शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

रामपूरवासीयांना मिळाले पाणी

By admin | Updated: June 2, 2017 00:41 IST

तालुक्यातील देवाडा खुर्द ग्रामपंचायततंर्गत येत असलेल्या रामपूर दीक्षित येथे पाण्याची भीषण टंचाई होती.

पायपीट थांबली : इंजिनच्या साह्याने पाण्याचा पुरवठानिळकंठ नैताम । लोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : तालुक्यातील देवाडा खुर्द ग्रामपंचायततंर्गत येत असलेल्या रामपूर दीक्षित येथे पाण्याची भीषण टंचाई होती. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच, प्रशासनाने दखल घेत शेतातील एक कि.मी. अंतरावरील विहिरीचे पाणी रामपूर दीक्षित येथील कोरड्या विहिरीत सोडले. त्यामुळे या विहिरीमध्ये ५ फुट पाणी जमा झाले आहे. त्यामुळे येथील नागरिक व महिलांना दिलासा मिळाला आहे.पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या रामपूर दीक्षित गावात भिषण पाणी टंचाई होती. येथील महिला गावालगत असलेल्या एका शेतातील खड्यातील पाण्यावर आपली तहान भागवत होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. सदर वृत्ताने प्रशासनात खळबळ उडाली. त्यामुळे जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पोंभुर्णा येथील पाणी टंचाई संबंधीत आढावा बैठक घेतली. व अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.त्यानंतर स्थानिक अधिकारी व पं.स. पोंभुर्णाचे संवर्ग विकास अधिकारी शशीकांत शिंदे व उपसंवर्ग विकास अधिकारी डॉ. उत्कर्ष वाघरे यांनी देवाडा खुर्द येथील सरपंच विलास मोगरकार व ग्रामािवकास अधिकारी दंडारे यांच्या सहकार्याने येथील पाणी विषयक समस्या सोडविण्यासाठी गावाशेजारील विहिरीचे पाणी गावातील विहिरीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर किसन सातरे यांचे शेतातील विहिरीतील पाणी साफ करण्यात आले. मात्र सदर पाणी पिण्यायोग्य नसल्याने गावांपासून एक कि.मी. अंतरावर असलेल्या भाऊजी घोंगडे यांचे शेतातील विहिरीतील पाणी साफ करून रामपूर दीक्षित येथे नळयोजनेच्या पाईपला विहिरीतील इंजनचे कनेक्शन जोडले. मात्र पाईल लिकेज असल्यामुळे ते पाणी गावामध्ये पोहचू शकले नाही. त्यानंतर इंजिनद्वारे साठ ते सत्तर पाईप जोडून थेट रामपूर दीक्षित येथील कोरड्या विहिरीमध्ये पाणी सोडले. त्यामुळे या विहिरीमध्ये आता ५ फुटाचे वर पाणी जमा आहे. गावामध्ये आता पाणी उपलब्ध झाल्याने येथील महिला वर्गाला फार मोठा दिलासा मिळाला आहे.एप्रिलमध्ये विहिरी कोरड्यारामपूर दीक्षित येथे दोन हातपंप व एक विहिर आहे. यातील एक हातपंप अनेक महिन्यांपासूनच बंद आहे. तर दुसरे हातपंपातून पाहिजे तसे पाणी मिळत नाही. तर येथील विहिर मार्च-एप्रिल महिन्यातच कोरडी पडत असते. त्यामुळे या गावातील महिला गावालगत असलेल्या दामोधर घोंगडे यांच्या शेतातील खड्ड्यातील पाण्यावर आपली तहान भागवत असतात. ही समस्या या गावात अनेक वर्षांपासून आहे. भारत निर्माण योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करावीदेवाडा खुर्द येथील भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. गावात पाणी टंचाई असताना आठ वर्षांपासून ही योजना कार्यान्वित नाही. मात्र या योजनेसाठी ५४ लाख रुपये खर्च करण्यात आले. तो निधी व्यर्थ गेला काय, असा सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या कामाची वरिष्ठांकडून चौकशी करावी. यातील दोषी असलेले अध्यक्ष व कंत्राटदार तसेच इतर सदस्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.