शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
2
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
3
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
4
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
5
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
6
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
8
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
9
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
10
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
11
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
12
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
14
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
15
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
16
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
17
Vijay Mallya : 'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
18
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
19
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?

सिंचनाअभावी रबी हंगाम धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 23:36 IST

यावर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र हा अंदाज वरुणराजाने फोल ठरविला. अत्यल्प पावसामुळे खरिपात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. इतरवेळी खरिपातील नुकसान रबी भरून काढतो.

ठळक मुद्देनदी-नाल्यांमध्ये पाणीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यावर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र हा अंदाज वरुणराजाने फोल ठरविला. अत्यल्प पावसामुळे खरिपात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. इतरवेळी खरिपातील नुकसान रबी भरून काढतो. मात्र यावेळी सिंचनसाठ्यात व बोडी-तलावातही पाहिजे तसे पाणी नसल्याने रबी हंगामही धोक्यात असून शेतकरीही चिंताग्रस्त दिसत आहेत.यावर्षी खरिप हंगामावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या. मात्र अत्यल्प पाऊस पडल्याने अनेकांना पेरणी करता आली नाही. तर ज्यांनी पेरणी केली त्यांची पिके पाण्याअभावी करपून गेली. कापसाला तर बोंडअळीने खाऊन टाकले. धान पट्ट्यात अनेकांना रोवणी करता आली नाही. तर ज्यांनी केली त्यांची पिकेही मावा, तुडतुडा या रोगांनी उद्ध्वस्त झाली. त्यामुळे खरिप हंगामात यावर्षी उत्पन्न घटले आहे.खरिप हंगामात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. उत्पादन खर्चही निघाला नाही. आता तरी रबी हंगामात काही प्रमाणात नुकसान भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. हरभरा, ज्वारी, गहू, मका, लाखोळी आदी पिके रबी हंगामात घेतली जातात. यावर्षीही अनेक शेतकऱ्यांनी या पिकांची लागवड केली आहे. मात्र त्यांच्यासमोर सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नदी-तलाव, बोड्या यामध्ये पाणी नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.