शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

राजोली मामा तलावाखालील धान पिके धोक्यात

By admin | Updated: October 12, 2014 23:43 IST

राजोली मामा तलावाखालील धान पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. सिंचन विभागाच्या हलगर्जी कारभारामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसण्याची भीती वर्तविली जात आहे.

राजोली : राजोली मामा तलावाखालील धान पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. सिंचन विभागाच्या हलगर्जी कारभारामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसण्याची भीती वर्तविली जात आहे.यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे या तलावात जेमतेम पाणी जमा झाले. या पाण्याचे योग्य नियोजन झाले असते तर त्याचा सर्व शेतकऱ्यांना लाभ झाला असता. तेवढा जलसाठाही उपलब्ध होता. परंतु सिंचन विभागाने याकडे दुर्लक्ष करुन ही बाब गांभिर्याने घेतली नाही. नियोजनाअभावी आता तलावात अत्यल्प जलसाठा उरला आहे. वरुनराजाने कृपा केली तरच पिके वाचू शकतील. अन्यथा तलावाखाली असणारे सर्वच धान करपून जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या सात ते आठ दिवसांपासून या तलावाच्या नुतनीकरणाची कामे सुरू आहेत. केवळ सांडव्याचे काम वगळता उर्वरित कामे अर्धवट करुन कंत्राटदाराने उन्हाळ्यातच काम बंद केले. या अर्धवट कामामुळे नहरातील पाणी वितरणात अडसर निर्माण होत आहे. नहराला सिमेंट अस्तरीकरण करताना तांत्रिक बाब तपासून न पाहता काम केल्यामुळे मुख्य गेट जवळच सुमारे दोन फुट पाणी अडून पडले आहे. वितरिकेची कामे तज्ज्ञ कामगारांकडून करवून घेण्यात न आल्याने त्यातून पाणी बाहेर पडतच नाही. काही ठिकाणी नहरात पाणी अडवून पाटचारीत पाणी टाकावे लागत आहे. या सर्व प्रकारामुळे पाण्याच फार मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असून सिंचन विभागाने या विषयात हात वर केले आहे. एवढ्यात जर वरुणराजाने कृपा झाली. जोरदार पावसाचे आगमन झाले तरच येथील धान पिके तग धरणार आहेत. अन्यथा हातचे पीक हिरावून घेतल्याचे दु:ख कास्तकाराना सोसावे लागणार आहे. (वार्ताहर)