शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

हमीभावापेक्षा कमी दराने कापसाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 06:00 IST

कधी ओला दुष्काळ तर कधी सुका. वारंवार होणाऱ्या नापिकीमुळे शेतकऱ्यांची अवस्था आणखी बिकट होत आहे. यावर्षी बऱ्यापैकी पाऊस पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामात मोठ्या उत्साहात कापसाची पेरणी केली. नगदी पीक म्हणून अनेक शेतकऱ्यांनी कापसाला पसंती दर्शविली. मात्र हंगामाच्या मध्येच पावसाने दगा दिला.

ठळक मुद्देअवकाळीचा परिणाम : आर्द्रता कमी असल्याची सबब

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाने कापसासाठी हमीभाव जाहीर केला. पणन महासंघ व सीसीआयच्या माध्यमातून कापसाची खरेदीही जिल्ह्यात सुरू केली. मात्र मध्ये अवकाळी पाऊस झाल्याने कापूस पिकाची प्रतवारी थोडी खराब झाली. आता कापसाची आर्द्रता १२ टक्क्याहून अधिक असल्याचे कारण सांगून पणन महासंघ व खासगी व्यापारीदेखील कापसाला हमीभावापेक्षा अतिशय कमी दर देत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरातच ठेवला आहे. आज ना उद्या कापसाचे भाव वाढेल या आशेवर शेतकरी आहेत.मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी सुका. वारंवार होणाऱ्या नापिकीमुळे शेतकऱ्यांची अवस्था आणखी बिकट होत आहे. यावर्षी बऱ्यापैकी पाऊस पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामात मोठ्या उत्साहात कापसाची पेरणी केली. नगदी पीक म्हणून अनेक शेतकऱ्यांनी कापसाला पसंती दर्शविली. मात्र हंगामाच्या मध्येच पावसाने दगा दिला. त्यामुळे उत्पादनावर विपरित परिणाम झाला. तरीही अनेक शेतकऱ्यांनी कसेबसे पीक वाचविले. आता कापसाच्या वेचण्या होऊन कापूस शेतकºयांच्या हाती येत असताना अवकाळी पावसाने व ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांचे नुकसान केले. यंदा कापसाला सहा हजार रूपयांहून अधिक दर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. कापसाच्या उत्पादनात घट झाल्याने यावर्षी वाढलेले दर शेतकऱ्यांना तारणार असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही. शासनाने कापसाला ५५५० रुपये हमीभाव जाहीर केला. राजुरा, कोरपना, जिवती, वरोरा तालुक्यात नगदी पीक म्हणून कापसाचे उत्पादन घेतले जाते. कापसावरच शेतकऱ्यांचा वर्षभराचा आर्थिक बजेट अवलंबून असतो. कापूस पीक हातात येत असताना अचानक जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसला. तीन-चार वेळा अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. त्यामुळे कापसाची प्रतवारी खराब झाली. पणन महासंघ कापूस खरेदी करताना कापसाची आर्द्रता तपासते. १२ टक्क्यापेक्षा अधिक आर्द्रता असेल तर कापसाची प्रतवारी खराब असल्याचे समजले जाते. आता शेतकरी कापूस घेऊन शासकीय खरेदी केंद्रावर जात आहेत. मात्र आर्द्रता अधिक असल्याचे सांगून या केंद्रावर हमीभावापेक्षा कमी दर देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली जात आहे. कापसाचे दर अचानक खाली आल्याने शेतकरी निराश झाला आहे. एक तर यंदा कापसाचे जादा उत्पादन नाही आणि कापसाचे भाव कोसळल्याने शेतकºयांना मोठा फटका बसला आहे.दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस घरातचकापूस दरवाढ आज ना उद्या होईल, या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी कापूस घरी भरून ठेवला आहे. जेव्हा कापसाला हमीभाव जाहीर केला, तेव्हा अनेक शेतकऱ्यांचा कापूस निघाला नव्हता. मात्र कापूस निघताच अवकाळी पाऊस येऊन कापसाची आर्द्रता वाढली. त्यामुळे कापसाचे दर पाडल्याने कवडीमोल दरात कापूस विकणे शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नाही. कापसाला ५ हजाराहूनही कमी दर शासकीय केंद्रातून मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस सध्या दरवाढीच्या प्रतीक्षेत घरीच ठेवला आहे.खासगी व्यापाऱ्यांकडून लूटवर्षभराचे संबंध असल्याने व अडीअडचणीत खासगी व्यापारी मदत करीत असल्याने अनेक शेतकरी पणन महासंघाकडे कापूस न विकता खासगी व्यापाऱ्यांकडे जातात. मात्र आता खासगी व्यापारीदेखील कापसाची आर्द्रता अधिक असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी लूट करीत आहेत. कापसाला प्रति क्विंटल केवळ ४८०० ते ५००० रुपये प्रमाणे दर दिला जात आहे.

टॅग्स :cottonकापूस