शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जलस्वराज्य प्रकल्पातून शुद्ध पाणी मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 22:28 IST

जलस्वराज्य दोनमध्ये महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर असून सात निमशहरी व ३३ पाणी गुणवत्ता बाधित गावांमध्ये जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हा पथदर्शी प्रकल्प आहे. त्यामुळे योग्य नियोजन करून प्रकल्प पूर्ण करावे. गावातील प्रत्येक व्यक्तीला पिण्याचे शुद्ध पाणी देणे ही महाराष्ट्र जीवन प्राधीकरण व जिल्हा परिषदेची जबाबदारी आहे, असे मत जागतिक बँकेचे प्रतिनिधी सत्या पल्लागणी यांनी केले.

ठळक मुद्देसत्या पल्लागणी : जागतिक बँकेच्या प्रतिनिधींकडून कामांची तांत्रिक पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जलस्वराज्य दोनमध्ये महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर असून सात निमशहरी व ३३ पाणी गुणवत्ता बाधित गावांमध्ये जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हा पथदर्शी प्रकल्प आहे. त्यामुळे योग्य नियोजन करून प्रकल्प पूर्ण करावे. गावातील प्रत्येक व्यक्तीला पिण्याचे शुद्ध पाणी देणे ही महाराष्ट्र जीवन प्राधीकरण व जिल्हा परिषदेची जबाबदारी आहे, असे मत जागतिक बँकेचे प्रतिनिधी सत्या पल्लागणी यांनी केले.गुरूवारी जलस्वराज्य- दोनमधील सरू असलेल्या कामांची तांत्रिक पाहणी करताना ते वरोरा तालुक्यातील एकाजुर्ना येथे बोलत होते.यावेळी एकाजुर्नाचे सरपंच राजू रणदिवे, पाणी पुरवठा समिती अध्यक्ष लक्ष्मण चिंचोळकर, ग्रामसेवक चाफले, कुचनाचे सरपंच ठाकरे, ग्रामसेवक मेश्राम, महाराष्ट्र जीवन प्राधीकरण कार्यकारी अभियंता संजय वाघ, शाखा अभियंता बाराहाते, भालाधरे, स्नेहा रॉय, प्रवीण खंडारे, कुणाल शितोळे, अंजली डाहुले, प्रगती बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वरोरा तालुक्यातील एकाजुर्ना व भद्रावती तालुक्यातील कुचना, काटवल भगत व बेलोरा येथील कामांची तांत्रिक पाहणी केल्यानंतर सत्या पल्लागणी यांनी अनेक सूचना केल्या. प्रकल्प व्यवस्थापक देवेंद्र लांडगे, शाखा अभियंता साळवी यांनी प्रकल्पाच्या वाटचालीची माहिती दिली.पल्लागणी म्हणाले, मार्च २०१९ पर्यंत ही योजना पूर्ण होऊन गावातील प्रत्येक घरात मीटरद्वारे पाणी पोहचले पाहिजे. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. यामध्ये तांत्रिक त्रुट्या राहु नये याची खबरदारी घ्यावी. जिल्ह्यातील सात योजनांकरीता ४१ कोटी रूपये खर्च केला जात आहे. पाणी गुणवत्तेसाठी ३३ गावांवर सहा कोटी ६० लाखांचा निधी उपलब्ध आहे. त्यामुळे या योजनेवर जागतिक बँक लक्ष ठेवून आहे. काही योजना नवीन संकल्पनेद्वारे तयार केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना चोवीस तास पाणी मिळणार आहे. ही योजना योग्यरित्या सुरू राहावी, यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य घ्यावे, असेही सत्या पल्लागणी यांनी सांगितले.यावेळी प्रकल्प संचालक देवेंद्र लांडगे म्हणाले, आजही अनेक गावे या प्रकल्पात समाविष्ट होण्याकरिता प्रतीक्षा करीत आहेत. या योजनेचा पाणीकर कोणत्याही परिस्थितीत ग्रामपंचायतला मिळाला पाहिजे तरच लाभ होऊ शकेल. पाणी गुणवत्ता गावांतील सर्व वॉटर एटीएमची पाहणीही केली.