शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
3
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
4
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
5
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
6
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
7
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
8
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
9
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
10
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
11
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
12
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
13
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
14
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
15
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
16
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
17
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
18
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
19
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
20
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभर अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 22:39 IST

गेल्या आठवडाभरापासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. दररोज ढगाळ वातावरण कायम राहत असल्याने सूर्याचे दर्शन दुरापास्त झाले आहे. सूर्यदर्शन होत नसल्याने थंडीचा जोरही वाढला आहे. अशातच सोमवारी दुपारी १ वाजतापासून चंद्रपूरसह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाची रिपरिप रात्री उशिरापर्यंत चालूच होती. आधीच थंडी, त्यात दिवसभर पाऊस त्यामुळे चंद्रपूरसारख्या हॉट शहरातही आज काश्मीरला असल्याची जाणीव होत होती.

ठळक मुद्देथंडीचा जोर वाढला : अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या आठवडाभरापासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. दररोज ढगाळ वातावरण कायम राहत असल्याने सूर्याचे दर्शन दुरापास्त झाले आहे. सूर्यदर्शन होत नसल्याने थंडीचा जोरही वाढला आहे. अशातच सोमवारी दुपारी १ वाजतापासून चंद्रपूरसह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाची रिपरिप रात्री उशिरापर्यंत चालूच होती. आधीच थंडी, त्यात दिवसभर पाऊस त्यामुळे चंद्रपूरसारख्या हॉट शहरातही आज काश्मीरला असल्याची जाणीव होत होती.चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी उन्हाळा बऱ्यापैकी तापला. सूर्याचा पारा ४८ अंशापार गेला होता. त्यामुळे पावसाळ्यात पाऊसही चांगलाच बरसेल, असा अंदाज होता. मात्र पावसाळ्यात पावसाने दगा दिला. प्रारंभी काही दिवस पाऊस पडल्यानंतर त्याने दडी मारली, ती कायमचीच. परतीच्या वेळीही पाऊस आला नाही. सध्या हिवाळा सुरू असल्याने थंडी पडणे आवश्यक आहे. मात्र असे न होता वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल घडून आला आहे. मागील आठ दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने सुर्याचे दर्शनही दुर्लभ झाले आहे. अशातच सोमवारी दुपारी १ वाजतापासून चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व भागात पावसाला सुरूवात झाली. ही पावसाची रिपरिप रात्री ८ वाजेपर्यंत थांबली नाही. ऐन हिवाळ्यात पाऊस बरसत असल्याने अनेकांची तारांबळ उडाली. अडगळीत ठेवलेल्या छत्र्या, रेनकोट बाहेर निघाले. एरवी गजबजलेले चंद्रपुरातील रस्ते सायंकाळच्या सुमारास ओस पडले होते. शासकीय कार्यालयांमध्येही शांतता दिसून येत होती. भरदुपारीच पारा १४ ते १६ अंशापर्यंत खाली पोहचला होता.रबी पिकांना फटकाया वातावरणाचा शेतपिकांवर मोठा परिणाम झाला असून कापसासह गहू, ज्वारी, हरभरा, तूर पिकांना चांगलाच फटका बसला आहे. पिकांवर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. किडींनी पिकांना ग्रासल्याने रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहे. खरिपातील पिकांनी शेतकºयांना दगा दिल्यानंतर रब्बी पिके शेतकऱ्यांना तारतील असे वाटत असतानाच अचानक वातावरणात बदल झाल्याने ढगाळ वातावरणाचा अनिष्ट परिणाम पिकांवर होत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही उसनवारी व कर्ज काढून शेतकऱ्यांनी शेती केली होती. परंतु यंदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्चही भरून निघत नाही. आता रबीचेही उत्पादन घटण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांचा संघर्ष व्यर्थशेतकरी दिवसरात्र शेतात राबत असतात. हाडाची माती करून जिवाची पर्वा न करता शेतकरी शेतात कष्ट करतात. परंतु त्यांच्या नशिबी अजूनही संघर्षच आहे. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकरी काकुळतीला आला आहे. आता निसर्गही असा ऋतू सोडून वागत असल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.