शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

घुग्घूस नगर परिषदेचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: August 3, 2014 23:19 IST

घुग्घूस ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा मिळावा म्हणून मागील पंधरा वर्षांपासून नागरिकांंची मागणी आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी नागरिकांत असंतोष निर्माण झाला

घुग्घूस : घुग्घूस ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा मिळावा म्हणून मागील पंधरा वर्षांपासून नागरिकांंची मागणी आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी नागरिकांत असंतोष निर्माण झाला असून आता नगर परिषदेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्राम पंचायतीला नगर परिषदेचा दर्जा मिळावा म्हणून संघर्ष समितीचेही गठण करण्यात आले आहे.चंद्रपूर तालुक्यात घुग्घूस ग्रामपंचायत मोठी असून औद्योगिक गाव म्हणून ओळखले जाते. येथे वेकोलिची कोळसा खाण, सिमेंट कारखाना आहे. त्यामुळे दिवसेंदिवस येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे नागरिक सुविधा पुरविताना ग्रामपंचायतीला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातही शासनाकडून येणारा निधी कमी मिळत असल्याने विकास कामात अडचण निर्माण होत आहे.या ग्रामपंचायतीला नगर परिषदेचा दर्जा मिळावा यासाठी पक्ष पातळीवर अनेकवेळा आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन शासनदरबारी पाठविण्यात आले. परंतु लोकप्रतिनिधी तथा शासनाने येथील नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.स्थानिक ग्रामपंचायतीने ग्रामसभा, मासिकसभा या माध्यमातून अनेकवेळा ठराव करून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. निवडणुकीत लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्वासनाचा पाऊस पाडण्यात आला. परंतु इच्छाशक्तीच्या अभावामुळे व ठोस पाठपुराव्याअभावी येथील नगरपालिकेचा भिजत घोंगडे आहे. नगर परिषदेच्या मागणीकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)