शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

पावसाची दडी, पिकांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:22 IST

चालू आठवड्यामध्ये पावसाने एकदाही हजेरी लावली नसल्याने सध्या शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. पेरणीनंतर पिकांची उगवण झाली. शेतकºयांनी पिकांना खतही दिले. परंतु अचानक पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपण्याच्या मार्गावर आहे. येत्या दोन ते तीन दिवसात पाऊस न आल्यास पिकांना धोक्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देसिंचनाची सुविधा नाही : जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांची काळजी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चालू आठवड्यामध्ये पावसाने एकदाही हजेरी लावली नसल्याने सध्या शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. पेरणीनंतर पिकांची उगवण झाली. शेतकºयांनी पिकांना खतही दिले. परंतु अचानक पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपण्याच्या मार्गावर आहे. येत्या दोन ते तीन दिवसात पाऊस न आल्यास पिकांना धोक्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.यंदा उशिराने पावसाचे आगमन झाले. त्यांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. जिल्ह्यात जवळपास ८० टक्के कोरडवाहू शेती आहे. नैसर्गिक पाण्यावरच शेती पिकविली जाते, अशा परिस्थितीत पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे.जिल्ह्यात ११ जुलै रोजी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पावसाने खंड दिला. दरम्यान, काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. सद्यस्थितीत जमिनीत ओल असल्याने दोन ते तीन दिवस ही पिके तग धरू शकतील. परंतु त्यानंतर जर पाऊस आला नाही तर पिके करपण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होण्याची शक्यता आहे.पाऊस यावा, यासाठी शेतकरी वरुणराजाकडे प्रार्थना करीत आहे. यावर्षी उन्हाची तिव्रता अधिक होती. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे. त्यांच्याकडील जलस्त्रोताची पातळी देखील धोकादायक स्थितीत आहे. अद्याप पाहिजे तसे नद्या, नाले भरले नाही. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस कोसळल्याने यावर्षीचा शेतीचा हंगाम धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सतत दुष्काळमागील काही वर्षांपासून सतत दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना सोसाव्या लागत आहे. यावर्षी तरी पिक चांगले येईल, या आशेने शेतकºयांनी इतकडून-तिकडून पैसा जमा करून पेरणी केली. मात्र पावसाने दडी मारल्यामुळे शेतकºयांची चिंता आणखी वाढली आहे. एक-दोन दिवसात पावसाने हजेरी लावली नाही तर ही चिंता आणखीच वाढणार आहे.