शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

राखी पौर्णिमा बंध रेशमाचे, वचन रक्षणाचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 23:01 IST

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन घेवून आला श्रावण. लाख लाख शुभेच्छा तुला आज बहीण भावाचा पवित्र सण, श्रावणात इतर सणांच्या बरोबरीने येणारा महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन. राखी पोर्णिमेची उत्सुकता प्रत्येक भावाबहिणीत असते, अगदी आता-आतापर्यंत रक्षाबंधनासाठी सगळी भावंडे एकत्र जमत असतात.

ठळक मुद्देरक्षाबंधन : दूरदेशी भावासाठी इंटरनेटवरूनही पाठविली जाते राखी

लोकमत न्यूज नेटवर्कविरूर (स्टे) : रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन घेवून आला श्रावण. लाख लाख शुभेच्छा तुला आज बहीण भावाचा पवित्र सण, श्रावणात इतर सणांच्या बरोबरीने येणारा महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन.राखी पोर्णिमेची उत्सुकता प्रत्येक भावाबहिणीत असते, अगदी आता-आतापर्यंत रक्षाबंधनासाठी सगळी भावंडे एकत्र जमत असतात. शिक्षणासाठी किंवा अन्य कारणांसाठी दूर गावी असलेला भाऊ या काळात घरी येवून राखीचा सण साजरा करतात. लग्न झालेल्या बहिणीच्या घरी यानिमित्ताने जावून भाऊ राखी बांधतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या सणाला भावा-बहिणीची भेट होत असते. माऊलीचे ममत्व यावेळी तिच्या डोळ्यात तळत असते, त्यामुळे बहीण भावाच्या या सणाला फार महत्त्व आहे.आता मात्र परिस्थिती बरीच बदललेली आहे. अजा नोकरीच्या, शिक्षणाच्या निमित्ताने भाऊ बहीण अंतराने अधिक दूर गेले आहेत, तर काही परदेशात आहेत. त्यामुळे कितीही ओढ असली तरीही फक्त या सणापुरते येवून राखी बांधणे शक्य नसते. त्यासाठी कुरिअरने राखी पाठविली जात आहे. बाजारातही वेगवेगळ्या किंमतीच्या आणि पॅटर्नच्या राख्या विक्रीला असून चांदीच्या राख्या घेण्याकडे कल वाढला आहे. आता तर राखीवर नेते, राजकीय पुढारी, अन्ना हजारेही दिसायला लागले आहे.दूरदेशी असलेल्या भावाला इंटरनेटमुळे आॅनलाईन राखी आता पाठवता येऊ शकते, अशाप्रकारे राखी पाठविण्याकडे अनेक जण उत्सुक आहेत. हा भाऊ बहिणींना आधार मिळाला आहे. राखी पाठविली असली तरी ओवाळणी करता येणार नाही. ही रुखरुख दोघांच्याही मनात असते. बदलत्या परिस्थितीत एकमेकांच्या वेळेचा अंदाज घेवून वॅबकॅमवर भेटून आता ओवाळणी होते. ज्येष्ठ नागरिक भावाबहिणीसाठी हा सण खूपच महत्त्वाचा असतो. तेही रक्षाबंधन साजरा करीत असतात. लहान मुलांसाठी हा सण खूपच आनंदायी असतो, वर्षे न वर्षे वय असलेल्या भावाच्या हातावर गोंद्याची राखी बांधतांना बहिणीला आणि बहिण जर लहान असेल तर भावाला राखी बांधून घेताना खूप अप्रूप वाटते. त्यामुळे त्यांच्यात एक वेगळा उत्साह असतो. सामाजिक कार्यकर्त्यांसाठी राखीचा सण हा वेगळा नसतोच, अशा लोकांची सतत भ्रमंती सुरू असते. घर ही संकल्पना त्यांच्यासाठी दुयम असते, दूरवर असलेले देशाला संरक्षण देणारे सैनिकांना मात्र कधी कधी रक्षाबंधनाला घरी येऊ शकत नाही. त्यांना फार मोठा खेद वाटतो. बंदीस्त असलेल्या कैदांनाही काही महिला राखी बांधतात, त्यामुळे रक्षाबंधनाला फार महत्त्व आहे.