शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

पाऊस व संभाव्य परिस्थितीवर रबीचे नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:06 IST

जिल्ह्यात यावर्षी पावसाने दडी मारल्याने खरीपामधील पिकांना धोका निर्माण झाला आहे. मात्र उपलब्ध जलसाठे आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कृषी, सिंचन व अन्य विभागाने समन्वयाने रबी हंगामाचे नियोजन करावे, ...

ठळक मुद्देहंसराज अहीर यांचे निर्देश : कृषी अधिकाºयांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात यावर्षी पावसाने दडी मारल्याने खरीपामधील पिकांना धोका निर्माण झाला आहे. मात्र उपलब्ध जलसाठे आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कृषी, सिंचन व अन्य विभागाने समन्वयाने रबी हंगामाचे नियोजन करावे, अशा सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली.कृषी, सिंचन, पशुसंवर्धन विभागाचा आढावा घेण्यासाठी गुरूवारी चंद्रपूरच्या विश्रामगृहात बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती अर्चना जिवतोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अण्णासाहेब हसनाबादे, आत्माच्या प्रकल्प संचालक विद्या मानकर, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दीपक चव्हाण, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोनोने आदीसह मान्यवर उपस्थित होते.यावेळी यावर्षी झालेल्या पर्जन्यमानाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यामध्ये भाताच्या पिकाचे नुकसान झाले असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. सोयाबिनचा पेरा कमी झाला असून कपासीचा पेरा वाढला आहे. तथापि, जिल्ह्यातील अनेक प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा अत्यल्प असल्यामुळे रब्बीचे नियोजन करताना प्रकल्पनिहाय नियोजन कृषी विभागाने करावे, असे आवाहन हंसराज अहीर यांनी केले.आसोलामेंढा प्रकल्पामध्ये पुरेसे पाणी असून गरज पडल्यास गोसेखूर्द प्रकल्पातून पाणी मिळवता येईल, असे कार्यकारी अभियंता यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कृषी विभागाने आसोलामेंढा प्रकल्पाशेजारी १६ हजार हेक्टर जमिनीसाठी वेगळे नियोजन करावे. या ठिकाणी गहू आणि चना या रब्बी पिकाची लागवड करण्यासाठी कृषी व संबंधित विभागाने शेतकºयांशी संवाद साधावा, असे सांगितले. यावेळी बंदी घातलेल्या बियाण्यांची लागवड, कृषी मित्र, उन्नत शेती, बियाण्याची उपलब्धता, युरीयाची उपलब्धता या संदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. औषधी विक्री दुकानांमधून औषध विक्री करताना शेतकºयांना आवश्यक सल्ला आणि सुविधा पुरविल्या जात नसल्याबद्दल या बैठकीत चर्चा झाली. यावेळी सर्व विभागामार्फत शेतकºयांसाठी सुरु असणाºया योजनांवर यावेळी चर्चा केली. बैठकीला नरेंद्र जिवतोडे, शेखर चौधरी, चंद्रकांत गुप्ते, विजय वानखेडे, डॉ.भगवान गायकवाड आदींची उपस्थिती होती.फवारणीसाठी काळजी घ्यानव्या पध्दतीच्या बियाण्यांमुळे कपासी व अन्य पिकांची उंची वाढली आहे. त्यामुळे फवारणी करताना शेतकºयांनी सुरक्षा उपाययोजनांचा अवलंब करावा. चेहरा व शरीरावर विषारी कीटकनाशकांचा प्रभाव होणार नाही, याची काळजी घ्यावी. विषारी औषध अंगावर सांडल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते तसेच फवारणी यंत्र वापरताना शरीरापासून दूर राहील याची काळजी घ्यावी. तसेच वाºयाचा प्रवाह बघून फवारणी करण्याची दिशा ठरवावी, असे आवाहन बैठकीद्वारे करण्यात आले.