शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आरसीएमचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:26 IST

रोखीचे समजले जाणारे कापसाचे पीक शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत असतात.

ठळक मुद्दे१५ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी : प्रति क्विंटल १५० रुपये कपात

प्रविण खिरटकर ।आॅनलाईन लोकमतवरोरा : रोखीचे समजले जाणारे कापसाचे पीक शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत असतात. सध्याच्या दरात शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघत नसताना आता कापूस विकताना शेतकऱ्यांना रिव्हर्स चार्ज मेकॅनिजम (आरसीएम) भरावा लागणार आहे. त्यामुळे कापूस विकताना शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १५० रुपये त्यांना मिळालेल्या दरातून द्यावे लागणार आहे. याची अंमलबजावणी १५ नोव्हेंबरपासून केली जात आहे.नगदी पीक असलेले कापसाचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत आहे. कापसाच्या लागवडीपासून तो विकेपर्यंत येत असलेला खर्चही मोठा असतो. सध्या कापसाला चार हजार ५०० रुपयांपर्यंत प्रति क्विंटल दर मिळत असल्याने सध्याच्या दरात उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे आधीच शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असल्याचे दिसून येत आहे. मजुराचा खर्च व कुटुंबियाचा उदरनिर्वाह चालविण्याकरिता शेतकरी मिळेल त्या दरात कापूस विकत आहे.अकाली पावसाचा फटकाही कापसाला बसल्याने प्रतवारी खराब झाली आहे. त्यामुळे सध्या मिळणारा दर कमी आहे. आजपर्यंत कापूस विकताना शेतकºयांना कुठलाही कर द्यावा लागत नव्हता. कापूस विकल्यानंतर जिनिंग संचालक कापसाचे जिनिंग झाल्यानंतर व्यापाºयांना विकताना विक्री कर भरीत होते. परंतु केंद्र सरकारने नुकताच कापसाला आरसीएम नावाचा नवीन कर लावला आहे. त्याची अंमलबजावणी १५ नोव्हेंबरपासून केली जाणार असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. यामुळे भविष्यात शेतकरी कापसाचे उत्पादन घेणार काय, असा प्रश्नच आहे.आरसीएम कर प्रणाली कापसावर लावली जाणार असल्याने शेतकऱ्यांना अत्यल्प दर मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी पुढील हंगामात कापूस कमी प्रमाणामध्ये लागवड करेल. दुसरीकडे कोट्यवधी रुपये गुंतवून अनेकांनी जिनिंग व्यवसाय सुरू केला आहे. त्यामध्ये शेकडो कामगारांना रोजगार मिळाला. कापूस लागवडीचे प्रमाण कमी झाल्यास जिनिंग व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिनिंग संचालकांनी आरसीएम बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून जिनिंग संचालक संपावर जाण्याची शक्यता आहे.आरसीएम फक्त कापसावरचआरसीएम कर प्रणाली ही कोणत्याही शेतमालावर केंद्र सरकारने लावली नाही. ती फक्त कापसावर लावल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.