शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

पोंभूर्ण्याच्या १५ गावांचा पाणी प्रश्न सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:40 IST

पोंभूर्णा तालुक्यातील १५ गावांसाठी राष्ट्रीय ग्रामीण जलपेय कार्यक्रम अंतर्गत २०१८- १९ च्या वार्षिक कृती आराखड्यात प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचा समावेश करण्यात आला. या योजनेसाठी कोट्यवधी रूपयांचा निधी लागत असल्याने योजनेच्या अस्तित्वाविषयी शंका उपस्थित केल्या जात होत्या.

ठळक मुद्दे२९ कोटी ९४ लाखांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी : प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचा मार्ग मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पोंभूर्णा तालुक्यातील १५ गावांसाठी राष्ट्रीय ग्रामीण जलपेय कार्यक्रम अंतर्गत २०१८- १९ च्या वार्षिक कृती आराखड्यात प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचा समावेश करण्यात आला. या योजनेसाठी कोट्यवधी रूपयांचा निधी लागत असल्याने योजनेच्या अस्तित्वाविषयी शंका उपस्थित केल्या जात होत्या. दरम्यान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने तब्बल २९ कोटी ९४ लाख ६७ हजार १९७ रूपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या या तालुक्यातील १५ गावांना मोठा दिलासा मिळाला आहे.पोभूर्णा तालुक्यातील १५ गावांमध्ये मागील अनेक वर्षांपासून पिण्याचे पुरेसे पाणी मिळत नाही. जलस्त्रोतांची पातळी खालावल्याने विहिरी व हातपंपांच्या आधारे नागरिकांची पाणी गरज पूर्ण होत नाही. उन्हाळ्यात तर महिलांचे प्रचंड हाल होतात. त्यामुळे मोठ्या नळ योजनेची गरज होती. नागरिकांची मागणी लक्षात घेऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत पाणी पुरवठा विभागाने सन २०१८- १९ च्या वार्षिक कृती आराखड्यात या तालुक्यातील संकटग्रस्त १५ गावांसाठी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेत समावेश करण्यात आला. योजनेचे अंदाजपत्रक संबंधित विभागाने प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे सादर केले होते.योजनेचे अंदाजपत्रक व आराखड्याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता यांनी यापूर्वीच तांत्रिक मान्यता दिली होती. याशिवाय मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समितीच्या ९ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या बैठकीत सदर योजनेच्या सविस्तर प्रकल्प अहवालास मंजुरी देण्यात आली होती. राज्य पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून मंजुरीची प्रतीक्षा होती. सोमवारी राज्याच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यासन अधिकारी रा.अ. साबणे यांनी या नळपाणी पुरवठा योजनेसाठी २९ कोटी ९४ लाख ६७ हजार १९७ रूपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरीचा शासन निर्णय जारी केला आहे.दरडोई खर्च ५ हजार ९११ रूपयेप्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेसाठी दरडोई ५५ लिटर दर दिवशी क्षमतेच्या ५ हजार ९९१ इतका दरडोई खर्च होणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे देण्यात आली. योजना पूर्ण झाल्यानंतर संबंधित कंत्राटदारालाच किमान एक वर्षे चालवावी लागेल. वर्षभरात ग्रामस्थांकडून पाणीकर वसूल करण्याची मुभा कंत्राटदाराला देण्यात आली. योजनेची ई-निविदा लवकरच मागविण्यात येणार आहे.१०० टक्के घरगुती नळ जोडण्याया योजनेमध्ये १०० टक्के घरगुती नळ जोडण्या व मीटरचा समावेश राहणार आहे. किमान ८० टक्के नळजोडणी धारकाकडून स्वखर्चाने मीटर जोडणी घेण्याबाबत हमीपत्र मागविण्यात येईल. हमीपत्राची एक लॅमिनेट प्रत नळ जोडणीधारक व ग्रामपंचायतला दिल्यानंतरच कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे.तरीही ५० टक्के पाणीकर वसूलग्रामसभेचा ठराव व हमीपत्र दिल्यानंतरही एखादा ग्रामस्थ पाणी घेण्यास नकार देऊ शकतो. तरीही अशा व्यक्तींकडून किमान ५० टक्के पाणीकर वसुली बंधनकारक राहणार आहे. निविदा प्रक्रिया सुरू होण्याअगोदरच यासंदर्भातील माहिती ग्रामस्थांनाच देऊनच ग्रामसभेचा तसा ठरावा घेण्याच्या सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने दिल्या. त्यामुळे या जाचक अटींबाबत नागरिकांमध्ये मतेमतांतरे उमटण्याची शक्यता आहे.पाणीकर मान्य नसल्यास निविदा नाहीयोजना चालविणे व देखभाल दुरूस्ती यासाठी लागणारा खर्चाचा ताळमेळ कसा ठेवावा, ही जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींची आहे. अंमलबजावणीसाठी प्रस्तावात नमुद केल्यानुसार घरगुती, बिगर घरगुती व संस्थात्मक नळ जोडणीधारकांसाठी पाणी कराचा किमान दर ग्रामपंचायतींना निश्चित करता येईल. मात्र, पाणी दराबाबत ग्रामस्थांची मान्यता नसल्यास संबंधित विभागाला निविदाच काढता येणार नाही, अशी तरतूद आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई