शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पाचव्या दिवशीही पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:48 IST

मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस हजेरी लावत आहे. आज बुधवारीदेखील पावसाने हजेरी लावली. दुपारी ३.३० वाजता चंद्रपूरसह जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पाऊस झाला. सतत पाऊस हजेरी लावत असल्याने मामा तलाव, बोड्या व सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात चांगलीच वाढ होत आहे.

ठळक मुद्देशेतकरी सुखावला : सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यातही वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस हजेरी लावत आहे. आज बुधवारीदेखील पावसाने हजेरी लावली. दुपारी ३.३० वाजता चंद्रपूरसह जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पाऊस झाला. सतत पाऊस हजेरी लावत असल्याने मामा तलाव, बोड्या व सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात चांगलीच वाढ होत आहे.यंदा पावसाचे आगमन चांगलेच उशिराने झाले. खरीप हंगामाची तयारी पूर्ण करून बसलेल्या शेतकऱ्यांना पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर २७ जूनला खºया अर्थाने जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस बरसला. मान्सून सक्रिय झाल्यानंतर पावसाने दडी मारली नाही. मागील पाच दिवसांपासून तर दररोज पाऊस हजेरी लावत आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या सुमारासही दररोज पाऊस येत आहे. मागील पाच दिवसात चार-पाच तासांचा अपवाद वगळला तर सूर्य दिसला नाही. सातत्याने ढगाळ वातावरण कायम राहत आहे.दरम्यान, आज बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी १२ वाजताच्या सुमारास चंद्रपुरात तुरळक पाऊस झाला. त्यानंतर दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास दमदार पावसाला सुरुवात झाली.साधारणता एक-दीड तास दमदार पाऊस झाला. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील बहुतांश भागात आज दमदार पावसाने हजेरी लावली. ऐन दुपारी पाऊस झाल्यामुळे फुटपाथवरील व्यावसायिकांची तारांबळ उडाली. मात्र जिल्ह्यातील शेतकरीवर्ग चांगलाच सुखावला.सास्ती : राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमावर्ती भाग असलेल्या जैतापूर, भोयगाव, पेल्लोरा, नांदगाव, एकोडी, किन्होबोडी, भरोसा परिसरात मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. जैतापूर येथील मुरलीधर थेरे यांच्या शेतातील विहीर जोरदार झालेल्या पावसामुळे खचून गेली.