शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त गावांत वीज यंत्रणा सज्ज

By admin | Updated: February 12, 2015 00:50 IST

जिवती तालुक्यातील वादग्रस्त गावांमध्ये महाराष्ट्र व तेलंगणा या दोन्ही राज्यांच्यातून वीज पुरवठा करण्याची व्यवस्था आहे.

चंद्रपूर : जिवती तालुक्यातील वादग्रस्त गावांमध्ये महाराष्ट्र व तेलंगणा या दोन्ही राज्यांच्यातून वीज पुरवठा करण्याची व्यवस्था आहे. मात्र, तेथील नागरिकांनी तेलंगणा राज्याकडून वीज घेतली असल्याने महाराष्ट्राचे केवळ खांबच उभे आहेत. मात्र नागरिकांनी तेलंगणा राज्याच्या वीज यंत्रणेपासून अलिप्त होऊन महावितरणकडे अर्ज केल्यास तत्काळ वीज कनेक्शन देणार असल्याची माहिती वीज वितरण विभागाने दिली आहे. सीमेवरील गावांमध्ये दोन्ही राज्यांद्वारे विजेच्या प्राथमिक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. मात्र तेथील ग्रामस्थ हे वीज तेलंगणामधून वापरत आहेत. महाराष्ट्र वीज कंपनीद्वारा वादग्रस्त गावांत राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेअंतर्गत उच्चदाब वीजेचे खांब व लघु दाब विजेचे खांब, वीज वाहिण्यांचे जाळे तसेच रोहित्रे उभारणीचे काम करण्यात आले आहे. परंतु, या यंत्रणेचा उपयोग ग्रामस्थांनी वीज जोडणी घेतल्यावरच होणार आहे. आठ गावामध्ये तेलंगणा राज्यातून सिंगल फेज वीज पुरवठा करण्यात आला आहे. महाराष्ट्र वीज वितरणने उभारलेल्या वीज यंत्रणेतून गावकऱ्यांनी वीज घेण्यासाठी अर्ज करावा, अशा सुचना वारंवार देण्यात आल्या आहेत. परंतु कोणीही अर्ज केलेला नसून डिमांडही भरलेली नाही. तसेच महावितरणचा वीज पुरवठा घेण्यापूर्वी ग्रामस्थांनी तेलंगणाच्या वीज यंत्रणेपासून पूर्णपणे वेगळे होणे आवश्यक आहे, असे वीज वितरणने म्हटले आहे. तेलंगणानाच्या वीज यंत्रणेत महावितरणचा वीज पुरवठा सोडण्यात आला तर ते अवैध आणि अतिशय धोकादायक ठरणार आहे. अशावेळी ग्रामस्थांनी एकाच यंत्रणेतून वीज सुरू ठेवणे आवश्यक आहे. गावात महाराष्ट्राची वीज यंत्रणा उभी असल्याने ग्रामस्थांनी अर्ज केल्यास त्यांना तातडीने वीज उपलब्ध देणार असल्याचे महावितरणचे हरीष गजबे यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)