शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

वादग्रस्त गावांत वीज यंत्रणा सज्ज

By admin | Updated: February 12, 2015 00:50 IST

जिवती तालुक्यातील वादग्रस्त गावांमध्ये महाराष्ट्र व तेलंगणा या दोन्ही राज्यांच्यातून वीज पुरवठा करण्याची व्यवस्था आहे.

चंद्रपूर : जिवती तालुक्यातील वादग्रस्त गावांमध्ये महाराष्ट्र व तेलंगणा या दोन्ही राज्यांच्यातून वीज पुरवठा करण्याची व्यवस्था आहे. मात्र, तेथील नागरिकांनी तेलंगणा राज्याकडून वीज घेतली असल्याने महाराष्ट्राचे केवळ खांबच उभे आहेत. मात्र नागरिकांनी तेलंगणा राज्याच्या वीज यंत्रणेपासून अलिप्त होऊन महावितरणकडे अर्ज केल्यास तत्काळ वीज कनेक्शन देणार असल्याची माहिती वीज वितरण विभागाने दिली आहे. सीमेवरील गावांमध्ये दोन्ही राज्यांद्वारे विजेच्या प्राथमिक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. मात्र तेथील ग्रामस्थ हे वीज तेलंगणामधून वापरत आहेत. महाराष्ट्र वीज कंपनीद्वारा वादग्रस्त गावांत राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेअंतर्गत उच्चदाब वीजेचे खांब व लघु दाब विजेचे खांब, वीज वाहिण्यांचे जाळे तसेच रोहित्रे उभारणीचे काम करण्यात आले आहे. परंतु, या यंत्रणेचा उपयोग ग्रामस्थांनी वीज जोडणी घेतल्यावरच होणार आहे. आठ गावामध्ये तेलंगणा राज्यातून सिंगल फेज वीज पुरवठा करण्यात आला आहे. महाराष्ट्र वीज वितरणने उभारलेल्या वीज यंत्रणेतून गावकऱ्यांनी वीज घेण्यासाठी अर्ज करावा, अशा सुचना वारंवार देण्यात आल्या आहेत. परंतु कोणीही अर्ज केलेला नसून डिमांडही भरलेली नाही. तसेच महावितरणचा वीज पुरवठा घेण्यापूर्वी ग्रामस्थांनी तेलंगणाच्या वीज यंत्रणेपासून पूर्णपणे वेगळे होणे आवश्यक आहे, असे वीज वितरणने म्हटले आहे. तेलंगणानाच्या वीज यंत्रणेत महावितरणचा वीज पुरवठा सोडण्यात आला तर ते अवैध आणि अतिशय धोकादायक ठरणार आहे. अशावेळी ग्रामस्थांनी एकाच यंत्रणेतून वीज सुरू ठेवणे आवश्यक आहे. गावात महाराष्ट्राची वीज यंत्रणा उभी असल्याने ग्रामस्थांनी अर्ज केल्यास त्यांना तातडीने वीज उपलब्ध देणार असल्याचे महावितरणचे हरीष गजबे यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)