शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

राधा म्हणते, न बघितलेले स्वप्न ‘लोकमत’मुळे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 23:24 IST

जीवनात एकदा तरी विमानाने प्रवास करावा, अशी सर्वसामान्यांची इच्छा असते. मी मात्र कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मला विद्यार्थी दशेतच हवाई सफर करता येईल. मात्र ‘लोकमत’मुळे मला विमानाने प्रवास करण्याची संधी मिळाली. अवघ्या दीड तासात विमानाने दिल्लीला पोहोचले. दिल्लीत विमानतळ पाहून मी भारावले, असे मत हवाई सफर विजेती चिमूरची राधा अजय चौधरी हिने व्यक्त केले.

ठळक मुद्देलोकमत संस्कारांचे मोती स्पर्धा : दिल्लीत उपराष्ट्रपतींची घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : जीवनात एकदा तरी विमानाने प्रवास करावा, अशी सर्वसामान्यांची इच्छा असते. मी मात्र कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मला विद्यार्थी दशेतच हवाई सफर करता येईल. मात्र ‘लोकमत’मुळे मला विमानाने प्रवास करण्याची संधी मिळाली. अवघ्या दीड तासात विमानाने दिल्लीला पोहोचले. दिल्लीत विमानतळ पाहून मी भारावले, असे मत हवाई सफर विजेती चिमूरची राधा अजय चौधरी हिने व्यक्त केले.‘लोकमत’तर्फे आयोजित संस्कारांचे मोती स्पर्धेत राधाने सहभाग घेतला आणि ती जिल्ह्यातून विजेती ठरली. नागपूर-दिल्ली-नागपूर अशी हवाई सफर करून परत आल्यानंतर ‘लोकमत’शी तिने संवाद साधला. नागपूर विभागातील ‘संस्कारांचे मोती’ स्पर्धेतील सर्व विजेते मंगळवारला सकाळी ७ वाजता नागपूरहून दिल्लीसाठी विमान प्रवासाला निघाले.सर्वांचाच पहिला विमान प्रवास असल्यामुळे मोठा उत्साह होता. दीड तासाच्या हवाई प्रवासानंतर दिल्ली विमानतळावर आम्ही पोहोचलो. त्यानंतर काही वेळातच गोवा व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची भेट झाली. येथे दोन्ही राज्यांतील विद्यार्थी एकत्र भेटले. त्यानंतर देशाची राजधानी दिल्ली भेटीच्या प्रवासाला सुरूवात झाली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंग, भाजपचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी आदींनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन संवाद साधण्याची संधी मिळाली. इंडिया गेट, राष्ट्रपती भवनदेखील पाहिले. शालेय जीवनात कोणत्याही उपक्रमातून हवाई सफर घडविण्याची संधी उपलब्ध झाली नाही. तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला ‘लोकमत’ समुहाने ही संधी उपलब्ध करून दिली, असे सांगत उपराष्ट्रपती नायडू यांनी ‘लोकमत’च्या उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. ही सर्व अनुभूती आपल्याला स्वप्नवत वाटत होती, अशी प्रतिक्रिया राधाने व्यक्त केली. परतीच्या प्रवासाला सुरूवात झाल्यानंतर दीड तासात विमान नागपूरला पोहोचले. विमानातील व्यवस्था उत्तम होती. पण भीती वाटत होती, असेही राधा म्हणाली. लोकमत जिल्हा कार्यालयाच्या वतीने तालुका प्रतिनिधी राजाकुमार चुनारकर यांनी राधाच्या निवासस्थानी जावून पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.लोकमतच्या उपक्रमाने राधाचे कुटुंबीयही भारावलेउपराष्ट्रपतींनी मोलाचे मार्गदर्शन केले. जीवनात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. राजकारणात नसले तरी संसद भवनात बसण्याचा योग आला. मी ‘लोकमत’ची खूप आभारी आहे, अशी राधा म्हणाली. ‘लोकमत’च्या उपक्रमामुळे राधाला विमानात पहिल्यांदाच प्रवास करण्याची संधी मिळाली. ही घटना विसरता येत नाही, अशी भावना चौधरी कुटुंबीयांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.