शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

देवीच्या दर्शनासाठी रांगत प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 22:10 IST

देवीचा नवरात्रोत्सव प्रत्येकाला ओढ लावणारा आहे. उपास व व्रतवैकल्य जोपासून आदिशक्तीला नतमस्तक होऊन मनोकामना पूर्ण करण्याचा संकल्प भाविकांकडून केला जातो. दरम्यान देवीचा जागर होतो.

ठळक मुद्देबल्लारपुरातून दर्शनवारी: १२ किमी प्रवासाला ३६ तासांचा कालावधी

अनेकश्वर मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : देवीचा नवरात्रोत्सव प्रत्येकाला ओढ लावणारा आहे. उपास व व्रतवैकल्य जोपासून आदिशक्तीला नतमस्तक होऊन मनोकामना पूर्ण करण्याचा संकल्प भाविकांकडून केला जातो. दरम्यान देवीचा जागर होतो. याला धार्मिकतेची जोडही मिळाली आहे. भक्तीच्या ओढीने बल्लारपूर येथील भाविकांची सहा वर्षांपासूनची दर्शनवारी सुरू आहे. बल्लारपूर ते चंद्रपूरपर्यंत १२ किमी अंतर केवळ श्रद्धेमुळे रांगत-रांगत ३६ तासांत पूर्ण करून महाकालीच्या दर्शन घेतल्या जात आहे.राणी लक्ष्मी वॉर्डातील तारा बरमैय्या यांच्या कुटुंबीयांची देवी महाकालीच्या दर्शनवारीचे वास्तवातील चित्र आहे. देवी महाकालीवर त्यांची अपार श्रद्धा आहे. कौटुंबीक परिस्थिती जेमतेम. मात्र सप्तमीला देवी महाकालीचे दर्शन घेण्याचा संकल्प भक्तीभाव उजागर करणारा आहे. १२ किलोमीटर अंतर रांगत प्रवास करून आदिशक्तीचा जागर धार्मिक भावना जोपासणारा आहे. किसन बरमय्या, आकाश बरमय्या, अविनाश गेडाम व गणेश तेलसे यांनी पंचमीला म्हणजे रविवारी रात्री ८ वाजता वाघाचे रूप धारण करून घरून देवी महाकालीच्या दर्शनासाठी वारी सुरू केली आहे.महाकाली आराध्य दैवत आहे. नवरात्रोत्सवा दरम्यान आदीशक्तीचा जागर केला जातो. संकल्पसिद्धी केली जाते.मंगलमय वातावरण असते. सामान्य नागरिकांना राक्षसी प्रवत्तीपासून वाचविणारी त्राता म्हणून देवीचे रूप आहे. तिचे सशक्त रूप भाविकांना ओढ लावते. यामुळेच ओढीने देवी महाकालीच्या दर्शनासाठी वाघाचे रूप धारण करून रांगत प्रवास करतो, अशी माहिती किसन बरमैय्या यांनी ‘लोकमत’ला दिली. आमची देवीवर श्रद्धा आहे. भक्तीभाव जोपासतो. दैवी शक्तीचे वरदान लाभावे हीच मनिषा बाळगून सप्तमीला दर्शन घेतो, असेही त्यांनी सांगितले.मूर्ती घडविण्यातूनच जागा झाला भक्तीभावआकाश बरमय्या हे विविध देवीदेवता व गणेश मूर्ती घडवितात. मूर्ती घडविण्याच्या निमित्ताने भक्तीभाव जागृत झाला. साक्षात्कार झाल्याने वाघाचे उग्ररूप धारण करून देवीपुढे नतमस्तक होण्यासाठी दर्शनवारी केल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी सकाळी ६ वाजता विसापूर टोल नाक्यावरुन महाकालीच्या दर्शनासाठी रांगतरांगत वारी सुरु केली. चार जण देवीची रांगत दर्शनवारी करतात तर कुटुंबातील अन्य सदस्य सोबतीला आहेत. पंचमीला सुरू झालेला भाविकांचा हा प्रवास सप्तमीला महाकालीच्या दर्शनाने पूर्ण होणार आहे. भाविकांच्या अंगी सत्वगुणांचा संचार व्हावा. मनोकामना पूर्ण व्हावी, हाच या प्रवासामागील हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले.