शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

रानडुकराच्या धुमाकुळाने धानपीक संकटात

By admin | Updated: November 7, 2016 01:27 IST

गोंडपिंपरी तालुक्यातील शेतकऱ्यांना दरवर्षीच अस्मानी व सुल्तानी संकटाचा सामना करावा लागतो.

शेतकरी चिंतेत : डोळ्यादेखत पिकाची नासाडी आक्सापूर : गोंडपिंपरी तालुक्यातील शेतकऱ्यांना दरवर्षीच अस्मानी व सुल्तानी संकटाचा सामना करावा लागतो. तालुक्यात सिंचनाची कुठलीच सुविधा नाही. निसर्गावर अवलंबून शेतकरी शेती करतात. सतत दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात डोळ्यादेखत रानडुकराचे कळप धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे हाती आलेले पीक नष्ट होत असल्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. यात तो पुरता खचून जावून आर्थिक संकटात सापडला आहे.गोंडपिंपरी तालुक्यातील आक्सापूर परिसरातील करंजी, धानापूर, बोरगाव, चेलबेरडी, गणपूर, चेकपेलूर शेतशिवारात धानपिक हे शेवटच्या टप्प्यात आहे. शेतकरी रात्रीच्या वेळी जिवाची पर्वा न करता मारोशी टाकून रात्रभर जागल करतात. परंतु त्याच वेळेस रानडुकराचे कळप येवून त्यांच्या डोळ्यादेखत संपूर्ण धानपिक उपडून टाकून नासाडी करीत आहेत. परंतु मोठ्या कष्टाने पिकवलेले धानपीक नष्ट होताना पाहून शेतकऱ्यांचे डोळे पाणावत आहेत. होणारे नुकसान मुकाटपणे सहन केल्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय नाही. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी वनविभागावर असते. मात्र दरवर्षीच शेतकऱ्यासाठी डोकेदुखी ठरणाऱ्या रानडुकराच्या बंदोबस्ताकडे प्रशासनाकडून कुठलीही उपाययोजना केली जात नाही. याउलट शेतकऱ्यांनी बंदोबस्ताची उपाययोजना केल्यास कायद्याच्या कचाट्यात शेतकरी फसला जातो. असाच एक प्रकार नुकताच परिसरातील धानापूर येथे घडला. रानडुकराच्या बंदोबस्ताकरिता प्रशासनाकडून कोणतीही उपायोजना केली जात नसल्यामुळे शेतकऱ्याकडून रोष व्यक्त होत आहे. (वार्ताहर)