शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

रासायनिक खत दरवाढ धोरणाविरूद्ध राकाँची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:28 IST

चंद्रपूर : खरीप हंगाम तोंडावर असताना केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे रासायनिक खतांचे दरवाढ झाल्याचा आरोप करून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने ...

चंद्रपूर : खरीप हंगाम तोंडावर असताना केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे रासायनिक खतांचे दरवाढ झाल्याचा आरोप करून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, सिलिंडर व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ केल्याने सर्वसामान्य जनतेचे हाल सुरू आहेत. याबाबत काहीही धोरण न ठरविता केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत ४० टक्के दरवाढ केली, असा आरोप जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी केला.

एक वर्षापासून शेतकरी कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत आहेत. दरवाढ करून मोदी सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.

पेट्रोलचे दर शंभर रूपयांच्या वर गेले आहे. त्यामुळे ही दरवाढ कमी करून शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे, अशी मागणी राकाँने केली. दरम्यान, राकाँ कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविराेधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके, हिराचंद बोरकुटे, महादेव पिदूरकर, माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, डी. के. आरीकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील दहेगावकर, जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे, ग्राहक सेलचे देव कन्नाके, डॉ. आनंद अडबाले, शरद मानकर, राजेंद्र आखरे, वंदना आवळे, दिलीप पिट्टूलवार, प्रमोद देशमुख, मनोहर जाधव, पुरुषोत्तम वाघ, देविदास रामटेके, किशोर आवळे, डॉ. रमेश वरहाटे, संपत अरेल्ली, सरस्वती गावंडे, सुमित्रा वैद्य, नीता पिंपळकर, असिफ शेख,विठ्ठल पिंपळकर आदी सहभागी झाले होते.