शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

सिंचनाअभावी रबी हंगाम धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 23:36 IST

यावर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र हा अंदाज वरुणराजाने फोल ठरविला. अत्यल्प पावसामुळे खरिपात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. इतरवेळी खरिपातील नुकसान रबी भरून काढतो.

ठळक मुद्देनदी-नाल्यांमध्ये पाणीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यावर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र हा अंदाज वरुणराजाने फोल ठरविला. अत्यल्प पावसामुळे खरिपात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. इतरवेळी खरिपातील नुकसान रबी भरून काढतो. मात्र यावेळी सिंचनसाठ्यात व बोडी-तलावातही पाहिजे तसे पाणी नसल्याने रबी हंगामही धोक्यात असून शेतकरीही चिंताग्रस्त दिसत आहेत.यावर्षी खरिप हंगामावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या. मात्र अत्यल्प पाऊस पडल्याने अनेकांना पेरणी करता आली नाही. तर ज्यांनी पेरणी केली त्यांची पिके पाण्याअभावी करपून गेली. कापसाला तर बोंडअळीने खाऊन टाकले. धान पट्ट्यात अनेकांना रोवणी करता आली नाही. तर ज्यांनी केली त्यांची पिकेही मावा, तुडतुडा या रोगांनी उद्ध्वस्त झाली. त्यामुळे खरिप हंगामात यावर्षी उत्पन्न घटले आहे.खरिप हंगामात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. उत्पादन खर्चही निघाला नाही. आता तरी रबी हंगामात काही प्रमाणात नुकसान भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. हरभरा, ज्वारी, गहू, मका, लाखोळी आदी पिके रबी हंगामात घेतली जातात. यावर्षीही अनेक शेतकऱ्यांनी या पिकांची लागवड केली आहे. मात्र त्यांच्यासमोर सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नदी-तलाव, बोड्या यामध्ये पाणी नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.