शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

गुणवंत हेच देशाचे आधारस्तंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 22:57 IST

क्षेत्र कोणतेही असो. या क्षेत्रातील गुणवंत हेच देशाच खऱ्या अर्थाने आधारस्तंभ असतात. गुणवंतांचा सन्मान करणे ही देशाची संस्कृती व परंपरा आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व अन्य क्षेत्रात कार्य करणाºय संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र चोपणे यांनी केले.

ठळक मुद्देभालचंद्र चोपणे : अडीचशे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : क्षेत्र कोणतेही असो. या क्षेत्रातील गुणवंत हेच देशाच खऱ्या अर्थाने आधारस्तंभ असतात. गुणवंतांचा सन्मान करणे ही देशाची संस्कृती व परंपरा आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व अन्य क्षेत्रात कार्य करणाºय संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र चोपणे यांनी केले.भाजपा चंद्रपूर महानगराच्या वतीने रविवारी स्थानिक माता कन्यका परमेश्वरी सभागृहात पार पडलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी अडीचशे गुणवंत विद्यार्थ्यांचा ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नाना शामकुळे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, चांदा पब्लिक स्कुलच्या अध्यक्ष स्मिता जीवतोडे, गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू कीर्तीवर्धन दीक्षित, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसुदन रूंगठा, जि.प. समाज कल्याण सभापती, ब्रिजभूषण पाझारे, उपस्थित होते.आ. नाना श्यामकुळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून अभ्यासाला महत्त्व दिले पाहिजे. गरजू विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. यावेळी निवडक सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी डॉ. चोपणे म्हणाले, जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगला छंद जोपासावा. स्वयंनिष्ठा ध्येयनिष्ठा, सत्यनिष्ठा, कर्तव्यनिष्ठा, अध्ययननिष्ठा व समाजनिष्ठेकडे दुर्लक्ष करू नये. प्रास्ताविक राहुल सराफ तर संचालन नासिर खान यांनी केले. आभार शितल कुळमेथे यांनी केले.देशासाठी समर्पित तरूणाईची गरज : हंसराज अहीरविद्यार्थी हेच उद्याच्या पिढीचे प्रणेते आहेत. युवकांनी रोजगाराबरोबरच स्वयंरोजगार करता यावा यासाठी अनेक योजना सरकारने सुरू केल्या. आर्थिक प्रगती करून समाज व राष्ट्रसेवेसाठी समर्पित तरूणाईची आज खरी गरज आहे. त्यासाठी महापुरूषांपासून प्रेरणा घ्यावी, असे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.