शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

सिंचनाअभावी रबी हंगाम धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 23:36 IST

यावर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र हा अंदाज वरुणराजाने फोल ठरविला. अत्यल्प पावसामुळे खरिपात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. इतरवेळी खरिपातील नुकसान रबी भरून काढतो.

ठळक मुद्देनदी-नाल्यांमध्ये पाणीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यावर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र हा अंदाज वरुणराजाने फोल ठरविला. अत्यल्प पावसामुळे खरिपात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. इतरवेळी खरिपातील नुकसान रबी भरून काढतो. मात्र यावेळी सिंचनसाठ्यात व बोडी-तलावातही पाहिजे तसे पाणी नसल्याने रबी हंगामही धोक्यात असून शेतकरीही चिंताग्रस्त दिसत आहेत.यावर्षी खरिप हंगामावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या. मात्र अत्यल्प पाऊस पडल्याने अनेकांना पेरणी करता आली नाही. तर ज्यांनी पेरणी केली त्यांची पिके पाण्याअभावी करपून गेली. कापसाला तर बोंडअळीने खाऊन टाकले. धान पट्ट्यात अनेकांना रोवणी करता आली नाही. तर ज्यांनी केली त्यांची पिकेही मावा, तुडतुडा या रोगांनी उद्ध्वस्त झाली. त्यामुळे खरिप हंगामात यावर्षी उत्पन्न घटले आहे.खरिप हंगामात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. उत्पादन खर्चही निघाला नाही. आता तरी रबी हंगामात काही प्रमाणात नुकसान भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. हरभरा, ज्वारी, गहू, मका, लाखोळी आदी पिके रबी हंगामात घेतली जातात. यावर्षीही अनेक शेतकऱ्यांनी या पिकांची लागवड केली आहे. मात्र त्यांच्यासमोर सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नदी-तलाव, बोड्या यामध्ये पाणी नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.