शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

राखी पौर्णिमा बंध रेशमाचे, वचन रक्षणाचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 23:01 IST

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन घेवून आला श्रावण. लाख लाख शुभेच्छा तुला आज बहीण भावाचा पवित्र सण, श्रावणात इतर सणांच्या बरोबरीने येणारा महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन. राखी पोर्णिमेची उत्सुकता प्रत्येक भावाबहिणीत असते, अगदी आता-आतापर्यंत रक्षाबंधनासाठी सगळी भावंडे एकत्र जमत असतात.

ठळक मुद्देरक्षाबंधन : दूरदेशी भावासाठी इंटरनेटवरूनही पाठविली जाते राखी

लोकमत न्यूज नेटवर्कविरूर (स्टे) : रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन घेवून आला श्रावण. लाख लाख शुभेच्छा तुला आज बहीण भावाचा पवित्र सण, श्रावणात इतर सणांच्या बरोबरीने येणारा महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन.राखी पोर्णिमेची उत्सुकता प्रत्येक भावाबहिणीत असते, अगदी आता-आतापर्यंत रक्षाबंधनासाठी सगळी भावंडे एकत्र जमत असतात. शिक्षणासाठी किंवा अन्य कारणांसाठी दूर गावी असलेला भाऊ या काळात घरी येवून राखीचा सण साजरा करतात. लग्न झालेल्या बहिणीच्या घरी यानिमित्ताने जावून भाऊ राखी बांधतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या सणाला भावा-बहिणीची भेट होत असते. माऊलीचे ममत्व यावेळी तिच्या डोळ्यात तळत असते, त्यामुळे बहीण भावाच्या या सणाला फार महत्त्व आहे.आता मात्र परिस्थिती बरीच बदललेली आहे. अजा नोकरीच्या, शिक्षणाच्या निमित्ताने भाऊ बहीण अंतराने अधिक दूर गेले आहेत, तर काही परदेशात आहेत. त्यामुळे कितीही ओढ असली तरीही फक्त या सणापुरते येवून राखी बांधणे शक्य नसते. त्यासाठी कुरिअरने राखी पाठविली जात आहे. बाजारातही वेगवेगळ्या किंमतीच्या आणि पॅटर्नच्या राख्या विक्रीला असून चांदीच्या राख्या घेण्याकडे कल वाढला आहे. आता तर राखीवर नेते, राजकीय पुढारी, अन्ना हजारेही दिसायला लागले आहे.दूरदेशी असलेल्या भावाला इंटरनेटमुळे आॅनलाईन राखी आता पाठवता येऊ शकते, अशाप्रकारे राखी पाठविण्याकडे अनेक जण उत्सुक आहेत. हा भाऊ बहिणींना आधार मिळाला आहे. राखी पाठविली असली तरी ओवाळणी करता येणार नाही. ही रुखरुख दोघांच्याही मनात असते. बदलत्या परिस्थितीत एकमेकांच्या वेळेचा अंदाज घेवून वॅबकॅमवर भेटून आता ओवाळणी होते. ज्येष्ठ नागरिक भावाबहिणीसाठी हा सण खूपच महत्त्वाचा असतो. तेही रक्षाबंधन साजरा करीत असतात. लहान मुलांसाठी हा सण खूपच आनंदायी असतो, वर्षे न वर्षे वय असलेल्या भावाच्या हातावर गोंद्याची राखी बांधतांना बहिणीला आणि बहिण जर लहान असेल तर भावाला राखी बांधून घेताना खूप अप्रूप वाटते. त्यामुळे त्यांच्यात एक वेगळा उत्साह असतो. सामाजिक कार्यकर्त्यांसाठी राखीचा सण हा वेगळा नसतोच, अशा लोकांची सतत भ्रमंती सुरू असते. घर ही संकल्पना त्यांच्यासाठी दुयम असते, दूरवर असलेले देशाला संरक्षण देणारे सैनिकांना मात्र कधी कधी रक्षाबंधनाला घरी येऊ शकत नाही. त्यांना फार मोठा खेद वाटतो. बंदीस्त असलेल्या कैदांनाही काही महिला राखी बांधतात, त्यामुळे रक्षाबंधनाला फार महत्त्व आहे.