शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
5
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
6
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
7
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
8
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
9
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
10
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
11
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
12
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
13
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
14
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
15
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
16
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
17
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
18
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
19
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
20
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

राजीव गांधी सचिवालय बांधकामात लाखोंचा अपहार ?

By admin | Updated: October 26, 2014 22:37 IST

ग्रामस्तरावर विकासाची परिपूर्ण जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडून येणारा लोकप्रतिनिधी हा जनता व विकास यामधील दुवा असतो. मात्र स्वस्वार्थापोटी विकास निधी जनकल्याणासाठी

गोंडपिपरी : ग्रामस्तरावर विकासाची परिपूर्ण जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडून येणारा लोकप्रतिनिधी हा जनता व विकास यामधील दुवा असतो. मात्र स्वस्वार्थापोटी विकास निधी जनकल्याणासाठी न वापरता त्याची परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रकार तालुक्यात सुरू असून जि.प. अंतर्गत मंजूर लाखो रुपयांचे राजीव गांधी ग्राम सचिवालये बांधकाम तालुक्यात थंडबस्त्यात असल्याने मोठा अपहार झाला की काय, अशी शक्यता नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे.९८ गावाचा तालुका असलेल्या व आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त तसेच अतिदुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंडपिपरी तालुक्यात एकूण ५१ ग्रामपंचायती आहेत. शासन स्तरावरुन विविध जनकल्याणकारी योजनांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी ग्रा.पं. स्तरावर देण्यात येतो. मात्र गेल्या एक ते दोन वर्षापूर्वी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी सामाजिक योजना, पर्यावरण समृद्धी, लोककल्याण योजना या महत्वपूर्ण योजनांकडे विशेष लक्ष न देता केवळ बांधकाम व कंत्राट याकडे अधिक लक्ष घातल्याची माहिती आहे. अशातच तालुक्यात पदाधिकारीच कंत्राटदार हा फॉर्म्यूलाही मागील बऱ्याच वर्षापासून तालुक्यात सुरू आहे. याच दरम्यान तालुक्यातील काही ग्रा.पं.च्या पदाधिकाऱ्यांनी कागदी पाठपुरावा व राजकीय व जनाचा वापर करुन लक्षावधींची विकास कामे खेचून तर आणली. मात्र विकास कामांचे कंत्राट स्वत:कडेच राखल्याने कामांचा गुणवत्ता दर्जा मात्र खालावलेल्या पद्धतीचा असल्याचे अविधी लोटताच नागरिकांच्या लक्षात येत असल्याची माहिती आहे. शासनस्तरावरुन ग्रामपंचायत भवन उभारणी करीता राजीव गांधी ग्रामसचिवालय योजनेंतर्गत लक्षावधी रुपयांचा निधी मिळतो. यासाठीच तालुक्यातील बहुतांश ग्रा.पं.नी सचिवालय बांधकामास मंजुरीसह निधीही मिळविला. मात्र गेल्या दीड ते दोन वर्षापूर्वी अनेक ग्रा.पं.नी सचिवाल्यांचे बांधकाम सुरू केले. परंतु आजवर बांधकाम प्रगतिपथावर असल्याचे दाखवून काहींनी बांधकाम पूर्ण होण्या अगोदरच पूर्ण निधीची उचल केल्याचीही माहिती नागरिकांकडून मिळाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राजीव गांधी ग्राम सचिवालयांचे बांधकाम अपूर्ण असून बांधकाम निधीत मोठा अपहार झाल्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविली जात आहे. तरीही वरिष्ठांनी सदर गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. (तालुका प्रतिनिधी)