शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

जिल्हाभर अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 22:39 IST

गेल्या आठवडाभरापासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. दररोज ढगाळ वातावरण कायम राहत असल्याने सूर्याचे दर्शन दुरापास्त झाले आहे. सूर्यदर्शन होत नसल्याने थंडीचा जोरही वाढला आहे. अशातच सोमवारी दुपारी १ वाजतापासून चंद्रपूरसह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाची रिपरिप रात्री उशिरापर्यंत चालूच होती. आधीच थंडी, त्यात दिवसभर पाऊस त्यामुळे चंद्रपूरसारख्या हॉट शहरातही आज काश्मीरला असल्याची जाणीव होत होती.

ठळक मुद्देथंडीचा जोर वाढला : अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या आठवडाभरापासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. दररोज ढगाळ वातावरण कायम राहत असल्याने सूर्याचे दर्शन दुरापास्त झाले आहे. सूर्यदर्शन होत नसल्याने थंडीचा जोरही वाढला आहे. अशातच सोमवारी दुपारी १ वाजतापासून चंद्रपूरसह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाची रिपरिप रात्री उशिरापर्यंत चालूच होती. आधीच थंडी, त्यात दिवसभर पाऊस त्यामुळे चंद्रपूरसारख्या हॉट शहरातही आज काश्मीरला असल्याची जाणीव होत होती.चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी उन्हाळा बऱ्यापैकी तापला. सूर्याचा पारा ४८ अंशापार गेला होता. त्यामुळे पावसाळ्यात पाऊसही चांगलाच बरसेल, असा अंदाज होता. मात्र पावसाळ्यात पावसाने दगा दिला. प्रारंभी काही दिवस पाऊस पडल्यानंतर त्याने दडी मारली, ती कायमचीच. परतीच्या वेळीही पाऊस आला नाही. सध्या हिवाळा सुरू असल्याने थंडी पडणे आवश्यक आहे. मात्र असे न होता वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल घडून आला आहे. मागील आठ दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने सुर्याचे दर्शनही दुर्लभ झाले आहे. अशातच सोमवारी दुपारी १ वाजतापासून चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व भागात पावसाला सुरूवात झाली. ही पावसाची रिपरिप रात्री ८ वाजेपर्यंत थांबली नाही. ऐन हिवाळ्यात पाऊस बरसत असल्याने अनेकांची तारांबळ उडाली. अडगळीत ठेवलेल्या छत्र्या, रेनकोट बाहेर निघाले. एरवी गजबजलेले चंद्रपुरातील रस्ते सायंकाळच्या सुमारास ओस पडले होते. शासकीय कार्यालयांमध्येही शांतता दिसून येत होती. भरदुपारीच पारा १४ ते १६ अंशापर्यंत खाली पोहचला होता.रबी पिकांना फटकाया वातावरणाचा शेतपिकांवर मोठा परिणाम झाला असून कापसासह गहू, ज्वारी, हरभरा, तूर पिकांना चांगलाच फटका बसला आहे. पिकांवर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. किडींनी पिकांना ग्रासल्याने रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली आहे. खरिपातील पिकांनी शेतकºयांना दगा दिल्यानंतर रब्बी पिके शेतकऱ्यांना तारतील असे वाटत असतानाच अचानक वातावरणात बदल झाल्याने ढगाळ वातावरणाचा अनिष्ट परिणाम पिकांवर होत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही उसनवारी व कर्ज काढून शेतकऱ्यांनी शेती केली होती. परंतु यंदा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकऱ्यांनी केलेला खर्चही भरून निघत नाही. आता रबीचेही उत्पादन घटण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांचा संघर्ष व्यर्थशेतकरी दिवसरात्र शेतात राबत असतात. हाडाची माती करून जिवाची पर्वा न करता शेतकरी शेतात कष्ट करतात. परंतु त्यांच्या नशिबी अजूनही संघर्षच आहे. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकरी काकुळतीला आला आहे. आता निसर्गही असा ऋतू सोडून वागत असल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.