शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

धानपिकांमध्ये रानडुकरांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:40 IST

तालुका परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रानडुकरांचा धानपिकांमध्ये वावर सुरू आहे.

ठळक मुद्देशेतकरी संकटात : वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभूर्णा : तालुका परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रानडुकरांचा धानपिकांमध्ये वावर सुरू आहे. धान पीक गर्भाशयात असतापासूनच रानडुकरांचा त्रास होत असल्याने स्थानिक शेतकºयांनी जागल करून फटाके फोडून अख्खी रात्र काढत आहेत. आता धान कापणीला सुरुवात झाली असून कापणी केलेल्या धानपिकालाही रानटी डुकरे उद्ध्वस्त करीत असल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाले आहेत.पेरणीपासून तर पीक हातात येईपर्यंत परिसरातील शेतकरी डोळ्यात तेल घालून दिवसंरात्र पिकांचे रक्षण करीत आहेत. सध्याच्या हंगामात परिसरामध्ये धानपिकाच्या कापणीला जोमात सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून महागडी खते, औषधी वापरून पिकांच्या वाढीसाठी शेतकºयांनी प्रचंड प्रमाणामध्ये खर्च केला. मात्र हातात आलेल्या पिकांवर आता रानटी डुकरांचा हैदोस सुरू झाल्याने या उपद्रवाला रोखण्यासाठी शेतकरी असमर्थ ठरत आहे.शेतशिवारातील झुडपी जंगलात वाघ, बिबट, अस्वल या हिंस्त्र वन्यप्राण्यांची भिती असतानाही आपल्या जीवाची पर्वा न करता पिकांच्या संरक्षणासाठी जावे लागत आहे. या परिसरामध्ये रानटी डुकरांचा प्रताप भयानक वाढला असून ही निर्ढावलेली रानडुकरे पीक तुडवून शेताच्या धुºया पाºयांची सुद्धा नासधुस करतात. शेताभोवती तारेचे कुंपन केले असले तरीही त्याला न जुमानता शेतामध्ये मुसंडी मारतात. त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास ते उलट चाल करून शेतकºयांच्या अंगावर धावतात. अनेकदा शेतकरी जखमी झाल्याचे प्रकार सुद्धा घडले आहेत. यामुळे परिसरातील नुकसानग्रस्त शेतकरी येथील वनविभाग कार्यालयामध्ये नुकसान भरपाई मिळण्यासाठी विनंती अर्ज सादर करीत आहेत.त्यानुसार पोंभूर्णा येथील वनविभागाचे क्षेत्र सहायक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सहारे हे नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेतामध्ये जावून धानपिकांची पाहणी करीत आहेत. यामध्ये वनविभागाकडून योग्य पंचनामा करून तोगडी मदत न देता नुकसानीच्या अनुषंगाने नुकसान जास्त आणि मदत अल्प अशी अवस्था न करता धानपिकांच्या सुरू असलेल्या भावनानुसार मदत देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे. याची वनविभागाने दखल घेण्याची गरज असून अन्यथा शेतकºयांच्या रोषाला बळी पडावे लागणार आहे.उत्पादन कमी होण्याची शक्यतायेनबोडी : बल्लारपूर तालुक्यात पळसगाव, किन्ही, मानोरा, इटोली, कवडजई या क्षेत्रात खरीप हंगामात धान पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. ऐन धान निसवा होण्याच्या कालावधीत पिकावर करपा, मावा, तुडतुडा या रोगाने ग्रासल्याने अनेक शेतकºयांचे उभे धान पीक तणस झाले. हा रोग या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. त्यामुळे अनेक शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. हवालदिल झालेल्या शेतकºयांना शासनाकडून आर्थिक मदत द्यावी व धान पिकावरील कर्ज माफ करावे, अशी शेतकºयांकडून मागणी होत आहे. यावर्षीच्या धान पिकाच्या निकषावरुन मागील वर्षीच्या तुलनेत धानाचे उत्पादन निम्याहून कमी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेवून कृषी विभागाने रब्बी पिकाकडे लक्ष वेधने गरजेचे आहे. चिंतातूर झालेल्या शेतकºयांना दिलासा देवून त्यांना रब्बी पिकासाठी मार्गदर्शन करून मोफत बियाणे पुरवठा करावा व शेतीबद्दल चिकाटी कायम ठेवण्यासाठी शेतकºयांच्या पेरणीपासून तर मळणीपर्यंत मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.