शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

पुलवामा घटनेचे जिल्ह्यात पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 22:04 IST

जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे जैश-ए-महम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद चंद्रपूर जिल्ह्यात उमटले. विविध संघटनांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. ठिकठिकाणी कॅन्डल मार्च काढून शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

ठळक मुद्देठिकठिकाणी कॅन्डल मार्च : हाफिज सईदच्या पुतळ्याचे दहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे जैश-ए-महम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या भ्याड हल्ल्याचे पडसाद चंद्रपूर जिल्ह्यात उमटले. विविध संघटनांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. ठिकठिकाणी कॅन्डल मार्च काढून शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. चंद्रपूर येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या वतीने शनिवारी दहशतवादी हाफिज सईदच्या प्रतिकात्मतक पुतळ्याचे दहन करण्यात आले. याशिवाय मनसेनेही प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून घटनेबाबत संताप व्यक्त केला.यावेळी अभाविपचे नगरमंत्री स्नेहीत लांजेवार, सहमंत्री यश बांगडे, सोशल मीडिया व प्रसिद्धी प्रमुख प्रवीण गिलबिले, मनीष पीपरे, प्रज्वल गार्गेलवर, सागर येळे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ओंकार अंदनकर, राहुल भोयर, वैभव बललेवार, अनंत भाकरे, राहुल ताकधत, साकेत सोनकुसरे व कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. स्टुडन्ट फोरम ग्रुपतर्फे राजीव गांधी चौक ते बस स्थानकापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला. मनसेनेही भ्याड हल्ल्याचा निषेध करीत दहशतवाद्यांचा पुतळ्याचे दहन केले व पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुनिता गायकवाड, प्रकाश नागरकर, विवेक धोटे, प्रतिमा ठाकूर आदी उपस्थित होते. वीरगती प्राप्त झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. चंद्रपूरसह जिल्ह्यात विविध ठिकाणी सामाजिक संघटनांनी कॅन्डल मार्च काढला.इको-प्रोची रक्तस्वाक्षरी मोहीमपुलवामा जिल्ह्यातील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ इको-प्रो संघटनेच्या वतीने अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात एक निवेदन तयार करून त्यावर नागरिक, कार्यकर्त्यांच्या रक्ताने स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हे रक्तस्वाक्षरीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येणार आहे.सोमवारी बाजारपेठ बंदचेंबर आॅफ कॉमर्स व व्यापारी संघटनांतर्फे भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी गांधी चौकातून कॅन्डल मार्च काढण्यात येणार असून सोमवारी व्यापारपेठ बंद ठेवण्यात येणार असल्याचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी यांनी सांगितले.