शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

राजोली मामा तलावाखालील धान पिके धोक्यात

By admin | Updated: October 12, 2014 23:43 IST

राजोली मामा तलावाखालील धान पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. सिंचन विभागाच्या हलगर्जी कारभारामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसण्याची भीती वर्तविली जात आहे.

राजोली : राजोली मामा तलावाखालील धान पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. सिंचन विभागाच्या हलगर्जी कारभारामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसण्याची भीती वर्तविली जात आहे.यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे या तलावात जेमतेम पाणी जमा झाले. या पाण्याचे योग्य नियोजन झाले असते तर त्याचा सर्व शेतकऱ्यांना लाभ झाला असता. तेवढा जलसाठाही उपलब्ध होता. परंतु सिंचन विभागाने याकडे दुर्लक्ष करुन ही बाब गांभिर्याने घेतली नाही. नियोजनाअभावी आता तलावात अत्यल्प जलसाठा उरला आहे. वरुनराजाने कृपा केली तरच पिके वाचू शकतील. अन्यथा तलावाखाली असणारे सर्वच धान करपून जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या सात ते आठ दिवसांपासून या तलावाच्या नुतनीकरणाची कामे सुरू आहेत. केवळ सांडव्याचे काम वगळता उर्वरित कामे अर्धवट करुन कंत्राटदाराने उन्हाळ्यातच काम बंद केले. या अर्धवट कामामुळे नहरातील पाणी वितरणात अडसर निर्माण होत आहे. नहराला सिमेंट अस्तरीकरण करताना तांत्रिक बाब तपासून न पाहता काम केल्यामुळे मुख्य गेट जवळच सुमारे दोन फुट पाणी अडून पडले आहे. वितरिकेची कामे तज्ज्ञ कामगारांकडून करवून घेण्यात न आल्याने त्यातून पाणी बाहेर पडतच नाही. काही ठिकाणी नहरात पाणी अडवून पाटचारीत पाणी टाकावे लागत आहे. या सर्व प्रकारामुळे पाण्याच फार मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असून सिंचन विभागाने या विषयात हात वर केले आहे. एवढ्यात जर वरुणराजाने कृपा झाली. जोरदार पावसाचे आगमन झाले तरच येथील धान पिके तग धरणार आहेत. अन्यथा हातचे पीक हिरावून घेतल्याचे दु:ख कास्तकाराना सोसावे लागणार आहे. (वार्ताहर)