शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

पॅसेंजर गाड्या बंद असल्याने रेल्वेस्टेशन पडले प्रवाशांविना ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:28 IST

सावरगाव : कोरोना महामारीच्या संकटामुळे मागील वर्षी मार्चपासून लॉगडाऊन करण्यात आले. तेव्हापासून पॅसेंजरसह सर्व रेल्वेगाड्या बंद करण्यात ...

सावरगाव : कोरोना महामारीच्या संकटामुळे मागील वर्षी मार्चपासून लॉगडाऊन करण्यात आले. तेव्हापासून पॅसेंजरसह सर्व रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. मात्र, मध्यंतरी काही सुपरफास्ट गाड्या सुरू करण्यात आल्या आणि कोरोनाचा प्रादुर्भावही थांबला होता. मात्र, पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या नाहीत. परंतु, अलीकडे कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र आहे. त्यातच नागरिकांचा प्रवास बिनधास्त सुरू आहे. मात्र, पॅसेंजर रेल्वे बंद असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

चांदा फोर्ट रेल्वेस्टेशनवरून बल्लारपूर - गोंदिया पॅसेंजर आणि इतर डेमो गाड्या दररोज धावत होत्या. हजारो प्रवासी या मार्गांवरून प्रवास करीत होते. कुणी नोकरीसाठी, कुणी जिल्ह्याच्या कामाकरिता तर कुणी खरेदी व अन्य कामांसाठी प्रवास करीत असल्याने या मार्गांवरील नागभीड, तळोधी रोड, आलेवाही, सिंदेवाहीसह छोटे -मोठे रेल्वेस्टेशन प्रवाशांनी गच्च भरून दिसायचे. यामुळे छोटे -मोठे व्यावसायिक रोजीरोटी कमवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. रेल्वेने प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे असल्याने दररोज हजारोंहून अधिक नागरिक सुखरूप घरी परत येत होते. मात्र, मागील वर्षीच्या लॉकडाऊनपासून पॅसेंजर गाड्या बंद असल्याने नागरिकांना बसने गर्दीत प्रवास करावा लागत आहे. परिणामी, प्रवाशांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे, कोरोनाची पुन्हा लाट येत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, काही सुपरफास्ट गाड्या सुरू असताना आज वर्षभरापासून पॅसेंजर रेल्वेच बंद का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

फोटो : नागभीड तालुक्यातील आलेवाही रेल्वेस्टेशन असे ओस पडले आहे.