शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
4
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
6
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
7
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
8
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
9
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
10
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
11
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
12
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
13
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO
14
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
15
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
16
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!
17
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
18
"नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन...", विधानभवनात पडळकर-आव्हाडांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर मराठी अभिनेत्याचा टोला
19
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
20
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू

नेताजी सुभाष बाबूंच्या आझाद हिंद सेनेची दुर्मीळ नाणी चंद्रपुरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:29 IST

चंद्रपूर : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेची कीर्ती पताका जगभरात पसरत असतानाच अखंड भारताचे महत्त्व अधोरेखित करत ...

चंद्रपूर : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेची कीर्ती पताका जगभरात पसरत असतानाच अखंड भारताचे महत्त्व अधोरेखित करत आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे स्मरण करून देणारे तत्कालीन आझाद हिंद सेनेने नागरिकांमध्ये आणलेले नाणे चंद्रपूरचे नाणे संग्राहक अशोकसिंह ठाकूर यांच्या संग्रहात उपलब्ध आहे. ही ऐतिहासिक नाणी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा तेजस्वी इतिहास कथन करणारा एक मौलिक ठेवा आहेत.

देशभरातील असंख्य शूरवीरांना हौतात्म्य पत्करल्यानंतरच १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. या कालावधीत दोन आण्याचे नाणे भारतात चलनात असल्याचे नमूद करून, नाणी अभ्यासक अशोकसिंह ठाकूर म्हणाले, अशा प्रकारच्या नाण्यांचे वजन ५.८० ग्रॅम होते. या नाण्यांच्या सदृश्य काही नाणी आझाद हिंद सेनेने त्याच कालखंडात तयार केली होती. चलनात असलेल्या नाण्यांच्याच वजनांचे आणि हुबेहूब त्यांच्यासारखेच दिसणारे हे नाणे आझाद हिंद सेनेच्या देशभक्तीचे प्रतीक मानले जात असे. या नाण्याच्या एका बाजूला अखंड भारताचा नकाशा आहे. त्यावर आझाद हिंद सेना आणि १५ ऑगस्ट ,१९४७ असा उल्लेख कोरण्यात आला आहे.

बॉक्स

केवळ संदेशासाठीच, नाण्यावर रकमेचा उल्लेख नाही

आझाद हिंद सेनेच्या याच नाण्याच्या दुसऱ्या बाजूला भारताचा तिरंगा झेंडा कोरण्यात आला. त्यावर जय हिंद व १५ ऑगस्ट, १९४७ असा उल्लेख आहे. कुठल्याही रकमेचा उल्लेख नाही. केवळ एखाद्या संदेश अथवा विचाराचा प्रचार करण्यासाठी जारी करण्यात आला. अशा नाण्यांना भारतीय इंडालॉजीमध्ये ‘टोकन’ असे म्हणतात, अशी माहिती अभ्यासक ठाकूर यांनी दिली.

बॉक्स

युगायुगाचा इतिहास सांगतात नाणी...

भारताची फाळणी झाल्यानंतर, त्यावर खेद व्यक्त करून पुन्हा एकदा अखंड भारताची कास धरणारी आझाद हिंद सेनेची भूमिका या नाण्यातून व्यक्त होते, असा दावा अभ्यासक ठाकूर यांनी केला. भारताच्या तिरंग्याचा सन्मान करण्याचा संदेशही या नाण्यांतून देण्याचा प्रयत्न आझाद हिंद सेनेने केला. कोणतीही नाणी त्या काळातील इतिहास सांगतात. त्यासाठी नवीन पिढी व विद्यार्थ्यांमध्ये नाण्यांचे प्राचीनत्व समजावून सांगण्यासाठी शासनाने अशा संस्था, अभ्यासक व संग्राहकांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले पाहिजे, याकडेही नाणे संग्राहक अशोकसिंह ठाकूर यांनी लक्ष वेधले.