शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

सिंचनाअभावी रबी हंगाम धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 23:36 IST

यावर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र हा अंदाज वरुणराजाने फोल ठरविला. अत्यल्प पावसामुळे खरिपात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. इतरवेळी खरिपातील नुकसान रबी भरून काढतो.

ठळक मुद्देनदी-नाल्यांमध्ये पाणीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यावर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र हा अंदाज वरुणराजाने फोल ठरविला. अत्यल्प पावसामुळे खरिपात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. इतरवेळी खरिपातील नुकसान रबी भरून काढतो. मात्र यावेळी सिंचनसाठ्यात व बोडी-तलावातही पाहिजे तसे पाणी नसल्याने रबी हंगामही धोक्यात असून शेतकरीही चिंताग्रस्त दिसत आहेत.यावर्षी खरिप हंगामावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या. मात्र अत्यल्प पाऊस पडल्याने अनेकांना पेरणी करता आली नाही. तर ज्यांनी पेरणी केली त्यांची पिके पाण्याअभावी करपून गेली. कापसाला तर बोंडअळीने खाऊन टाकले. धान पट्ट्यात अनेकांना रोवणी करता आली नाही. तर ज्यांनी केली त्यांची पिकेही मावा, तुडतुडा या रोगांनी उद्ध्वस्त झाली. त्यामुळे खरिप हंगामात यावर्षी उत्पन्न घटले आहे.खरिप हंगामात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. उत्पादन खर्चही निघाला नाही. आता तरी रबी हंगामात काही प्रमाणात नुकसान भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. हरभरा, ज्वारी, गहू, मका, लाखोळी आदी पिके रबी हंगामात घेतली जातात. यावर्षीही अनेक शेतकऱ्यांनी या पिकांची लागवड केली आहे. मात्र त्यांच्यासमोर सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नदी-तलाव, बोड्या यामध्ये पाणी नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.