शहरं
Join us  
Trending Stories
1
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख; योगायोग की राजकीय भूकंपाचे संकेत?
2
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
3
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
4
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
5
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
6
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
7
Viral Video: "हे फूटपाथ चालण्यासाठी आहेत, गाड्यांसाठी नाही!" परदेशी नागरिकांकडून पुणेकरांना शिस्तीचा धडा
8
ड्रॅगनला मोठा झटका! चिनच्या 'या' वस्तूवर ५ वर्षांसाठी 'अँटी-डंपिंग ड्युटी' लागू; स्थानिक उद्योगांना मिळणार बळ
9
Anurag Dwivedi : क्रूझवर शाही लग्न, लक्झरी कारचा मालक; कोट्यवधींची कमाई करुन दुबईला पळाला प्रसिद्ध युट्यूबर
10
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
11
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
12
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
13
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
14
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
15
ICICI Prudential AMC IPO: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
16
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
17
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
18
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
19
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
20
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
Daily Top 2Weekly Top 5

थंडीवर रबीची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:51 IST

शासन नेहमीच शेतकºयांना वाºयावर सोडत आला आहे. आता निसर्गही शेतकºयांवरच कोपू लागल्याचे दिसते.

ठळक मुद्देसिंचनाअभावी लागवड क्षेत्रात घट : ऋतुचक्राचे असंतुलन कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासन नेहमीच शेतकºयांना वाºयावर सोडत आला आहे. आता निसर्गही शेतकºयांवरच कोपू लागल्याचे दिसते. यंदा पावसाअभावी खरिपात शेतकºयांना अतोनात नुकसान सोसावे लागले. नैराश्यात असलेल्या आता रबीचा आधार आहे. मात्र ग्रामीण स्रोतात पाणी नसल्याने सिंचनाचा अभाव आहे. शिवाय गतवर्षी हिवाळ्यातील थंडी किती दिवसात गायब झाली, हा अनुभव पाठिशी आहेच. त्यामुळे अनेकजण रबीचा हंगाम करावा की नाही, या विवंचनेत आहे. एकूणच थंडी चांगली पडली तर रबीचा हंगाम शेतकºयांना दिलासादायक ठरेल. अन्यथा पुन्हा नुकसान अटळ आहे.यावर्षी खरीप हंगामावर शेतकºयांच्या आशा होत्या. मात्र अत्यल्प पाऊस पडल्याने अनेकांना प्रारंभी पेरणी करता आली नाही. तर ज्यांनी पेरणी केली त्यांची पिके पाण्याअभावी करपून गेली. धान पट्ट्यात अनेकांना रोवणी करता आली नाही. ज्यांनी केली, त्यांची पिकेही शेवटच्या पाण्याअभावी करपली. त्यामुळे खरीप हंगामातीेल उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येईल, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.खरीप हंगामात जवळजवळ सर्वच शेतकºयांना मोठे नुकसान सोसावे लागले. अनेकांचा उत्पादन खर्चही निघेल की नाही, याची शाश्वती नाही. बँका, सावकार व नातेवाईकांकडून घेतलेले कर्ज शेतकरी फेडू शकले नाही. कर्ज फेडले, तर वर्षभर खाणार काय, हा देखील प्रश्न गंभीर.खरीपात बसलेला आघात अनेक शेतकरी सहन करू शकले नाही. त्यामुळे बहुतांश शेतकरी रबी हंगामात पेरणी करायची हिंमतच दाखवित नसल्याचे दिसून येत आहे. काहींनी आता रबी हंगामात पेरणी करून खरिपात झालेले नुकसान थोडेतरी भरून निघेल, या आशेपोटी रबी हंगाम करायची तयारी सुरू केली आहे. डोक्यावर कर्ज असतानाही आणखी दुसºयांकडून हातउसणे पैसे घेत रबीची मशागत सुरू केली. हरभरा, ज्वारी, गहू, मका, लाखोळी आदी पिके रबी हंगामात घेतली जातात.कृषी विभागाचे दीड लाखांहून अधिक सरासरी रबी हंगामाचे नियोजन असते. मात्र मागील वर्षी पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यात केवळ ९० हजार हेक्टरवरच रबी पिकांची लागवड झाली होती. पुढे उत्पादनातही घट आली होती. यावर्षी कृषी विभागाने एक लाख २० हजार हेक्टरवर रबीचे नियोजन केले आहे. यंदा पावसाळ्यात ३५ ते ४० टक्केच पाऊस झाला असल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार याची आधीपासूनच भीती आहे. रबीत सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. शेतकºयांना पीक जगविताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. रबी हंगामात मोठ्या प्रमाणात गहू व हरभºयाची लागवड होती. या पिकांना पाणी अधिक हवे नसले तरी थंडी चांगली पाहिजे असते. पिकांच्या वाढीसाठी थंडीचे वातावरण आवश्यक असते. मागील वर्षी हिवाळ्याच्या चार महिन्यांतील बोटावर मोजण्याइतक्या दिवसातच थंडीचा जोर दिसला. थंडीची अशीच परिस्थिती यंदाही राहिली तर गहू, हरभरा पिकांची वाढ खुंटून रबीतही शेतकºयांचे मोठे नुकसान होणार आहे.जमिनीत पाणी मुरलेच नाहीयंदा पाऊसच अत्यल्प पडल्याने जमिनीतही पाणी मुरले नाही. नदी, तलाव, बोड्यात पाणी नाही. जिल्ह्यातील मोठ्या सिंचन प्रकल्पांचीही स्थिती नाजुक आहे. त्यामुळे रबीत पिकांना पाणी कुठून द्यावे, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. कोरपना तालुक्यात पकडीगुड्डम व अंमलनाला धरणातून शेतकºयांना पाणी देण्यात येते. मात्र मागील वर्षी धरणातूनही कराराप्रमाणे पाणी देण्यात आले नसल्याचा शेतकºयांचा आरोप होता. यंदा तसे होऊ नये, अशी अपेक्षा आहे.