शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

बहुप्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पावसाची झड

By admin | Updated: August 31, 2014 23:40 IST

जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडला. आॅगस्ट महिना संपत आला तरी पावसाचे चिन्ह नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकही हैराण झाले होते. मात्र गणरायाचे आगमन होताच वरूणराजाही सक्रिय झाला आहे.

शेतकऱ्यांना दिलासा : गणरायाच्या आगमनासह पावसाचेही पुनरागमनचंद्रपूर : जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडला. आॅगस्ट महिना संपत आला तरी पावसाचे चिन्ह नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकही हैराण झाले होते. मात्र गणरायाचे आगमन होताच वरूणराजाही सक्रिय झाला आहे. गणेश चतुर्थीपासून पावसाने पुन्हा पुनरागमन केले. यावेळी तो दमदार पडला. शनिवारी रात्री बऱ्यापैकी पाऊस पडला. रविवारी दिवसभरच पावसाची झड कायम होती. यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यावर्षी पावसाबाबत चंद्रपूर जिल्हा निराशाजनक राहिला. पावसाच्या जून, जुलै व आॅगस्ट या महिन्यातच पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांचा जणू घसाच कोरडा झाला. पिके संकटात सापडली. कसे होणार या विवंचनेत शेतकरी सापडला होता. याशिवाय जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातही जलसाठा कमी होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनही अडचणीत आले होते. पावसाने यंदा प्रारंभापासूनच सर्वांचा जीव टांगणीला ठेवला. यावर्षी जून महिन्यात मृग नक्षत्र कोरडा गेला. त्यानंतरही पाऊस पडला नाही. जून महिन्यात केवळ सरासरी ६१.४२ मिमी पावसाची नोंद झाली. जून महिन्यातील पावसाची टक्केवारी सरासरीच्या तुलनेत केवळ ३३ टक्के होती. जूलै महिन्यात पाऊस सरासरी ओलांडून बरसतो, असा आजवरचा अनुभव आहे. मात्र यंदा या पावसाच्या महिन्यातही पावसाने दगा दिला. जुलै महिन्यात जिल्ह्यात सरासरी ३९७.८४ मिमी पाऊस पडायला हवा. दरवर्षी याहून अधिकच पाऊस पडतो. मात्र यावर्षी जुलै महिन्यात पाऊस सरासरीपर्यंतही पोहचू शकला नाही. या महिन्यात ३०८.१७ मिमी पावसाची नोंद झाली. सरासरी टक्केवारी ७७ एवढी होती. आॅगस्ट महिना देखील पावसाचाच महिना आहे. या महिन्यात जिल्ह्यात सरासरी ३४३.१६ मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात या महिन्यात केवळ ८५.७९ मिमी पाऊस पडला. आॅगस्ट महिन्यात पावसाची टक्केवारी केवळ २५ एवढी आहे. जिल्ह्यातील जिवती, कोरपना, राजुरा, चिमूर, भद्रावती, वरोरा, चंद्रपूर तालुक्यात सर्वाधिक कमी पाऊस पडला आहे. दरम्यान, गणरायाचे आगमन होताच पावसाचेही पुनरागमन झाले. गणेश चतुर्थीच्याच दिवशी बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यानंतर दोन दिवस पावसाळी वातावरण कायम राहिले. काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत पाऊस पडतच राहिला. त्यानंतर आज रविवारी जोरदार पाऊस नसला तरी सकाळपासूनच पावसाची झड होती. दिवसभर सूर्याचे दर्शन झाले नाही. ३१ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात ४३५.८० मिमी पावसाची नोंद झाली. यात सर्वाधिक पाऊस गोंडपिपरी तालुक्यात पडला. या तालुक्यात ५९.२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ चंद्रपूर, सावली, भद्रावती, वरोरा, नागभीड, राजुरा, जिवती तालुक्यातही बऱ्यापैकी पाऊस झाला. (शहर प्रतिनिधी)