शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
3
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
4
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
5
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
6
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
7
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
8
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
9
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
10
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
11
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
12
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
13
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
14
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
15
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
16
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
17
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
18
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
19
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
20
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची

पावसाचे दिवस, आरोग्याकडे दुर्लक्ष पडू शकते महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:33 IST

पावसाळ्यात अतिसाराची लागण होण्याची शक्यता असते. दिवसातून तीन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पातळ पाण्यासारखे शौचाला गेल्यास त्याला ‘अतिसार’ ...

पावसाळ्यात अतिसाराची लागण होण्याची शक्यता असते. दिवसातून तीन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पातळ पाण्यासारखे शौचाला गेल्यास त्याला ‘अतिसार’ म्हणतात. हा आजार प्रामुख्याने दूषित पाण्यापासून होतो. विविध प्रकारचे विषाणू, जीवाणू तसेच इतर परजिवींमुळे हा आजार होतो. या आजारामध्ये प्रथम जुलाब सुरू होऊन त्यानंतर उलट्या होतात.

गॅस्ट्रो हा आजार वेगवेगळ्या प्रकाराच्या जीवाणू व विषाणुमुळे होतो. या आजारात उलट्या व जुलाब एकाच वेळी सुरू होतो. जुलाब वांत्या चालू आहेत़ पण जलशुष्कता नाही, अशावेळी क्षारसंजीवनी, पेज अथवा सरबतचा वापर करावा. जलशुष्कतेची लक्षणे असल्यास क्षारसंजीवनी व घरगुती पेय द्यावी. तीव्र जलशुष्कता असल्यास रुग्णास प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी भरती करावे.

शुद्ध पाणीपुरवठा, वैयक्तिक स्वच्छता, मानवी विष्ठेची योग्य विल्हेवाट लावावी. बालकांना गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण करणे अतिसाराच्या नियंत्रणासाठी आवश्यक आहे. कॉलरा हा आजार व्हिब्रीओ कॉलरा या विशिष्ट जीवाणुमुळे होतो. व्हिब्रीओ कॉलरा या जीवाणूचा आतड्याला संसर्ग झाल्याने पटकी हा आजार होतो. हा आजार सर्व वयांमधील स्त्री-पुरुषांमध्ये आढळतो.

पटकी आजार झाल्यास पेजेसारखे वारंवार जुलाब, उलट्या होतात़ ठोके वाढतात़ तोंडाला कोरड पडते़ वारंवार तहान लागते़ स्नायूंमध्ये गोळे येतात़ अस्वस्थ वाटून चक्क येऊ शकते़ पावसाळ्यात ही लक्षणे दिल्यास आरोग्य केंद्रात दाखल व्हावे़ जेवणापूर्वी बालकांचे हात नेहमी साबणाने धुऊन द्यावेत़ स्वयंपाक करण्यापूर्वी किंवा बाळाला भरविण्यापूर्वी मातांनी विशेष काळजी घ्यावी़, जुलाब असलेल्या रुग्णाची सुश्रुषा केल्यानंतर साबण उपलब्ध नसेल तर राखेनेदेखील हात स्वच्छ करता येते़ बालकांचे गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण अतिसाराच्या नियंत्रणासाठी आवश्यक आहे. मातांनी बाळाला तातडीने रुग्णालयात आणावे, असेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कळविले आहे़

बाॅखस्

घर,परिसर ठेवा स्वच्छ

घर व परिसराची स्वच्छता ठेवली नाही तर अनेक आजार होतात़. प्राण्यांच्या मलमूत्रामुळे दूषित झालेला परिसर हा या आजाराचा प्रमुख स्त्रोत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नये़ लक्षणे दिसल्यास शासकीय रुग्णालयात उपचार करावे़.

बाॅक्स

पाणी उकळूनच प्या

दुषित पाण्यामुळे विविध प्रकारचे आजार होतात़ दूषित झालेला परिसर हाही आजारांचा प्रमुख स्त्रोत असतो. केवळ बालकच नाही तर व्यक्तींनीदेखील पिण्याचे पाणी उकळूनच प्राशन करावे़ खूप दिवसांचे पाणी साठवून ठेवू नये़ स्वयंपाकघरातील वस्तूंची स्वच्छता ठेवावी़ पालेभाज्या तसेच अन्य पदार्थ घरी आणल्यानंतर योग्य काळजी घ्यावी़ पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत निरोगी राहतील, याकडे विशेष लक्ष द्यावे़.