शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

सर्वांचा प्रश्न, कधी लावणार यादी?

By admin | Updated: January 28, 2017 00:51 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्याप यादीचा घोळ संपलेला नाही.

आघाडीचा चेंडू मुंबईच्या कोर्टात : भाजपाची सावध भूमिका, शिवसेना उत्साहातचंद्रपूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्याप यादीचा घोळ संपलेला नाही. २४ किंवा २५ जानेवारीला यादी जाहीर करू, असे सांगत नेत्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरविला असला तरी, अद्याप कुण्याही पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. यामुळे इच्छुक उमेदवार दबावात तर, पुढारी राजकारणात गुंतले असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसत आहे.जिल्ह्यात वाढत असलेले भाजपाचे प्रस्थ लक्षात घेता सर्वच पक्षांनी आपआपल्या परीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तिकीट न मिळालेल्या नाराजांना बंडखोरीसाठी अधिक वेळ मिळू नये आणि त्यांचा उपद्रव रोखण्यासाठी मागील काही वर्षांपासून अगदी वेळेवर उमेदवार जाहीर करण्याची पद्धत पक्षांनी अवलंबिली आहे. त्याची री या वेळी जवळपास सर्वच पक्षांनी ओढलेली दिसत आहे. भाजपाची तयारी आधीपासून असली तरी उमेदवार कोण असतील याची घोषणा झालेली नाही. देवराव भोंगळे, संध्या गुरनुले या दोघांचा अपवाद वगळता तिसऱ्या नावाची घोषणा पक्षाने केली नसल्याने इच्छुक उमेदवार दबावात आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्याची चिन्हे असली तरी निर्णयाचा चेंडू मुंबईच्या कोर्टात अडला आहे. तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार मुंबईला गेले होते. युतीचा प्रस्ताव देण्यासाबतच जागांचा प्रस्ताव त्यांनी पक्षनेते अजीत पवार यांच्याकडे दिला आहे. दुसरीकडे आमदार विजय वडेट्टीवार यांनीही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेऊन यादी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीने आधी प्रत्येक तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन जागा मागितल्या होत्या. मात्र त्या मागणीला स्थानिक स्तारवर विरोध झाल्याने राकॉकडून सर्व मिळून १४ जागांची मागणी मागणी पुढे आली. अगदी अलिकडच्या घटनाक्रमात हा आकडा आता १२ वर आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी १२ जागा कोणत्या सोडायच्या, यावर पक्षात खल सुरू आहे. काँग्रेसमध्ये असणारी नेत्यांची चढाओढही या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे. यावर पर्याय म्हणून स्थानिक विधानसभा मतदार संघात वजन असलेल्या नेत्यांकडे जागावाटपाटपाचा अधिकार सोपविण्याच्या विचारात नेतेमंडळीचे एकमत झाल्याची माहिती आहे. असे असले तरी अद्याप अंतीम निर्णय न झाल्याने विलंब वाढला आहे.अधिक माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्यातील अंतीम चर्चेनंतरच आघाडीतील जागांचा निर्णय होणार आहे. शुक्रवारी मुंबईत दिवसभर काँग्रेसची बैठक झाली. मात्र नागपूर महानगर पालिकेच्या विषयावरच चर्चा अधिक लांबल्याने चंद्रपूरच्या संदर्भात काय निर्णय झाला, हे वृत्त लिहीपर्यंत कळू शकले नाही.शिवसेनेने स्वबळावर लढण्याची आपली भूमिका आधीच जाहीर केली होती. असे असले तरी ठाणे-मुंबईतील निर्णयाकडेही स्थानिक नेत्यांचे लक्ष होते. वरच्या पातळीवर युती तुटल्याने आता स्थानिक नेतेमंडळी निर्णयासाठी मोकळी झाली आहे. असे असले तरी, जिल्हा परिषदेच्या सर्वच जागांवर एकाचवेळी उमेदवार देताना बराच ताण पडत असल्याने पक्षात विचारमंथन सुरू असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समितीच्याही निवडणुका असल्याने उमेदवारांचा चेहरा ठरविताना सर्वच पक्षात बराच विचार होत असल्याची माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)