शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

अकाली पावसामुळे धानपीक संकटात

By admin | Updated: October 26, 2014 22:37 IST

तालुक्यात काल शनिवारपासून झालेल्या अकाली पावसामुळे व ढगाळी वातावरणाने धानपिके संकटात आली आहे. बहुतांश धान पिकांना घाटे अळीचा प्रादुर्भाव जाणवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ब्रह्मपुरी : तालुक्यात काल शनिवारपासून झालेल्या अकाली पावसामुळे व ढगाळी वातावरणाने धानपिके संकटात आली आहे. बहुतांश धान पिकांना घाटे अळीचा प्रादुर्भाव जाणवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.हंगामाला सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिली. शेतीचे काम आॅगस्ट महिन्यापर्यंत खोळंबली होेती. काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करुन पोळ्याच्या सणानंतरही रोवणीची कामे केली. दरम्यानच्या कालखंडात धानपिके संपूर्णत: शेतकऱ्यांच्या हाती आल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु कालपासून हलकासा पाऊस व ढगाळ वातावरणाने जड जातीच्या धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीला आलेले पिक पावसामुळे लोंबलेले आहे. ढगाळ वातावरणामुळे घाटे अळीने पिकांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. शेतकरी हाती आलेल्या पिकांकडे पाहून चिंताग्रस्त असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांसमोर सध्या फार मोठे प्रश्न आहेत. हाती आलेले पीक धोक्यात आले तर जनावरांचे व्यवस्थापन नीट होत नाही. जनावरांच्या चाऱ्याच्या किमती वाढल्यामुळे उत्पादन खर्च वाढणे आवश्यक होते. पण उत्पादनच हळूहळू धोक्यात आले आहे. वर्षभराचे आर्थिक नियोजनही पूर्णपणे ढासळून कर्जाचा डोंगर निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांवर आलेली दिसून येत आहे. तालुक्यातील खरीप हंगाम अशा वेगळ्या दिशेने वाटचाल करीत असल्याने येणाऱ्या रब्बी पिकांबद्दल पेरणीच्या संदर्भात शेतकरी धास्तावलेला आहे. फवारणी मारुन घाटेअळी दूर करता येऊ शकते, असेही म्हणता येत नाही. कारण धानाचा अंतिम टप्पा असल्याने फवारणीकरण्यासाठी अनुकूल वेळ नसल्याने घाटेअळीवर योग्य बंदोबस्त या वेळेस करता येत नाही. अऱ्हेर नवरगाव, गांगलवाडी, मेंडकी, एकरा, मुडझा आदी परिसरातील हजारो हेक्टरवरील पिकांवर या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. (प्रतिनिधी)