शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

अकाली पावसामुळे धानपीक संकटात

By admin | Updated: October 26, 2014 22:37 IST

तालुक्यात काल शनिवारपासून झालेल्या अकाली पावसामुळे व ढगाळी वातावरणाने धानपिके संकटात आली आहे. बहुतांश धान पिकांना घाटे अळीचा प्रादुर्भाव जाणवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ब्रह्मपुरी : तालुक्यात काल शनिवारपासून झालेल्या अकाली पावसामुळे व ढगाळी वातावरणाने धानपिके संकटात आली आहे. बहुतांश धान पिकांना घाटे अळीचा प्रादुर्भाव जाणवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.हंगामाला सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिली. शेतीचे काम आॅगस्ट महिन्यापर्यंत खोळंबली होेती. काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करुन पोळ्याच्या सणानंतरही रोवणीची कामे केली. दरम्यानच्या कालखंडात धानपिके संपूर्णत: शेतकऱ्यांच्या हाती आल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु कालपासून हलकासा पाऊस व ढगाळ वातावरणाने जड जातीच्या धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापणीला आलेले पिक पावसामुळे लोंबलेले आहे. ढगाळ वातावरणामुळे घाटे अळीने पिकांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. शेतकरी हाती आलेल्या पिकांकडे पाहून चिंताग्रस्त असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांसमोर सध्या फार मोठे प्रश्न आहेत. हाती आलेले पीक धोक्यात आले तर जनावरांचे व्यवस्थापन नीट होत नाही. जनावरांच्या चाऱ्याच्या किमती वाढल्यामुळे उत्पादन खर्च वाढणे आवश्यक होते. पण उत्पादनच हळूहळू धोक्यात आले आहे. वर्षभराचे आर्थिक नियोजनही पूर्णपणे ढासळून कर्जाचा डोंगर निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांवर आलेली दिसून येत आहे. तालुक्यातील खरीप हंगाम अशा वेगळ्या दिशेने वाटचाल करीत असल्याने येणाऱ्या रब्बी पिकांबद्दल पेरणीच्या संदर्भात शेतकरी धास्तावलेला आहे. फवारणी मारुन घाटेअळी दूर करता येऊ शकते, असेही म्हणता येत नाही. कारण धानाचा अंतिम टप्पा असल्याने फवारणीकरण्यासाठी अनुकूल वेळ नसल्याने घाटेअळीवर योग्य बंदोबस्त या वेळेस करता येत नाही. अऱ्हेर नवरगाव, गांगलवाडी, मेंडकी, एकरा, मुडझा आदी परिसरातील हजारो हेक्टरवरील पिकांवर या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. (प्रतिनिधी)