शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

पावसाचा कहर सुरूच

By admin | Updated: July 11, 2016 00:44 IST

गुरुवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात संततधार पावसाला सुरूवात झाली. शुक्रवार, शनिवार आणि आज रविवारीदेखील जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच राहिली.

शेतकऱ्यांच्या पेरण्या वाहून गेल्या : जिल्ह्यात शेकडो घरांची पडझडचंद्रपूर : गुरुवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात संततधार पावसाला सुरूवात झाली. शुक्रवार, शनिवार आणि आज रविवारीदेखील जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच राहिली. शनिवारी २२१ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद सावली तालुक्यात झाली होती. येथे तब्बल ८७ घरांची अंशता पडझड झाली असून दोन घरे जमीनदोस्त झाली होती. आजही जिल्ह्यात शेकडो घरांची अंशता पडझड झाली. कोठारीजवळील नाल्यात कार वाहून चार जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, आज पावसाचा जोर कमी असल्याने शनिवारी बंद झाले अनेक मार्ग आज पूर्ववत सुरू झाले. मात्र काही ठिकाणी पूर ओसरला नसल्याने मार्ग बंदच आहेत.काल शनिवारी जिवती तालुका वगळला तर उर्वरित १४ तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. गुरुवारी मध्यरात्री २.३० वाजतापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. चंद्रपूरसह बल्लारपूर, राजुरा, कोरपना, जिवती, मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, भद्रावती, वरोरा, चिमूर या सर्व तालुक्यात एकाचवेळी मध्यरात्रीच्या सुमारास पावसाला सुरुवात झाल्याची माहिती आहे. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाची झड कायम होती. दिवसभरही पावसाने उसंत घेतली नाही. दिवसभर आणि रात्रीसुध्दा पावसाची रिपरिप सुरू असल्याने जिल्हाभरात जवजीवनावर मोठा परिणाम झाला. शनिवारी पुन्हा दिवसभर पावसाने जिल्हावासीयांना झोडपून काढले. शनिवारी पावसाचा जोर अधिक असल्याने सावली तालुक्यात ८७ घरांची पडझड झाली होती तर अनेक मार्ग बंद झाले होते.आज रविवारी पुन्हा सकाळपासून पावसाची झड कायम होती. दिवसभरातून दुपारच्या सुमारास काही वेळ पाऊस थांबला होता. मात्र ढगाळ वातावरण कायम होते. अशातच काही वेळात पुन्हा पावसाला सुरूवात झाली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. शासकीय आकडेवारीनुसार, सर्वाधिक पाऊस सिंदेवाही तालुक्यात १८२.२० मिमी झाला. तर १५ मिमी म्हणजे सर्वात कमी पाऊस चिमूर तालुक्यात झाला. चंद्रपुरात ९८.८० मिमी, बल्लारपूर तालुका ५० मिमी, गोंडपिपरी तालुका ८८.८० मिमी, पोंभूर्णा तालुक्यात ४० मिमी, मूल-३६.६० मिमी, सावली-३० मिमी, वरोरा-३१ मिमी, भद्रावती-३० मिमी, चिमूर-१५ मिमी, ब्रह्मपुरी-१८.२० मिमी, नागभीड-५५.२० मिमी, राजुरा- ४७.६० मिमी व जिवती तालुक्यात ८८.४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. (लोकमत चमू)बल्लारपुरात सात घरे जमीनदोस्तबल्लारपूर तालुक्यातही संततधार पावसामुळे लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. बल्लारपूर येथील तहसीलदार विकास अहीर यांनी दिलेल्या माहितीनुसार सात गावांमधील ३५ घरांची अंशता पडझड झाली आहे तर सात घरे पूर्णता पडलेली आहेत. याच तालुक्यातील किन्ही नाल्यात कारसह चारजण वाहून गेले. इरई धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावरमागील तीन दिवसांपासून विदर्भात सर्वत्र संततधार पाऊस पडत असल्याने नदी-नाल्यांचा जलस्तर सातत्याने वाढत आहे. चंद्रपूरजवळ असलेल्या इरई धरणातील जलसाठाही चांगलाच वाढला आहे. २०६.२०० मीटर एवढी पाण्याची पातळी झाली आहे. चारगाव धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर असल्याने या धरणातील पाण्याचा विसर्ग इरई धरणात होऊन इरई धरणही ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. इरई धरणात २०७.४०० मीटरपर्यंत पाण्याची पातळली आली की धरणाचे दरवाजे उघडले जातात. आता पातळी २०६.२०० मीटरपर्यंत आली आहे.