शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

पावसाची दडी, पिकांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:22 IST

चालू आठवड्यामध्ये पावसाने एकदाही हजेरी लावली नसल्याने सध्या शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. पेरणीनंतर पिकांची उगवण झाली. शेतकºयांनी पिकांना खतही दिले. परंतु अचानक पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपण्याच्या मार्गावर आहे. येत्या दोन ते तीन दिवसात पाऊस न आल्यास पिकांना धोक्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देसिंचनाची सुविधा नाही : जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांची काळजी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चालू आठवड्यामध्ये पावसाने एकदाही हजेरी लावली नसल्याने सध्या शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. पेरणीनंतर पिकांची उगवण झाली. शेतकºयांनी पिकांना खतही दिले. परंतु अचानक पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपण्याच्या मार्गावर आहे. येत्या दोन ते तीन दिवसात पाऊस न आल्यास पिकांना धोक्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.यंदा उशिराने पावसाचे आगमन झाले. त्यांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. जिल्ह्यात जवळपास ८० टक्के कोरडवाहू शेती आहे. नैसर्गिक पाण्यावरच शेती पिकविली जाते, अशा परिस्थितीत पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे.जिल्ह्यात ११ जुलै रोजी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पावसाने खंड दिला. दरम्यान, काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. सद्यस्थितीत जमिनीत ओल असल्याने दोन ते तीन दिवस ही पिके तग धरू शकतील. परंतु त्यानंतर जर पाऊस आला नाही तर पिके करपण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होण्याची शक्यता आहे.पाऊस यावा, यासाठी शेतकरी वरुणराजाकडे प्रार्थना करीत आहे. यावर्षी उन्हाची तिव्रता अधिक होती. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे. त्यांच्याकडील जलस्त्रोताची पातळी देखील धोकादायक स्थितीत आहे. अद्याप पाहिजे तसे नद्या, नाले भरले नाही. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस कोसळल्याने यावर्षीचा शेतीचा हंगाम धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सतत दुष्काळमागील काही वर्षांपासून सतत दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना सोसाव्या लागत आहे. यावर्षी तरी पिक चांगले येईल, या आशेने शेतकºयांनी इतकडून-तिकडून पैसा जमा करून पेरणी केली. मात्र पावसाने दडी मारल्यामुळे शेतकºयांची चिंता आणखी वाढली आहे. एक-दोन दिवसात पावसाने हजेरी लावली नाही तर ही चिंता आणखीच वाढणार आहे.