शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची दडी, पिकांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:22 IST

चालू आठवड्यामध्ये पावसाने एकदाही हजेरी लावली नसल्याने सध्या शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. पेरणीनंतर पिकांची उगवण झाली. शेतकºयांनी पिकांना खतही दिले. परंतु अचानक पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपण्याच्या मार्गावर आहे. येत्या दोन ते तीन दिवसात पाऊस न आल्यास पिकांना धोक्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देसिंचनाची सुविधा नाही : जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांची काळजी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चालू आठवड्यामध्ये पावसाने एकदाही हजेरी लावली नसल्याने सध्या शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. पेरणीनंतर पिकांची उगवण झाली. शेतकºयांनी पिकांना खतही दिले. परंतु अचानक पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपण्याच्या मार्गावर आहे. येत्या दोन ते तीन दिवसात पाऊस न आल्यास पिकांना धोक्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.यंदा उशिराने पावसाचे आगमन झाले. त्यांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. जिल्ह्यात जवळपास ८० टक्के कोरडवाहू शेती आहे. नैसर्गिक पाण्यावरच शेती पिकविली जाते, अशा परिस्थितीत पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे.जिल्ह्यात ११ जुलै रोजी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पावसाने खंड दिला. दरम्यान, काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. सद्यस्थितीत जमिनीत ओल असल्याने दोन ते तीन दिवस ही पिके तग धरू शकतील. परंतु त्यानंतर जर पाऊस आला नाही तर पिके करपण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होण्याची शक्यता आहे.पाऊस यावा, यासाठी शेतकरी वरुणराजाकडे प्रार्थना करीत आहे. यावर्षी उन्हाची तिव्रता अधिक होती. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे. त्यांच्याकडील जलस्त्रोताची पातळी देखील धोकादायक स्थितीत आहे. अद्याप पाहिजे तसे नद्या, नाले भरले नाही. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस कोसळल्याने यावर्षीचा शेतीचा हंगाम धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सतत दुष्काळमागील काही वर्षांपासून सतत दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना सोसाव्या लागत आहे. यावर्षी तरी पिक चांगले येईल, या आशेने शेतकºयांनी इतकडून-तिकडून पैसा जमा करून पेरणी केली. मात्र पावसाने दडी मारल्यामुळे शेतकºयांची चिंता आणखी वाढली आहे. एक-दोन दिवसात पावसाने हजेरी लावली नाही तर ही चिंता आणखीच वाढणार आहे.