शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

थंडीवर रबीची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:51 IST

शासन नेहमीच शेतकºयांना वाºयावर सोडत आला आहे. आता निसर्गही शेतकºयांवरच कोपू लागल्याचे दिसते.

ठळक मुद्देसिंचनाअभावी लागवड क्षेत्रात घट : ऋतुचक्राचे असंतुलन कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासन नेहमीच शेतकºयांना वाºयावर सोडत आला आहे. आता निसर्गही शेतकºयांवरच कोपू लागल्याचे दिसते. यंदा पावसाअभावी खरिपात शेतकºयांना अतोनात नुकसान सोसावे लागले. नैराश्यात असलेल्या आता रबीचा आधार आहे. मात्र ग्रामीण स्रोतात पाणी नसल्याने सिंचनाचा अभाव आहे. शिवाय गतवर्षी हिवाळ्यातील थंडी किती दिवसात गायब झाली, हा अनुभव पाठिशी आहेच. त्यामुळे अनेकजण रबीचा हंगाम करावा की नाही, या विवंचनेत आहे. एकूणच थंडी चांगली पडली तर रबीचा हंगाम शेतकºयांना दिलासादायक ठरेल. अन्यथा पुन्हा नुकसान अटळ आहे.यावर्षी खरीप हंगामावर शेतकºयांच्या आशा होत्या. मात्र अत्यल्प पाऊस पडल्याने अनेकांना प्रारंभी पेरणी करता आली नाही. तर ज्यांनी पेरणी केली त्यांची पिके पाण्याअभावी करपून गेली. धान पट्ट्यात अनेकांना रोवणी करता आली नाही. ज्यांनी केली, त्यांची पिकेही शेवटच्या पाण्याअभावी करपली. त्यामुळे खरीप हंगामातीेल उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येईल, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.खरीप हंगामात जवळजवळ सर्वच शेतकºयांना मोठे नुकसान सोसावे लागले. अनेकांचा उत्पादन खर्चही निघेल की नाही, याची शाश्वती नाही. बँका, सावकार व नातेवाईकांकडून घेतलेले कर्ज शेतकरी फेडू शकले नाही. कर्ज फेडले, तर वर्षभर खाणार काय, हा देखील प्रश्न गंभीर.खरीपात बसलेला आघात अनेक शेतकरी सहन करू शकले नाही. त्यामुळे बहुतांश शेतकरी रबी हंगामात पेरणी करायची हिंमतच दाखवित नसल्याचे दिसून येत आहे. काहींनी आता रबी हंगामात पेरणी करून खरिपात झालेले नुकसान थोडेतरी भरून निघेल, या आशेपोटी रबी हंगाम करायची तयारी सुरू केली आहे. डोक्यावर कर्ज असतानाही आणखी दुसºयांकडून हातउसणे पैसे घेत रबीची मशागत सुरू केली. हरभरा, ज्वारी, गहू, मका, लाखोळी आदी पिके रबी हंगामात घेतली जातात.कृषी विभागाचे दीड लाखांहून अधिक सरासरी रबी हंगामाचे नियोजन असते. मात्र मागील वर्षी पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यात केवळ ९० हजार हेक्टरवरच रबी पिकांची लागवड झाली होती. पुढे उत्पादनातही घट आली होती. यावर्षी कृषी विभागाने एक लाख २० हजार हेक्टरवर रबीचे नियोजन केले आहे. यंदा पावसाळ्यात ३५ ते ४० टक्केच पाऊस झाला असल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार याची आधीपासूनच भीती आहे. रबीत सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. शेतकºयांना पीक जगविताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. रबी हंगामात मोठ्या प्रमाणात गहू व हरभºयाची लागवड होती. या पिकांना पाणी अधिक हवे नसले तरी थंडी चांगली पाहिजे असते. पिकांच्या वाढीसाठी थंडीचे वातावरण आवश्यक असते. मागील वर्षी हिवाळ्याच्या चार महिन्यांतील बोटावर मोजण्याइतक्या दिवसातच थंडीचा जोर दिसला. थंडीची अशीच परिस्थिती यंदाही राहिली तर गहू, हरभरा पिकांची वाढ खुंटून रबीतही शेतकºयांचे मोठे नुकसान होणार आहे.जमिनीत पाणी मुरलेच नाहीयंदा पाऊसच अत्यल्प पडल्याने जमिनीतही पाणी मुरले नाही. नदी, तलाव, बोड्यात पाणी नाही. जिल्ह्यातील मोठ्या सिंचन प्रकल्पांचीही स्थिती नाजुक आहे. त्यामुळे रबीत पिकांना पाणी कुठून द्यावे, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. कोरपना तालुक्यात पकडीगुड्डम व अंमलनाला धरणातून शेतकºयांना पाणी देण्यात येते. मात्र मागील वर्षी धरणातूनही कराराप्रमाणे पाणी देण्यात आले नसल्याचा शेतकºयांचा आरोप होता. यंदा तसे होऊ नये, अशी अपेक्षा आहे.