शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

शेतमालाच्या हमीभावाचा प्रश्न अंधातरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 23:48 IST

शासनाने शेतकऱ्यांच्या भावनांचे केवळ राजकारण केले. शेतकऱ्यांच्या आवश्यक बाबींकडे कमालीचे दुर्लक्ष केल्याने कधी, नव्हे एवढा शेतकरी त्रस्त झाला. पीक कर्ज मिळालेच नाही, विम्याच्या रक्कमेनेही हुलकावणी दिली. शेतरस्त्यांची कामेच थांबली, अनेक योजनांचा बोजवारा उडाला, असे मत जिल्ह्यातील शेतकºयांचे आहे.

ठळक मुद्देनिवडणूक आल्या आणि गेल्या : शेतकऱ्यांवर केवळ आश्वासनाचा पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाने शेतकऱ्यांच्या भावनांचे केवळ राजकारण केले. शेतकऱ्यांच्या आवश्यक बाबींकडे कमालीचे दुर्लक्ष केल्याने कधी, नव्हे एवढा शेतकरी त्रस्त झाला. पीक कर्ज मिळालेच नाही, विम्याच्या रक्कमेनेही हुलकावणी दिली. शेतरस्त्यांची कामेच थांबली, अनेक योजनांचा बोजवारा उडाला, असे मत जिल्ह्यातील शेतकºयांचे आहे.मागील काही वर्षांत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी न होता वाढले. आॅनलाईन पीक कर्ज, पीक विम्याची रक्कम मिळण्यातही कमालीचा त्रास झाल्याचा अनुभव शेतकºयांना आला. उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्के नफ्याने हमीभाव देण्याच्या मुद्यांवर तर शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेती उत्पादनाला भाव मिळत नसल्याने कर्ज वाढत असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.कर्जमाफी केवळ आश्वासन1 शासन तसेच विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केवळ राजकारण केले आहे. या भरोवश्यावर ते सत्तेत येतात. मात्र त्यानंतर ते विसरतात. शेतकºयांचे प्रश्न कधीच सुटू नये, अशी भावना आजच्या राजकारण्यांची असल्याची भावना आता शेतकरी व्यक्त करीत आहे.2कर्जमाफी देताना ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकित होते. त्यांना त्याचा लाभ झाला. मात्र ज्यांनी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड केली त्यांचे काय, त्यांना केवळ २० ते २५ हजार रुपये देऊन केवळ बोळवण केली. हा दुजाभाव करून राज्यसरकारने शेतकऱ्यांमध्ये भांडण लावून देण्याचे काम सुरू केल्याचे मतही काही शेतकऱ्यांचे आहे..3सरसकट कर्जमाफी,शेतउत्पादनाला योग्य भाव, रासायनिक खते, बियाणे अनुदानावर दिल्यास शेतकºयांना दिलासा मिळू शकतो.जाचक अटी लादू नयेशेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमी भाव द्यावा, दुष्काळी अनुदान द्यावे, कर्जमाफीतील जाचक अटी रद्द कराव्या, शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये कर्ज द्यावे, शेती उपयोगी साहित्य सवलतीच्या दरात द्यावे, संपूर्ण सात-बारा कोरा करावा, या मागण्यांवर विचार करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावा, अशी शासनाला वाटत असेल तर शासनाने प्रथम शेतीमालाला आधारभूत किंमत देणे आवश्यक आहे. त्याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.शेतकरी संकटात का?पारंपारिक शेती करण्याची पद्धत. सिंचनाचा अभाव, योग्य मार्गदर्शन नाही. रासायनिक खते, बियानांच्या वाढत्या किंमती, योग्य बाजारभाव न मिळते, पिककर्ज देताना अनेक अडचणी.रोहयोसाठी निधीची अडचण1रोजगार हमी योजनेच्या कामांसाठी निधी मिळण्यास ब्रेक लावण्यात आला होता. याबाबत ओरड झाल्याने केंद्र शासनाने १४ डिसेंबर २०१८ रोजी संपूर्ण राज्यभरासाठी २५० कोटी रुपये निधी दिली. त्यातही खर्च करण्याला अनेक निकष असल्याने शेत रस्त्यांची कामे सुरुच झाली नाहीत.2महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजनेच्या कामांसाठी राज्यात गेल्या आॅक्टोबर २०१७ पासून निधी मिळण्याचा मार्गच रोखल्याने या काळात राज्यभरात सुरु असलेली तब्बल १४,७४० कामे थांबविण्यात आली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकchandrapur-pcचंद्रपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019