शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे दिवस, आरोग्याकडे दुर्लक्ष पडू शकते महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:33 IST

पावसाळ्यात अतिसाराची लागण होण्याची शक्यता असते. दिवसातून तीन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पातळ पाण्यासारखे शौचाला गेल्यास त्याला ‘अतिसार’ ...

पावसाळ्यात अतिसाराची लागण होण्याची शक्यता असते. दिवसातून तीन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पातळ पाण्यासारखे शौचाला गेल्यास त्याला ‘अतिसार’ म्हणतात. हा आजार प्रामुख्याने दूषित पाण्यापासून होतो. विविध प्रकारचे विषाणू, जीवाणू तसेच इतर परजिवींमुळे हा आजार होतो. या आजारामध्ये प्रथम जुलाब सुरू होऊन त्यानंतर उलट्या होतात.

गॅस्ट्रो हा आजार वेगवेगळ्या प्रकाराच्या जीवाणू व विषाणुमुळे होतो. या आजारात उलट्या व जुलाब एकाच वेळी सुरू होतो. जुलाब वांत्या चालू आहेत़ पण जलशुष्कता नाही, अशावेळी क्षारसंजीवनी, पेज अथवा सरबतचा वापर करावा. जलशुष्कतेची लक्षणे असल्यास क्षारसंजीवनी व घरगुती पेय द्यावी. तीव्र जलशुष्कता असल्यास रुग्णास प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी भरती करावे.

शुद्ध पाणीपुरवठा, वैयक्तिक स्वच्छता, मानवी विष्ठेची योग्य विल्हेवाट लावावी. बालकांना गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण करणे अतिसाराच्या नियंत्रणासाठी आवश्यक आहे. कॉलरा हा आजार व्हिब्रीओ कॉलरा या विशिष्ट जीवाणुमुळे होतो. व्हिब्रीओ कॉलरा या जीवाणूचा आतड्याला संसर्ग झाल्याने पटकी हा आजार होतो. हा आजार सर्व वयांमधील स्त्री-पुरुषांमध्ये आढळतो.

पटकी आजार झाल्यास पेजेसारखे वारंवार जुलाब, उलट्या होतात़ ठोके वाढतात़ तोंडाला कोरड पडते़ वारंवार तहान लागते़ स्नायूंमध्ये गोळे येतात़ अस्वस्थ वाटून चक्क येऊ शकते़ पावसाळ्यात ही लक्षणे दिल्यास आरोग्य केंद्रात दाखल व्हावे़ जेवणापूर्वी बालकांचे हात नेहमी साबणाने धुऊन द्यावेत़ स्वयंपाक करण्यापूर्वी किंवा बाळाला भरविण्यापूर्वी मातांनी विशेष काळजी घ्यावी़, जुलाब असलेल्या रुग्णाची सुश्रुषा केल्यानंतर साबण उपलब्ध नसेल तर राखेनेदेखील हात स्वच्छ करता येते़ बालकांचे गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण अतिसाराच्या नियंत्रणासाठी आवश्यक आहे. मातांनी बाळाला तातडीने रुग्णालयात आणावे, असेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कळविले आहे़

बाॅखस्

घर,परिसर ठेवा स्वच्छ

घर व परिसराची स्वच्छता ठेवली नाही तर अनेक आजार होतात़. प्राण्यांच्या मलमूत्रामुळे दूषित झालेला परिसर हा या आजाराचा प्रमुख स्त्रोत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नये़ लक्षणे दिसल्यास शासकीय रुग्णालयात उपचार करावे़.

बाॅक्स

पाणी उकळूनच प्या

दुषित पाण्यामुळे विविध प्रकारचे आजार होतात़ दूषित झालेला परिसर हाही आजारांचा प्रमुख स्त्रोत असतो. केवळ बालकच नाही तर व्यक्तींनीदेखील पिण्याचे पाणी उकळूनच प्राशन करावे़ खूप दिवसांचे पाणी साठवून ठेवू नये़ स्वयंपाकघरातील वस्तूंची स्वच्छता ठेवावी़ पालेभाज्या तसेच अन्य पदार्थ घरी आणल्यानंतर योग्य काळजी घ्यावी़ पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत निरोगी राहतील, याकडे विशेष लक्ष द्यावे़.