शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

कोसळलेल्या राजस्थानी जहाजला राजुरावासीयांनी दिला आधार

By admin | Updated: February 16, 2016 01:55 IST

राजस्थानातून महाराष्ट्रात चारा-पाण्याच्या शोधात आलेल्या मेंढपाळांनी आपल्या चालू व उठू न शकणाऱ्या आजारी उंटाला राजुरा

नितीन मुसळे ल्ल सास्तीराजस्थानातून महाराष्ट्रात चारा-पाण्याच्या शोधात आलेल्या मेंढपाळांनी आपल्या चालू व उठू न शकणाऱ्या आजारी उंटाला राजुरा येथील वर्धा नदीच्या तिरावर सोडून ते निघून गेले. ते असहाय्य मुके जनावर मात्र आपल्याला-कुणाचा आधार मिळेल का, या आशेने मागील १०-१२ दिवसांपासून पडून होते. यातच सहकार्याची भावना जोपासणाऱ्या राजुरा शहरातील काही नागरिकांनी गेल्या ८-१० दिवसांपासून त्या उंटाला खाऊ-पिऊ घालून औषधोपचार सुरू केले आहेत. मात्र अजुनही त्याची प्रकृती ठीक होत नसल्याने व त्याला इतर कुठला आधार मिळत नसल्याने कुणाचा तरी नक्कीच आधार मिळेल व त्या उंटाचे प्राण वाचेल, या आशेने प्रयत्न सुरू आहे.उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की महाराष्ट्रात चारा व पाण्याच्या शोधात वाळवंटी जहाज म्हणून ओळखले जाणारे उंट दरवर्षी येत असतात. इतक्या लांबून येणारे हे काफीले दिवसरात्रं प्रवास करून महाराष्ट्रातील विविध भागात पाणी व चारा शोधून आपल्या जनावरांची जोपासना करतात. असाच एक काफीला काही दिवसांपूर्वी राजुरा तालुक्यातून पुढील प्रवासाकरीता जाताना दिसला. परंतू या काफील्यातील एक भला मोठा उंट आजाराने ग्रस्त होता. त्याला चालणे तर सोडाच पण उठणेही कठीण झाले होते. त्याच्या कमरेकडील भाग निकामी झाल्यासारखा आहे. अशाच स्थितीत असलेल्या व आपल्या पुढील प्रवासाकरीता चालू न शकणाऱ्या उंटाला मात्र मेंढपाळांनी निर्दयपणे वाटेतच सोडून दिले. त्यांनी त्याच्यावर उपचार करण्याचाही प्रयत्नही केला असेल. परंतु शक्य न झाल्याने जीवावर दगड ठेवून ते त्याला तिथेच सोडून निघून गेले. त्यामुळए ते असहाय्य उंट आपल्या कुणीतरी सहकार्य करेल, या आशेने पडून आहे. अशा स्थितीत रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना त्याच्याकडे पाहून दयेचा पाझर फुटला. मात्र कुणालाच काही करणे शक्य होत नव्हते. मनात असूनही काही शक्य होत नसल्याने हळहळ व्यक्त करीत लोक निघून जात होते. परंतु सहकार्याची भावना जोपासणारे राजुरा येथील प्रभात फेरी मंडळाचे रमेश सारडा, शंकर झंवर, सचिन जैन, बाबू जैन, देवीलाल त्रिवेदी, गोपाल पुरोहीत, यशवंत मेहता, राधेशाम सोनी, गोपी नावंधर, पूनम शर्मा, डॉ. कतवारे यांच्यासह इतर युवकांनी उंटाला मदत करून त्याचे प्राण वाचविण्याचे ठररविले. त्याला मागील ८-१० दिवसांपासून चारा व पाणी देत आहेत. त्यावर औषधोपचारही करीत आहे. यासाठी राजुराचे पशुधन विकास अधिकारी डॉ. झिल्लेवार यांच्या मार्गदर्शनात पशुधन पर्यवेक्षक डॉ. बलसरे, डॉ. रामटेके हे औषधोपचार करीत आहे. औषधोपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला योग्य स्थळी हलविणे गरजेचे आहे. उंटाची प्रकृती चिंताजनक असून त्यावर उपचार सुरू आहेत. परंतु त्याला योग्य ठिकाणी हलविणे गरजेचे आहे. त्याला हलविण्याचा प्रयत्न केल्या गेला. परंतु ते शक्य होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यासाठी क्रेनचीच आवश्यकता आहे. त्याला नेमके न्यायचे कुठे हा सुद्धा मोठा प्रश्नच आहे.- संदीप जैन, प्रभात फेरी मंडळ सदस्य, राजुराराजस्थानच्या वाळवंटी उंटाची दयनिय अवस्था झाली असून मुक्या प्राण्याला बेवारस सोडून देणे चुकीचे आहे. त्याचे प्राण वाचविणे गरजेचे आहे. राजुरा शहरातील प्रभात फेरी मंडळाचे सदस्य तसा प्रयत्न करीत आहे परंतु ते शक्य होत नसल्याने राजुरा वन विभागाने शक्य होत असल्यास पुढाकार घेऊन या उंटाला ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार करून त्याची जोपासना करावी.- नरेंद्र काकडे, तालुका अध्यक्ष, जैव विविधता समिती, राजुरा