शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

रमाई लाभार्थ्यांना दोन वर्षांपासून घरकुलाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:46 IST

नगर परिषदेच्या हलगर्जीपणामुळे रमाई घरकूल योजनेचे १३९ अर्ज दोन वर्षांपासून न. प. कार्यालयात धुळखात पडून होते. आता एक महिन्यापूर्वी मंजुरीसाठी ते समाज कल्याण विभागाच्या आयुक्त कार्यालयात पाठविण्यात आले असले तरी पाठपुरावा शून्य आहे. आणि इकडे लाभार्थी मात्र आज घर मिळेल, उद्या घर मिळेल या आशेवर आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नगर परिषदेच्या हलगर्जीपणामुळे रमाई घरकूल योजनेचे १३९ अर्ज दोन वर्षांपासून न. प. कार्यालयात धुळखात पडून होते. आता एक महिन्यापूर्वी मंजुरीसाठी ते समाज कल्याण विभागाच्या आयुक्त कार्यालयात पाठविण्यात आले असले तरी पाठपुरावा शून्य आहे. आणि इकडे लाभार्थी मात्र आज घर मिळेल, उद्या घर मिळेल या आशेवर आहेत.नागभीड न.प.ने रमाई घरकूल योजनेचे दोन वर्षांपूर्वीच अर्ज मागविले होते. मात्र या अर्जांचा पाठपुरावाच न झाल्याने या योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलांपासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी या लाभार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.नागभीड न.प.ने रमाई घरकूल योजनेंतर्गत नागभीड न. प. क्षेत्रातील नागरिकांकडून अर्ज मागविले. जवळपास १७४ लाभार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले होते, अशी माहिती आहे. हे अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जांची छाननी करून अर्जामध्ये काय त्रुटी आहेत याची कल्पना अर्जदारांना देऊन त्या त्रुटींची पूर्तता करून परिपूर्ण अर्ज समाजकल्याण विभागाकडे पाठविणे नगर परिषदेचे काम होते. पण न.प.ने अर्ज प्राप्त झाल्यानंतर केवळ अर्जदारांची यादीच समाजकल्याण विभागाकडे पाठविली होतीे. आणि अर्जांचे गठ्ठे नगर परिषदेतच ठेवले. दरम्यान योजनेसंदर्भात लाभार्थ्यांनी नगर परिषदेत येऊन विचारणा सुरू केल्यानंतर ही बाब नगर परिषदेच्या लक्षात आली. या अर्जांची शोधाशोध सुरू झाली. अर्ज मिळाल्यानंतर अतिशय घिसाडघाईत या १७४ अर्जांची छाननी करून यातील १३९ अर्जांची रवानगी समाजकल्याण विभागाकडे करण्यात आली. मात्र अर्जामध्ये विविध त्रुट्या असल्याच्या सबबीवरून या कार्यालयाने हे संपूर्ण अर्ज परत पाठविले, अशी माहिती आहे. यानंतर त्रुटयांची दुरूस्ती करून हे अर्ज पुन्हा पाठविण्यात आले असले तरी या अर्जांची स्थिती काय आहे, याची शहानिशा करण्यास नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना सवड नाही.या योजनेसंदर्भात नागभीड न.प.ने कमालीचा हलगर्जीपणा दाखविला. वेळेवर प्रक्रिया पार पाडली असती तर लाभार्थ्यांना दोन वर्ष वाट पाहावी लागली नसती. नगर परिषदेचे लक्ष्य केवळ सिमेंटच्या रस्ते व नाल्यांकडे आहे. आता तरी न.प.ने पाठपुरावा करावा.- प्रतिक भसीननगरसेवक, न. प. नागभीड