शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

वैयक्तिक टीकेमुळे प्रचाराची पातळी घसरतेयं

By admin | Updated: October 8, 2014 23:24 IST

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली असून १५ दिवसांपूर्वी गुण्यागोविंदाने राहत असलेले सर्वच पक्ष सत्तेच्या हव्यासापोटी एकमेकांची उणी-दुणी काढत आहेत. एकमेकांवर चिखल फेकण्याचे

ब्रह्मपुरी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली असून १५ दिवसांपूर्वी गुण्यागोविंदाने राहत असलेले सर्वच पक्ष सत्तेच्या हव्यासापोटी एकमेकांची उणी-दुणी काढत आहेत. एकमेकांवर चिखल फेकण्याचे लोन सर्वच ठिकाणी दिसत असून साम, दाम, दंड आता प्रचारात सुरू झाला आहे.वैयक्तिक टिकाटिपणीमुळे कोणताही पक्ष भविष्यातील मतदारसंघाच्या ‘व्हिजन’बद्दल बोलताना दिसत नाही. नेत्यांच्या वैयक्तिक टीकेमुळे कधी नव्हे ती प्रचाराची पातळी घसरलेली आहे. परिणामी भविष्यातील विधानसभा क्षेत्रातील सुजाण नागरिकात धास्ती निर्माण झाली आहे. नेत्यांच्या वैयक्तिक दोषांमुळे राजकीय पक्षांचे उमेदवार, ‘कोठे घेऊन जाणार मतदारसंघ माझा’, अशीच स्थिती सर्वसामान्य मतदारात निर्माण झाली आहे.विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर युती व आघाडी एकत्ररीत्या निवडणुकीला समोर जाणार असा सर्वच राजकीय विश्लेषकांचा अंदाज होता. मात्र मुख्यमंत्र्यांच्या पदाच्या लालसेने युती व आघाडी संपुष्टात आणून, सर्वच पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. यामुळे गेल्या अनेक वर्षापासून गळ्यात गळे घालणारे नेते परस्पराविरोधी उभे ठाकले आहेत. काहीही करुन आमदारकी हस्तगत करायची, या महत्त्वाकांक्षेने पछाडलेले सर्वच राजकीय पक्षांचे राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांपासून ते गल्लीगोबाळ्यातील नेतेही वैयक्तिक पातळीवर टीकाटिप्पणी करीत आहेत. बोलण्याची ढब, पेहराव, केशरचना याबाबत कुत्सीतपणे टर उडवली जात आहे. त्यांच्या टिपणींमुळे कार्यकर्त्याचे मनोरंजन होत असले तरी विकासाचे कोणतेच व्हीजन दिसत नाही.विधानसभा क्षेत्रातील मूळ समस्यांवर व मतदारांच्या हिताच्या बाबतीत समस्येला बगल दिली जात आहे. ब्रह्मपुरी-सावली, सिंदेवाही तालुक्यात विविध प्रश्न मार्गी लागल्यास येथील शेतकरी वर्ग सुजलाम सुफलाम होऊ शकतो. तालुक्यातील महत्त्वपूर्ण प्रश्न म्हणजे गोसीखुर्द कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. परंतु गोसीखुर्दच्या कामासाठी आतापर्यंत जो निधी मिळाला तो मी आणला आहे, असे बोलले जात आहे. पण त्यानंतरच्या पूर्णत्वास कामास लागणारी निधी कोण आणणार, हे मात्र उमेदवारांकडून सांगितले जात नाही. त्यामुळे केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम उमेदवारांकडून केले जात आहे. सर्वसामान्य मतदार गर्दीमध्ये हे सारे मूग गिळून ऐकूण घेताना दिसत आहे. हे विशेष.(प्रतिनिधी)