शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाच्या हमीभावाचा प्रश्न अंधातरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:48 IST

शासनाने शेतकऱ्यांच्या भावनांचे केवळ राजकारण केले. शेतकऱ्यांच्या आवश्यक बाबींकडे कमालीचे दुर्लक्ष केल्याने कधी, नव्हे एवढा शेतकरी त्रस्त झाला. पीक कर्ज मिळालेच नाही, विम्याच्या रक्कमेनेही हुलकावणी दिली. शेतरस्त्यांची कामेच थांबली, अनेक योजनांचा बोजवारा उडाला, असे मत जिल्ह्यातील शेतकºयांचे आहे.

ठळक मुद्देनिवडणूक आल्या आणि गेल्या : शेतकऱ्यांवर केवळ आश्वासनाचा पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाने शेतकऱ्यांच्या भावनांचे केवळ राजकारण केले. शेतकऱ्यांच्या आवश्यक बाबींकडे कमालीचे दुर्लक्ष केल्याने कधी, नव्हे एवढा शेतकरी त्रस्त झाला. पीक कर्ज मिळालेच नाही, विम्याच्या रक्कमेनेही हुलकावणी दिली. शेतरस्त्यांची कामेच थांबली, अनेक योजनांचा बोजवारा उडाला, असे मत जिल्ह्यातील शेतकºयांचे आहे.मागील काही वर्षांत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी न होता वाढले. आॅनलाईन पीक कर्ज, पीक विम्याची रक्कम मिळण्यातही कमालीचा त्रास झाल्याचा अनुभव शेतकºयांना आला. उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्के नफ्याने हमीभाव देण्याच्या मुद्यांवर तर शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेती उत्पादनाला भाव मिळत नसल्याने कर्ज वाढत असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.कर्जमाफी केवळ आश्वासन1 शासन तसेच विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केवळ राजकारण केले आहे. या भरोवश्यावर ते सत्तेत येतात. मात्र त्यानंतर ते विसरतात. शेतकºयांचे प्रश्न कधीच सुटू नये, अशी भावना आजच्या राजकारण्यांची असल्याची भावना आता शेतकरी व्यक्त करीत आहे.2कर्जमाफी देताना ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकित होते. त्यांना त्याचा लाभ झाला. मात्र ज्यांनी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड केली त्यांचे काय, त्यांना केवळ २० ते २५ हजार रुपये देऊन केवळ बोळवण केली. हा दुजाभाव करून राज्यसरकारने शेतकऱ्यांमध्ये भांडण लावून देण्याचे काम सुरू केल्याचे मतही काही शेतकऱ्यांचे आहे..3सरसकट कर्जमाफी,शेतउत्पादनाला योग्य भाव, रासायनिक खते, बियाणे अनुदानावर दिल्यास शेतकºयांना दिलासा मिळू शकतो.जाचक अटी लादू नयेशेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमी भाव द्यावा, दुष्काळी अनुदान द्यावे, कर्जमाफीतील जाचक अटी रद्द कराव्या, शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये कर्ज द्यावे, शेती उपयोगी साहित्य सवलतीच्या दरात द्यावे, संपूर्ण सात-बारा कोरा करावा, या मागण्यांवर विचार करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावा, अशी शासनाला वाटत असेल तर शासनाने प्रथम शेतीमालाला आधारभूत किंमत देणे आवश्यक आहे. त्याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.शेतकरी संकटात का?पारंपारिक शेती करण्याची पद्धत. सिंचनाचा अभाव, योग्य मार्गदर्शन नाही. रासायनिक खते, बियानांच्या वाढत्या किंमती, योग्य बाजारभाव न मिळते, पिककर्ज देताना अनेक अडचणी.रोहयोसाठी निधीची अडचण1रोजगार हमी योजनेच्या कामांसाठी निधी मिळण्यास ब्रेक लावण्यात आला होता. याबाबत ओरड झाल्याने केंद्र शासनाने १४ डिसेंबर २०१८ रोजी संपूर्ण राज्यभरासाठी २५० कोटी रुपये निधी दिली. त्यातही खर्च करण्याला अनेक निकष असल्याने शेत रस्त्यांची कामे सुरुच झाली नाहीत.2महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेच्या कामांसाठी राज्यात गेल्या आॅक्टोबर २०१७ पासून निधी मिळण्याचा मार्गच रोखल्याने या काळात राज्यभरात सुरु असलेली तब्बल १४,७४० कामे थांबविण्यात आली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकchandrapur-pcचंद्रपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019