अंजली डाहुले, प्रगती बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वरोरा तालुक्यातील एकाजुर्ना व भद्रावती तालुक्यातील कुचना, काटवल भगत व बेलोरा येथील कामांची तांत्रिक पाहणी केल्यानंतर सत्या पल्लागणी यांनी अनेक सूचना केल्या. प्रकल्प व्यवस्थापक देवेंद्र लांडगे, शाखा अभियंता साळवी यांनी प्रकल्पाच्या वाटचालीची माहिती दिली.पल्लागणी म्हणाले, मार्च २०१९ पर्यंत ही योजना पूर्ण होऊन गावातील प्रत्येक घरात मीटरद्वारे पाणी पोहचले पाहिजे. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. यामध्ये तांत्रिक त्रुट्या राहु नये याची खबरदारी घ्यावी. जिल्ह्यातील सात योजनांकरीता ४१ कोटी रूपये खर्च केला जात आहे. पाणी गुणवत्तेसाठी ३३ गावांवर सहा कोटी ६० लाखांचा निधी उपलब्ध आहे. त्यामुळे या योजनेवर जागतिक बँक लक्ष ठेवून आहे. काही योजना नवीन संकल्पनेद्वारे तयार केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना चोवीस तास पाणी मिळणार आहे. ही योजना योग्यरित्या सुरू राहावी, यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य घ्यावे, असेही सत्या पल्लागणी यांनी सांगितले.यावेळी प्रकल्प संचालक देवेंद्र लांडगे म्हणाले, आजही अनेक गावे या प्रकल्पात समाविष्ट होण्याकरिता प्रतीक्षा करीत आहेत. या योजनेचा पाणीकर कोणत्याही परिस्थितीत ग्रामपंचायतला मिळाला पाहिजे तरच लाभ होऊ शकेल. पाणी गुणवत्ता गावांतील सर्व वॉटर एटीएमची पाहणीही केली.