शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
3
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
4
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
5
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
6
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
7
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
8
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
9
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
10
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
11
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
12
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
13
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
14
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
15
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
16
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
17
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
18
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
19
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
20
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
Daily Top 2Weekly Top 5

नेताजी सुभाष बाबूंच्या आझाद हिंद सेनेची दुर्मीळ नाणी चंद्रपुरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:29 IST

चंद्रपूर : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेची कीर्ती पताका जगभरात पसरत असतानाच अखंड भारताचे महत्त्व अधोरेखित करत ...

चंद्रपूर : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेची कीर्ती पताका जगभरात पसरत असतानाच अखंड भारताचे महत्त्व अधोरेखित करत आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे स्मरण करून देणारे तत्कालीन आझाद हिंद सेनेने नागरिकांमध्ये आणलेले नाणे चंद्रपूरचे नाणे संग्राहक अशोकसिंह ठाकूर यांच्या संग्रहात उपलब्ध आहे. ही ऐतिहासिक नाणी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा तेजस्वी इतिहास कथन करणारा एक मौलिक ठेवा आहेत.

देशभरातील असंख्य शूरवीरांना हौतात्म्य पत्करल्यानंतरच १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. या कालावधीत दोन आण्याचे नाणे भारतात चलनात असल्याचे नमूद करून, नाणी अभ्यासक अशोकसिंह ठाकूर म्हणाले, अशा प्रकारच्या नाण्यांचे वजन ५.८० ग्रॅम होते. या नाण्यांच्या सदृश्य काही नाणी आझाद हिंद सेनेने त्याच कालखंडात तयार केली होती. चलनात असलेल्या नाण्यांच्याच वजनांचे आणि हुबेहूब त्यांच्यासारखेच दिसणारे हे नाणे आझाद हिंद सेनेच्या देशभक्तीचे प्रतीक मानले जात असे. या नाण्याच्या एका बाजूला अखंड भारताचा नकाशा आहे. त्यावर आझाद हिंद सेना आणि १५ ऑगस्ट ,१९४७ असा उल्लेख कोरण्यात आला आहे.

बॉक्स

केवळ संदेशासाठीच, नाण्यावर रकमेचा उल्लेख नाही

आझाद हिंद सेनेच्या याच नाण्याच्या दुसऱ्या बाजूला भारताचा तिरंगा झेंडा कोरण्यात आला. त्यावर जय हिंद व १५ ऑगस्ट, १९४७ असा उल्लेख आहे. कुठल्याही रकमेचा उल्लेख नाही. केवळ एखाद्या संदेश अथवा विचाराचा प्रचार करण्यासाठी जारी करण्यात आला. अशा नाण्यांना भारतीय इंडालॉजीमध्ये ‘टोकन’ असे म्हणतात, अशी माहिती अभ्यासक ठाकूर यांनी दिली.

बॉक्स

युगायुगाचा इतिहास सांगतात नाणी...

भारताची फाळणी झाल्यानंतर, त्यावर खेद व्यक्त करून पुन्हा एकदा अखंड भारताची कास धरणारी आझाद हिंद सेनेची भूमिका या नाण्यातून व्यक्त होते, असा दावा अभ्यासक ठाकूर यांनी केला. भारताच्या तिरंग्याचा सन्मान करण्याचा संदेशही या नाण्यांतून देण्याचा प्रयत्न आझाद हिंद सेनेने केला. कोणतीही नाणी त्या काळातील इतिहास सांगतात. त्यासाठी नवीन पिढी व विद्यार्थ्यांमध्ये नाण्यांचे प्राचीनत्व समजावून सांगण्यासाठी शासनाने अशा संस्था, अभ्यासक व संग्राहकांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले पाहिजे, याकडेही नाणे संग्राहक अशोकसिंह ठाकूर यांनी लक्ष वेधले.