शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

रानडुकरांकडून आता धानपुजण्यांची नासाडी

By admin | Updated: December 3, 2015 01:21 IST

सततच्या नापिकीमुळे आधीच डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

शेतकरी चिंतेत : रस्ता नसल्याने धान मळणीची कामे खोळंबलीपोंभुर्णा : सततच्या नापिकीमुळे आधीच डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अपुऱ्या सोयीसुविधांमुळे ग्रामीण शेतकरी पुरता हतबल झाला आहे. धानपिकावर अनेक विविध रोगांनी आक्रमण केल्याने काही प्रमाणात तग धरून असलेले पीक हातात आले. मात्र केवळ पांदण रस्ता नसल्याने रामपूर दीक्षित परिसरातील शेतकऱ्यांना धानपिक काढणे कठीण झाले आहे. यामुळे मळणीचे कामे थांबली असून रानटी डुकरांनी शेतात असलेल्या पुजन्यांवर हल्ला चढविला आहे. त्यामुळे धानपिकाची प्रचंड नासाडी होत आहे.पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द ग्रामपंचायतीअंतर्गत सन २०११ मध्ये रामपूर दीक्षित येथील शेतशिवारामध्ये अंगणवाडी क्र. ३ ते चिंतामण शिंदे यांच्या शेतापर्यंत ३ कि.मी. अंतराचा पांदण रस्ता ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला. त्यावर मातीकाम करण्यात आले. परंतु सदर रस्ता चार वर्षे लोटून सुद्धा केवळ मध्यभागी अपूर्ण ठेवण्यात आल्याने शासनाच्या लाखो रुपये खर्च केलेल्या निधीचा चुराडा झाला आहे. परिसरातील शेतकऱ्यांना मात्र या रस्त्याचा काहीच उपयोग होत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांना कापणी केलेले धानपिक मळणी करणे अवघड झाले आहे. केवळ रस्त्याअभावी रानटी डुकरांकडून प्रचंड नुकसान सहन करण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे.सदर अपूर्ण रस्ता पूर्ण करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी अनेकदा वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला आहे. परंतु, या अपूर्ण रस्त्यामागे कुठल्या अडचणी आहेत, हे जाणून घ्यायला स्थानिक अधिकारी व लोकप्रतिनिधींना वेळ नाही. सदर रस्ता पूर्ण झाल्याशिवाय इतर रस्त्याची कामे करण्यात येऊ नये, असे लेखी निवेदन स्थानिक शेतकऱ्यांनी संवर्ग विकास अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे दिले होते. परंतु संवर्ग विकास अधिकारी लोकरे यांनी संबंधित रस्त्याची पाहणी करून संबंधित प्रकरणात एका शेतकऱ्यांनी वाद घातला असल्याने हा रस्ता वादग्रस्त असून तहसीलदार यांच्याकडे प्रकरण सोपविल्याचे सांगितले. परंतु शेतकऱ्यांना यामुळे किती त्रास सहन करावे लागत आहे, याचे कुणालाच देणे-घेणे नसल्याचे सध्या दिसून येत येत आहे. यात शेतकऱ्यांचेच मोठे नुकसान होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. (तालुका प्रतिनिधी)