शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

रामदेगी-संघारामगिरीच्या निसर्गाची पर्यटकांना भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 23:09 IST

रामायणात प्रभू श्रीराम व सीता मातेला १४ वर्षांचा वरवास झाला होता. या काळात प्रभू श्रीराम व सीता माता यांनी रामदेगी - संघारामगिरी जंगलात वास्तव्यास होते. असे जाणकार सांगतात. प्रभू राम व सीता मातेच्या वास्तव्याने पावन झालेल्या रामदेगी परिसरात निसर्गरम्य परिसर, चंदई नाला प्रकल्प, संघारामगिरीची टेकडी, धबधबा, पाण्याची सात कुंडे आहे. पावसाळ्यात हा परिसर पर्यटकांना भुरळ घालत आहे. यामध्ये तरुणांची संख्या अधिक आहे.

ठळक मुद्देचला पर्यटनाला : विदर्भातील पर्यटक व तरुणाईची विकेंडला गर्दी
<p>आशिष गजभिये।लोकमत न्यूज नेटवर्कखडसंगी : रामायणात प्रभू श्रीराम व सीता मातेला १४ वर्षांचा वरवास झाला होता. या काळात प्रभू श्रीराम व सीता माता यांनी रामदेगी - संघारामगिरी जंगलात वास्तव्यास होते. असे जाणकार सांगतात. प्रभू राम व सीता मातेच्या वास्तव्याने पावन झालेल्या रामदेगी परिसरात निसर्गरम्य परिसर, चंदई नाला प्रकल्प, संघारामगिरीची टेकडी, धबधबा, पाण्याची सात कुंडे आहे. पावसाळ्यात हा परिसर पर्यटकांना भुरळ घालत आहे. यामध्ये तरुणांची संख्या अधिक आहे.नैसर्गिक सौंदर्य, राम-सीतेचे वास्तव्य असलेला परिसर, रथाच्या चाकांचे निशाण व चंदई नाला प्रकल्प बघण्यासोबतच या ठिकाणी पावसाळी पर्यटनाचा आनंद घेता येतो. चिमूर-वरोरा राष्ट्रीय महामार्गावरील गुजगवान गावावरून पूर्वेस ५ किमी अंतरावर असलेल्या रामदेगीला जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. या ठिकाणी मार्गशीष महिन्यात पाच सोमवारी यात्रा भरते. यावेळी हजारो भाविक व पर्यटक या ठिकाणी येतात. रामदेगीचा इतिहास जुना आहे. रामदेगी हे ऋषिमुनींचे तपस्या करण्याचे ठिकाण होते.रामदेगीचा परिसर सण १९५५ ला निर्माण झाला असून ताडोबा अभयारण्याचा एक भाग आहे.रामदेगी ला एक पुरातन काळातील देवस्थान आहे.हे मंदिर काळ्या दगडांनी निर्माण केलेल आहे. या मंदिरात शिवलिंग व चार फूट उंचीची पितळी मूर्ती आहे. यासोबतच परिसरात राम, लक्ष्मण , सीता बजरंगबली व विठ्ठल-रुक्मिनीची मंदिरे आहेत. मंदिराची स्थापना १९५८ ला झाली. टेकडीवरून बघितलं की हिरवाई ने नटलेला जंगलाचा परिसर, मंदिर, तलावाच चित्र बघून मनाला वेगळाच आनंद निर्माण होतो. जमनागडपासून उत्तरेला श्रीरामांच्या वास्तव्याची जागा आहे. या ठिकाणास भीमनचापरा मनून ओळखले जाते. त्या ठिकाणी श्रीराम विश्रांती घ्यायचे. मंदिरापासून भीमचापरा हा प्रवास पर्यटकांना अचंबित करणारा ठरते. पण आता काही दिवसांपासून वन विभागामार्फत वन्य प्राण्याचा वावर असल्याचे कारण देऊन प्रवेश नाकारला जात आहे. याच परिसरात टेकडीवरती वाघांच्या गुंफा बघावयास मिळतात. एका उंच ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुतळा आहे. शिवमंदिर जवळच गायमुख आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस उंचावरून वाहत असलेले पाणी कुंडात सामाविष्ट होते. या धबधब्यावर सध्या विशेषत: तरुणाई आनंद घेताना दिसत आहे. याच रामदेगीला बौद्ध बांधव संघारामगिरी नावाने संबोधित करतात. पूर्वी सम्राट अशोकाचे राज्यकाळात भारत बौद्धमय होता. भिमानचापरा परिसरात बौद्धकालीन आसन आहे. याचा संबंध भगवान बुद्धांशी निगडित असल्याने या ठिकाणी बौद्ध भिख्खू नेहमी वास्तव्यास असतात. टेकडीवरती बौद्ध विहारे आहेत.आषाढी पौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत बौध्द भिक्खुचा वर्षावस या ठिकाणी चालतो.विदेशातील बौद्ध भिख्खू सुद्धा या ठिकाणी येत असतात.ताडोबा व्याघ्र प्रकल्पजवळच हे स्थळ येते. या ठिकाणी गेल्यानंतर हिरवळीने नटलेल्या टेकड्याचा परिसर बघून मन आनंदित होते. हे क्षेत्र वनपरिक्षेत्र खडसंगी (बफर) अंतर्गत असल्याने प्लास्टिक मुक्त आहे. या ठिकाणी येणाऱ्या वाहनांच्या नोंदी वन नाकावरती करण्यात येतात. सुरक्षेच्या दृष्टीने वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी असतात. अलीकडच्या काळात विदभार्तील विध्यार्थ्याच्या शैक्षणिक शालेय सहलींचे प्रमाण जास्त दिसून येते. सुट्यांच्या काळात या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ असते. या ठिकाणी वाघ, बिबट, अस्वल, हरीण इत्यादी प्राण्यांचे वास्तव्य दिसून येते.रामदेगी हा परिसर निसर्गरम्य असून पर्यटनाच्या दृष्टीने योग्य असा आहे. या ठिकाणी असलेल्या धबधब्या वर भिजून आनंद घेतला. बौद्धविहाराचे दर्शन घेतले.- कृतिका शेंडे (पर्यटक), वर्धाया ठिकाणी मी पहिल्यांदाच आलोय. खूप सुंदर असा परिसर आहे. छान वाटले आज इकडे येऊन.- बंडू मेश्राम (पर्यटक),उमरेड, जि. नागपूर