शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

रोवणीचा धडाका; मात्र मजूरच मिळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:20 IST

शेतकरी पुन्हा हवालदिल : एकमेकांच्या शेतात जाऊन करतात कामे राजकुमार चुनारकर चिमूर : मागील काही दिवसांपूर्वी जोर धरलेल्या पावसाने ...

शेतकरी पुन्हा हवालदिल : एकमेकांच्या शेतात जाऊन करतात कामे

राजकुमार चुनारकर

चिमूर : मागील काही दिवसांपूर्वी जोर धरलेल्या पावसाने आठवडाभरापासून चांगलीच उसंत घेतली आहे. त्यामुळे चिमूर, नेरी, भिसी, खडसंगी, वाहानगाव, बोथलीसह विविध ठिकाणच्या भागात भात रोवणीच्या कामाला वेग आला आहे. असे असले तरी शेतात काम करण्यासाठी मजूरच मिळत नसल्याने मजुरांची कमतरता भासू लागली आहे. यामुळे शेतकरी पुन्हा हवालदिल होताना दिसत आहे.

या मजूर कमतरतेचा सामना करत रोववणीच्या कामाला शेतकऱ्यांनी सुरुवात तर केली. मात्र कामांना विलंब होत आहे. दुसरीकडे पावसाने उसंत घेतल्याने अनेक ठिकाणी रोवणी थांबली आहे. मात्र पावासाने दडी मरल्याने कापूस व सोयाबीन निंदणाचे काम एकाचवेळी सुरू झाले. त्यामुळे मजूर विभागले गेल्याने शेतकऱ्यांना मजुरांची कमतरता भासत आहे. अख्खे कुटुंब शेतात जात असल्याचे पाहून घरातील मुलेही आपला मदतीचा हात देत वडिलांना शेत कामाला मदत करीत आहेत.

यावर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हजेरी लावल्यानंतर महिनाभर पावसाने चांगली साथ दिली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेले धान रोपे रोवणी करण्यायोग्य झाली. त्यामुळे भात लागवडीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. भातरोपे खणून त्याची लागवड करण्याचे काम सुरू आहे.

मात्र याही वर्षी शेतमजूर भात रोवणी व निंदनाचे काम करण्यात विभागले गेल्याने मजूर मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे भात लागवड करण्याच्या कामात अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. शेतकऱ्यांना शेतावर काम करण्यासाठी मजूर शोधावे लागत आहे. महतप्रयासाने दोन-चार महिला मजूर मिळत असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

बॉक्स

मजुराऐवजी कुटुंबातील सदस्यच कामात

मजूर नसल्याने काही शेतकऱ्यांनी घरातील सदस्य व नातेवाईक यांना सोबत घेऊन शेतातील कामे उरकण्यास सुरवात केली आहे. तर काही शेतकरी एकमेकांच्या शेतावर अदली-बदलीने जाऊन कामासाठी सहकार्य करीत आहेत. याच बरोबर शाळाबंद असल्याने घरातल्या घरात ऑनलाइन अभ्यासात कसरत करणारी मुलेही वडिलांची शेतकामाची परवड पाहून आपल्या परीने मदत करताना दिसत आहेत.

कोट

जून महिन्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे धानाचे पऱ्हे रोवणीसाठी तयार झाले तर दुसरीकडे एक आठवड्यात पावसाने दडी मारल्याने कापूस, सोयाबीनचे निंदनाचे काम एकाच वेळी आले. त्यामुळे उपलब्ध मजूर विभागले गेले. त्याचा फटका मजूर मिळत नसून मजुरीही वाढत आहे.

-प्रशांत कोल्हे, शेतकरी