शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

पावसाने आणले डोळ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 06:00 IST

ब्रह्मपुरी तालुक्यात २८ हजार ०५८ हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. त्यापैकी २७ हजार ८२४ हेक्टर क्षेत्रात भातपीक घेण्यात आले आहे. त्यापैकी ३३ टक्क््यांच्या आतील नुकसानीस पात्र असलेले २११० हेक्टर क्षेत्र पंचनामा केल्यानंतर बांधित ठरले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील शेतकऱ्यांची दाणादाण : पहाडावरील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय

कर्जाच्या डोंगरामध्ये यावर्षी पडणार मोठी भररवी रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : अवकाळी पावसाने तालुक्यातील शेतकºयांचे मोठे नुकसान झाले असून आता जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत असून यावर्षीच्या पावसामुळे पुन्हा त्यात भर पडली आहे.ब्रह्मपुरी तालुक्यात २८ हजार ०५८ हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. त्यापैकी २७ हजार ८२४ हेक्टर क्षेत्रात भातपीक घेण्यात आले आहे. त्यापैकी ३३ टक्क््यांच्या आतील नुकसानीस पात्र असलेले २११० हेक्टर क्षेत्र पंचनामा केल्यानंतर बांधित ठरले आहे. तर ३३ टक्क््यांच्या वर नुकसान झालेले क्षेत्र २३२८ हेक्टर असल्याने ३३ टक्के नुकसान क्षेत्रामध्ये जवळजवळ ४४३८ हेक्टर शेतजमीनीवरील भात पीक नुकसानग्रस्त झाले आहेत. यापैकी ३५८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये ४०५८ शेतकरी बाधित असल्याचे प्राथमिक अंदाज प्रशासनाने लावला आहे. उर्वरित ८५२ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहे. मात्र किमान शासनाने आर्थिक मदत करावी, अशी आर्त हाक शेतकऱ्यांची आहे. तालुक्यात कापूस, सोयाबिन व इतर पिके २३४ हेक्टर क्षेत्रात आहे. मात्र या पिकाचेही मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून कर्जाच्या डोगरावर आणखी भर पडली आहे.

टॅग्स :agricultureशेती