शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
6
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
7
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
8
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
9
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
10
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
11
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
12
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
13
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
14
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
15
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
16
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
17
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
18
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
19
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
20
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर

सर्वांचा प्रश्न, कधी लावणार यादी?

By admin | Updated: January 28, 2017 00:51 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्याप यादीचा घोळ संपलेला नाही.

आघाडीचा चेंडू मुंबईच्या कोर्टात : भाजपाची सावध भूमिका, शिवसेना उत्साहातचंद्रपूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्याप यादीचा घोळ संपलेला नाही. २४ किंवा २५ जानेवारीला यादी जाहीर करू, असे सांगत नेत्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरविला असला तरी, अद्याप कुण्याही पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. यामुळे इच्छुक उमेदवार दबावात तर, पुढारी राजकारणात गुंतले असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसत आहे.जिल्ह्यात वाढत असलेले भाजपाचे प्रस्थ लक्षात घेता सर्वच पक्षांनी आपआपल्या परीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तिकीट न मिळालेल्या नाराजांना बंडखोरीसाठी अधिक वेळ मिळू नये आणि त्यांचा उपद्रव रोखण्यासाठी मागील काही वर्षांपासून अगदी वेळेवर उमेदवार जाहीर करण्याची पद्धत पक्षांनी अवलंबिली आहे. त्याची री या वेळी जवळपास सर्वच पक्षांनी ओढलेली दिसत आहे. भाजपाची तयारी आधीपासून असली तरी उमेदवार कोण असतील याची घोषणा झालेली नाही. देवराव भोंगळे, संध्या गुरनुले या दोघांचा अपवाद वगळता तिसऱ्या नावाची घोषणा पक्षाने केली नसल्याने इच्छुक उमेदवार दबावात आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्याची चिन्हे असली तरी निर्णयाचा चेंडू मुंबईच्या कोर्टात अडला आहे. तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार मुंबईला गेले होते. युतीचा प्रस्ताव देण्यासाबतच जागांचा प्रस्ताव त्यांनी पक्षनेते अजीत पवार यांच्याकडे दिला आहे. दुसरीकडे आमदार विजय वडेट्टीवार यांनीही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेऊन यादी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीने आधी प्रत्येक तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन जागा मागितल्या होत्या. मात्र त्या मागणीला स्थानिक स्तारवर विरोध झाल्याने राकॉकडून सर्व मिळून १४ जागांची मागणी मागणी पुढे आली. अगदी अलिकडच्या घटनाक्रमात हा आकडा आता १२ वर आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी १२ जागा कोणत्या सोडायच्या, यावर पक्षात खल सुरू आहे. काँग्रेसमध्ये असणारी नेत्यांची चढाओढही या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे. यावर पर्याय म्हणून स्थानिक विधानसभा मतदार संघात वजन असलेल्या नेत्यांकडे जागावाटपाटपाचा अधिकार सोपविण्याच्या विचारात नेतेमंडळीचे एकमत झाल्याची माहिती आहे. असे असले तरी अद्याप अंतीम निर्णय न झाल्याने विलंब वाढला आहे.अधिक माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्यातील अंतीम चर्चेनंतरच आघाडीतील जागांचा निर्णय होणार आहे. शुक्रवारी मुंबईत दिवसभर काँग्रेसची बैठक झाली. मात्र नागपूर महानगर पालिकेच्या विषयावरच चर्चा अधिक लांबल्याने चंद्रपूरच्या संदर्भात काय निर्णय झाला, हे वृत्त लिहीपर्यंत कळू शकले नाही.शिवसेनेने स्वबळावर लढण्याची आपली भूमिका आधीच जाहीर केली होती. असे असले तरी ठाणे-मुंबईतील निर्णयाकडेही स्थानिक नेत्यांचे लक्ष होते. वरच्या पातळीवर युती तुटल्याने आता स्थानिक नेतेमंडळी निर्णयासाठी मोकळी झाली आहे. असे असले तरी, जिल्हा परिषदेच्या सर्वच जागांवर एकाचवेळी उमेदवार देताना बराच ताण पडत असल्याने पक्षात विचारमंथन सुरू असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समितीच्याही निवडणुका असल्याने उमेदवारांचा चेहरा ठरविताना सर्वच पक्षात बराच विचार होत असल्याची माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)