शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आरसीएमचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:26 IST

रोखीचे समजले जाणारे कापसाचे पीक शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत असतात.

ठळक मुद्दे१५ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी : प्रति क्विंटल १५० रुपये कपात

प्रविण खिरटकर ।आॅनलाईन लोकमतवरोरा : रोखीचे समजले जाणारे कापसाचे पीक शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत असतात. सध्याच्या दरात शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघत नसताना आता कापूस विकताना शेतकऱ्यांना रिव्हर्स चार्ज मेकॅनिजम (आरसीएम) भरावा लागणार आहे. त्यामुळे कापूस विकताना शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १५० रुपये त्यांना मिळालेल्या दरातून द्यावे लागणार आहे. याची अंमलबजावणी १५ नोव्हेंबरपासून केली जात आहे.नगदी पीक असलेले कापसाचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत आहे. कापसाच्या लागवडीपासून तो विकेपर्यंत येत असलेला खर्चही मोठा असतो. सध्या कापसाला चार हजार ५०० रुपयांपर्यंत प्रति क्विंटल दर मिळत असल्याने सध्याच्या दरात उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे आधीच शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असल्याचे दिसून येत आहे. मजुराचा खर्च व कुटुंबियाचा उदरनिर्वाह चालविण्याकरिता शेतकरी मिळेल त्या दरात कापूस विकत आहे.अकाली पावसाचा फटकाही कापसाला बसल्याने प्रतवारी खराब झाली आहे. त्यामुळे सध्या मिळणारा दर कमी आहे. आजपर्यंत कापूस विकताना शेतकºयांना कुठलाही कर द्यावा लागत नव्हता. कापूस विकल्यानंतर जिनिंग संचालक कापसाचे जिनिंग झाल्यानंतर व्यापाºयांना विकताना विक्री कर भरीत होते. परंतु केंद्र सरकारने नुकताच कापसाला आरसीएम नावाचा नवीन कर लावला आहे. त्याची अंमलबजावणी १५ नोव्हेंबरपासून केली जाणार असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. यामुळे भविष्यात शेतकरी कापसाचे उत्पादन घेणार काय, असा प्रश्नच आहे.आरसीएम कर प्रणाली कापसावर लावली जाणार असल्याने शेतकऱ्यांना अत्यल्प दर मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी पुढील हंगामात कापूस कमी प्रमाणामध्ये लागवड करेल. दुसरीकडे कोट्यवधी रुपये गुंतवून अनेकांनी जिनिंग व्यवसाय सुरू केला आहे. त्यामध्ये शेकडो कामगारांना रोजगार मिळाला. कापूस लागवडीचे प्रमाण कमी झाल्यास जिनिंग व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिनिंग संचालकांनी आरसीएम बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून जिनिंग संचालक संपावर जाण्याची शक्यता आहे.आरसीएम फक्त कापसावरचआरसीएम कर प्रणाली ही कोणत्याही शेतमालावर केंद्र सरकारने लावली नाही. ती फक्त कापसावर लावल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.