शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधी सचिवालय बांधकामात लाखोंचा अपहार ?

By admin | Updated: October 26, 2014 22:37 IST

ग्रामस्तरावर विकासाची परिपूर्ण जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडून येणारा लोकप्रतिनिधी हा जनता व विकास यामधील दुवा असतो. मात्र स्वस्वार्थापोटी विकास निधी जनकल्याणासाठी

गोंडपिपरी : ग्रामस्तरावर विकासाची परिपूर्ण जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडून येणारा लोकप्रतिनिधी हा जनता व विकास यामधील दुवा असतो. मात्र स्वस्वार्थापोटी विकास निधी जनकल्याणासाठी न वापरता त्याची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रकार तालुक्यात सुरू असून जि.प. अंतर्गत मंजूर लाखो रुपयांचे राजीव गांधी ग्राम सचिवालये बांधकाम तालुक्यात थंडबस्त्यात असल्याने मोठा अपहार झाला की काय, अशी शक्यता नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे.९८ गावाचा तालुका असलेल्या व आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त तसेच अतिदुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंडपिपरी तालुक्यात एकूण ५१ ग्रामपंचायती आहेत. शासन स्तरावरुन विविध जनकल्याणकारी योजनांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी ग्रा.पं. स्तरावर देण्यात येतो. मात्र गेल्या एक ते दोन वर्षापूर्वी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी सामाजिक योजना, पर्यावरण समृद्धी, लोककल्याण योजना या महत्वपूर्ण योजनांकडे विशेष लक्ष न देता केवळ बांधकाम व कंत्राट याकडे अधिक लक्ष घातल्याची माहिती आहे. अशातच तालुक्यात पदाधिकारीच कंत्राटदार हा फॉर्म्यूलाही मागील बऱ्याच वर्षापासून तालुक्यात सुरू आहे. याच दरम्यान तालुक्यातील काही ग्रा.पं.च्या पदाधिकाऱ्यांनी कागदी पाठपुरावा व राजकीय व जनाचा वापर करुन लक्षावधींची विकास कामे खेचून तर आणली. मात्र विकास कामांचे कंत्राट स्वत:कडेच राखल्याने कामांचा गुणवत्ता दर्जा मात्र खालावलेल्या पद्धतीचा असल्याचे अविधी लोटताच नागरिकांच्या लक्षात येत असल्याची माहिती आहे. शासनस्तरावरुन ग्रामपंचायत भवन उभारणी करीता राजीव गांधी ग्रामसचिवालय योजनेंतर्गत लक्षावधी रुपयांचा निधी मिळतो. यासाठीच तालुक्यातील बहुतांश ग्रा.पं.नी सचिवालय बांधकामास मंजुरीसह निधीही मिळविला. मात्र गेल्या दीड ते दोन वर्षापूर्वी अनेक ग्रा.पं.नी सचिवाल्यांचे बांधकाम सुरू केले. परंतु आजवर बांधकाम प्रगतिपथावर असल्याचे दाखवून काहींनी बांधकाम पूर्ण होण्या अगोदरच पूर्ण निधीची उचल केल्याचीही माहिती नागरिकांकडून मिळाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राजीव गांधी ग्राम सचिवालयांचे बांधकाम अपूर्ण असून बांधकाम निधीत मोठा अपहार झाल्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविली जात आहे. तरीही वरिष्ठांनी सदर गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. (तालुका प्रतिनिधी)