शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आरसीएमचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:26 IST

रोखीचे समजले जाणारे कापसाचे पीक शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत असतात.

ठळक मुद्दे१५ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी : प्रति क्विंटल १५० रुपये कपात

प्रविण खिरटकर ।आॅनलाईन लोकमतवरोरा : रोखीचे समजले जाणारे कापसाचे पीक शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत असतात. सध्याच्या दरात शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघत नसताना आता कापूस विकताना शेतकऱ्यांना रिव्हर्स चार्ज मेकॅनिजम (आरसीएम) भरावा लागणार आहे. त्यामुळे कापूस विकताना शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १५० रुपये त्यांना मिळालेल्या दरातून द्यावे लागणार आहे. याची अंमलबजावणी १५ नोव्हेंबरपासून केली जात आहे.नगदी पीक असलेले कापसाचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत आहे. कापसाच्या लागवडीपासून तो विकेपर्यंत येत असलेला खर्चही मोठा असतो. सध्या कापसाला चार हजार ५०० रुपयांपर्यंत प्रति क्विंटल दर मिळत असल्याने सध्याच्या दरात उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे आधीच शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असल्याचे दिसून येत आहे. मजुराचा खर्च व कुटुंबियाचा उदरनिर्वाह चालविण्याकरिता शेतकरी मिळेल त्या दरात कापूस विकत आहे.अकाली पावसाचा फटकाही कापसाला बसल्याने प्रतवारी खराब झाली आहे. त्यामुळे सध्या मिळणारा दर कमी आहे. आजपर्यंत कापूस विकताना शेतकºयांना कुठलाही कर द्यावा लागत नव्हता. कापूस विकल्यानंतर जिनिंग संचालक कापसाचे जिनिंग झाल्यानंतर व्यापाºयांना विकताना विक्री कर भरीत होते. परंतु केंद्र सरकारने नुकताच कापसाला आरसीएम नावाचा नवीन कर लावला आहे. त्याची अंमलबजावणी १५ नोव्हेंबरपासून केली जाणार असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. यामुळे भविष्यात शेतकरी कापसाचे उत्पादन घेणार काय, असा प्रश्नच आहे.आरसीएम कर प्रणाली कापसावर लावली जाणार असल्याने शेतकऱ्यांना अत्यल्प दर मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी पुढील हंगामात कापूस कमी प्रमाणामध्ये लागवड करेल. दुसरीकडे कोट्यवधी रुपये गुंतवून अनेकांनी जिनिंग व्यवसाय सुरू केला आहे. त्यामध्ये शेकडो कामगारांना रोजगार मिळाला. कापूस लागवडीचे प्रमाण कमी झाल्यास जिनिंग व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिनिंग संचालकांनी आरसीएम बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून जिनिंग संचालक संपावर जाण्याची शक्यता आहे.आरसीएम फक्त कापसावरचआरसीएम कर प्रणाली ही कोणत्याही शेतमालावर केंद्र सरकारने लावली नाही. ती फक्त कापसावर लावल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.