शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
3
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
4
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
6
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
7
Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
8
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
9
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
10
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
11
बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब
12
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
13
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
14
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
15
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
16
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
17
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
18
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
19
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
20
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?

गुणवंत हेच देशाचे आधारस्तंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 22:57 IST

क्षेत्र कोणतेही असो. या क्षेत्रातील गुणवंत हेच देशाच खऱ्या अर्थाने आधारस्तंभ असतात. गुणवंतांचा सन्मान करणे ही देशाची संस्कृती व परंपरा आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व अन्य क्षेत्रात कार्य करणाºय संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र चोपणे यांनी केले.

ठळक मुद्देभालचंद्र चोपणे : अडीचशे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : क्षेत्र कोणतेही असो. या क्षेत्रातील गुणवंत हेच देशाच खऱ्या अर्थाने आधारस्तंभ असतात. गुणवंतांचा सन्मान करणे ही देशाची संस्कृती व परंपरा आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व अन्य क्षेत्रात कार्य करणाºय संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र चोपणे यांनी केले.भाजपा चंद्रपूर महानगराच्या वतीने रविवारी स्थानिक माता कन्यका परमेश्वरी सभागृहात पार पडलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी अडीचशे गुणवंत विद्यार्थ्यांचा ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नाना शामकुळे, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, चांदा पब्लिक स्कुलच्या अध्यक्ष स्मिता जीवतोडे, गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू कीर्तीवर्धन दीक्षित, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसुदन रूंगठा, जि.प. समाज कल्याण सभापती, ब्रिजभूषण पाझारे, उपस्थित होते.आ. नाना श्यामकुळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून अभ्यासाला महत्त्व दिले पाहिजे. गरजू विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. यावेळी निवडक सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी डॉ. चोपणे म्हणाले, जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगला छंद जोपासावा. स्वयंनिष्ठा ध्येयनिष्ठा, सत्यनिष्ठा, कर्तव्यनिष्ठा, अध्ययननिष्ठा व समाजनिष्ठेकडे दुर्लक्ष करू नये. प्रास्ताविक राहुल सराफ तर संचालन नासिर खान यांनी केले. आभार शितल कुळमेथे यांनी केले.देशासाठी समर्पित तरूणाईची गरज : हंसराज अहीरविद्यार्थी हेच उद्याच्या पिढीचे प्रणेते आहेत. युवकांनी रोजगाराबरोबरच स्वयंरोजगार करता यावा यासाठी अनेक योजना सरकारने सुरू केल्या. आर्थिक प्रगती करून समाज व राष्ट्रसेवेसाठी समर्पित तरूणाईची आज खरी गरज आहे. त्यासाठी महापुरूषांपासून प्रेरणा घ्यावी, असे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.