शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पावसाचा कहर सुरूच

By admin | Updated: July 11, 2016 00:44 IST

गुरुवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात संततधार पावसाला सुरूवात झाली. शुक्रवार, शनिवार आणि आज रविवारीदेखील जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच राहिली.

शेतकऱ्यांच्या पेरण्या वाहून गेल्या : जिल्ह्यात शेकडो घरांची पडझडचंद्रपूर : गुरुवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात संततधार पावसाला सुरूवात झाली. शुक्रवार, शनिवार आणि आज रविवारीदेखील जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच राहिली. शनिवारी २२१ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद सावली तालुक्यात झाली होती. येथे तब्बल ८७ घरांची अंशता पडझड झाली असून दोन घरे जमीनदोस्त झाली होती. आजही जिल्ह्यात शेकडो घरांची अंशता पडझड झाली. कोठारीजवळील नाल्यात कार वाहून चार जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, आज पावसाचा जोर कमी असल्याने शनिवारी बंद झाले अनेक मार्ग आज पूर्ववत सुरू झाले. मात्र काही ठिकाणी पूर ओसरला नसल्याने मार्ग बंदच आहेत.काल शनिवारी जिवती तालुका वगळला तर उर्वरित १४ तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. गुरुवारी मध्यरात्री २.३० वाजतापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. चंद्रपूरसह बल्लारपूर, राजुरा, कोरपना, जिवती, मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, भद्रावती, वरोरा, चिमूर या सर्व तालुक्यात एकाचवेळी मध्यरात्रीच्या सुमारास पावसाला सुरुवात झाल्याची माहिती आहे. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाची झड कायम होती. दिवसभरही पावसाने उसंत घेतली नाही. दिवसभर आणि रात्रीसुध्दा पावसाची रिपरिप सुरू असल्याने जिल्हाभरात जवजीवनावर मोठा परिणाम झाला. शनिवारी पुन्हा दिवसभर पावसाने जिल्हावासीयांना झोडपून काढले. शनिवारी पावसाचा जोर अधिक असल्याने सावली तालुक्यात ८७ घरांची पडझड झाली होती तर अनेक मार्ग बंद झाले होते.आज रविवारी पुन्हा सकाळपासून पावसाची झड कायम होती. दिवसभरातून दुपारच्या सुमारास काही वेळ पाऊस थांबला होता. मात्र ढगाळ वातावरण कायम होते. अशातच काही वेळात पुन्हा पावसाला सुरूवात झाली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. शासकीय आकडेवारीनुसार, सर्वाधिक पाऊस सिंदेवाही तालुक्यात १८२.२० मिमी झाला. तर १५ मिमी म्हणजे सर्वात कमी पाऊस चिमूर तालुक्यात झाला. चंद्रपुरात ९८.८० मिमी, बल्लारपूर तालुका ५० मिमी, गोंडपिपरी तालुका ८८.८० मिमी, पोंभूर्णा तालुक्यात ४० मिमी, मूल-३६.६० मिमी, सावली-३० मिमी, वरोरा-३१ मिमी, भद्रावती-३० मिमी, चिमूर-१५ मिमी, ब्रह्मपुरी-१८.२० मिमी, नागभीड-५५.२० मिमी, राजुरा- ४७.६० मिमी व जिवती तालुक्यात ८८.४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. (लोकमत चमू)बल्लारपुरात सात घरे जमीनदोस्तबल्लारपूर तालुक्यातही संततधार पावसामुळे लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. बल्लारपूर येथील तहसीलदार विकास अहीर यांनी दिलेल्या माहितीनुसार सात गावांमधील ३५ घरांची अंशता पडझड झाली आहे तर सात घरे पूर्णता पडलेली आहेत. याच तालुक्यातील किन्ही नाल्यात कारसह चारजण वाहून गेले. इरई धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावरमागील तीन दिवसांपासून विदर्भात सर्वत्र संततधार पाऊस पडत असल्याने नदी-नाल्यांचा जलस्तर सातत्याने वाढत आहे. चंद्रपूरजवळ असलेल्या इरई धरणातील जलसाठाही चांगलाच वाढला आहे. २०६.२०० मीटर एवढी पाण्याची पातळी झाली आहे. चारगाव धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर असल्याने या धरणातील पाण्याचा विसर्ग इरई धरणात होऊन इरई धरणही ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. इरई धरणात २०७.४०० मीटरपर्यंत पाण्याची पातळली आली की धरणाचे दरवाजे उघडले जातात. आता पातळी २०६.२०० मीटरपर्यंत आली आहे.