शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

रबी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर

By admin | Updated: April 8, 2015 00:07 IST

चिमूर तालुका दुष्काळग्रस्त असताना सुद्धा रबी पीक घेणारे १०४ गावे मदतीपासून वंचित असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे....

मदत देताना भेदभाव : १०४ गावांतील शेतकरी मदतीपासून वंचितचिमूर : चिमूर तालुका दुष्काळग्रस्त असताना सुद्धा रबी पीक घेणारे १०४ गावे मदतीपासून वंचित असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.चिमूर तालुक्यात २५९ गावे असून १५५ गावे खरीप हंगामातील आहे तर १०४ गावे रबी हंगामात आहे. सन २०१४ या वर्षात दुष्काळग्रस्त गावांची यादी बनविताना केवळ खरीप गावांनाच मदत देण्याचा प्रकार चिमूर तालुक्यात घडला आहे.१५५ गावांतील २३ हजार ७७५ शेतकरी खरीप हंगामात बाधित दाखविण्यात आले आहेत. त्यांना मदतीपोटी १० कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. मात्र शासनाने ही मदत देताना खरीप व रबी असा भेदभाव करीत सर्व शेतकऱ्यांना मदत दिली नाही. १०४ गावांत रबीचे पिके घेतली जातात. त्यात गहू, चणा, लाख, लाखोळी, जवस, मूग आदी पिके घेतली जातात. याची सातबाऱ्यावर नोंदसुद्धा आहे. यावरच पीक कर्जसुद्धा घेतल्या जाते. खरीप व रबी गावांची वेगवेगळी माहिती शासनाकडे महसूल विभाग सादर करतो. खरिपाची आणेवारी १५ जानेवारी व रब्बीची आणेवारी १५ मार्चपर्यंत सादर केल्या जातो. दोन्ही आणेवाऱ्या ५० टक्के रकमेचे आत असून देखील १०४ गावातील हजारो शेतकरी मदतीपासून वंचित आहे. त्यात प्रामुख्याने शंकरपूर, कोलारी, साठगाव, येरखडा, कन्हाळगाव, महालगाव, सोनेगाव, खापरी, भिवकुंड, परसोडी, शिवापूर, आतगाव, मूरपार, बोथली आदी गावाचा समावेश होतो.रबी हंगामाची आणेवारी ४४ टक्के आहे. त्यामुळे रबी दुष्काळ घोषित करून मदत करावी व लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)शेतकरी हतबलयंदा निसर्गाने शेतकऱ्यांना दगा दिला. सुरूवातील बेपत्ता झालेला पाऊस नंतरच्या काळात अधुनमधून बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण वेळापत्रकच कोलमडून गेले. त्यात आता सरकारकडूनही शेतकऱ्यांनी हेटाळणी केली जात आहे.