शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

वादग्रस्त गावांत वीज यंत्रणा सज्ज

By admin | Updated: February 12, 2015 00:50 IST

जिवती तालुक्यातील वादग्रस्त गावांमध्ये महाराष्ट्र व तेलंगणा या दोन्ही राज्यांच्यातून वीज पुरवठा करण्याची व्यवस्था आहे.

चंद्रपूर : जिवती तालुक्यातील वादग्रस्त गावांमध्ये महाराष्ट्र व तेलंगणा या दोन्ही राज्यांच्यातून वीज पुरवठा करण्याची व्यवस्था आहे. मात्र, तेथील नागरिकांनी तेलंगणा राज्याकडून वीज घेतली असल्याने महाराष्ट्राचे केवळ खांबच उभे आहेत. मात्र नागरिकांनी तेलंगणा राज्याच्या वीज यंत्रणेपासून अलिप्त होऊन महावितरणकडे अर्ज केल्यास तत्काळ वीज कनेक्शन देणार असल्याची माहिती वीज वितरण विभागाने दिली आहे. सीमेवरील गावांमध्ये दोन्ही राज्यांद्वारे विजेच्या प्राथमिक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. मात्र तेथील ग्रामस्थ हे वीज तेलंगणामधून वापरत आहेत. महाराष्ट्र वीज कंपनीद्वारा वादग्रस्त गावांत राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेअंतर्गत उच्चदाब वीजेचे खांब व लघु दाब विजेचे खांब, वीज वाहिण्यांचे जाळे तसेच रोहित्रे उभारणीचे काम करण्यात आले आहे. परंतु, या यंत्रणेचा उपयोग ग्रामस्थांनी वीज जोडणी घेतल्यावरच होणार आहे. आठ गावामध्ये तेलंगणा राज्यातून सिंगल फेज वीज पुरवठा करण्यात आला आहे. महाराष्ट्र वीज वितरणने उभारलेल्या वीज यंत्रणेतून गावकऱ्यांनी वीज घेण्यासाठी अर्ज करावा, अशा सुचना वारंवार देण्यात आल्या आहेत. परंतु कोणीही अर्ज केलेला नसून डिमांडही भरलेली नाही. तसेच महावितरणचा वीज पुरवठा घेण्यापूर्वी ग्रामस्थांनी तेलंगणाच्या वीज यंत्रणेपासून पूर्णपणे वेगळे होणे आवश्यक आहे, असे वीज वितरणने म्हटले आहे. तेलंगणानाच्या वीज यंत्रणेत महावितरणचा वीज पुरवठा सोडण्यात आला तर ते अवैध आणि अतिशय धोकादायक ठरणार आहे. अशावेळी ग्रामस्थांनी एकाच यंत्रणेतून वीज सुरू ठेवणे आवश्यक आहे. गावात महाराष्ट्राची वीज यंत्रणा उभी असल्याने ग्रामस्थांनी अर्ज केल्यास त्यांना तातडीने वीज उपलब्ध देणार असल्याचे महावितरणचे हरीष गजबे यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)