शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वैयक्तिक टीकेमुळे प्रचाराची पातळी घसरतेयं

By admin | Updated: October 8, 2014 23:24 IST

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली असून १५ दिवसांपूर्वी गुण्यागोविंदाने राहत असलेले सर्वच पक्ष सत्तेच्या हव्यासापोटी एकमेकांची उणी-दुणी काढत आहेत. एकमेकांवर चिखल फेकण्याचे

ब्रह्मपुरी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली असून १५ दिवसांपूर्वी गुण्यागोविंदाने राहत असलेले सर्वच पक्ष सत्तेच्या हव्यासापोटी एकमेकांची उणी-दुणी काढत आहेत. एकमेकांवर चिखल फेकण्याचे लोन सर्वच ठिकाणी दिसत असून साम, दाम, दंड आता प्रचारात सुरू झाला आहे.वैयक्तिक टिकाटिपणीमुळे कोणताही पक्ष भविष्यातील मतदारसंघाच्या ‘व्हिजन’बद्दल बोलताना दिसत नाही. नेत्यांच्या वैयक्तिक टीकेमुळे कधी नव्हे ती प्रचाराची पातळी घसरलेली आहे. परिणामी भविष्यातील विधानसभा क्षेत्रातील सुजाण नागरिकात धास्ती निर्माण झाली आहे. नेत्यांच्या वैयक्तिक दोषांमुळे राजकीय पक्षांचे उमेदवार, ‘कोठे घेऊन जाणार मतदारसंघ माझा’, अशीच स्थिती सर्वसामान्य मतदारात निर्माण झाली आहे.विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर युती व आघाडी एकत्ररीत्या निवडणुकीला समोर जाणार असा सर्वच राजकीय विश्लेषकांचा अंदाज होता. मात्र मुख्यमंत्र्यांच्या पदाच्या लालसेने युती व आघाडी संपुष्टात आणून, सर्वच पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. यामुळे गेल्या अनेक वर्षापासून गळ्यात गळे घालणारे नेते परस्पराविरोधी उभे ठाकले आहेत. काहीही करुन आमदारकी हस्तगत करायची, या महत्त्वाकांक्षेने पछाडलेले सर्वच राजकीय पक्षांचे राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांपासून ते गल्लीगोबाळ्यातील नेतेही वैयक्तिक पातळीवर टीकाटिप्पणी करीत आहेत. बोलण्याची ढब, पेहराव, केशरचना याबाबत कुत्सीतपणे टर उडवली जात आहे. त्यांच्या टिपणींमुळे कार्यकर्त्याचे मनोरंजन होत असले तरी विकासाचे कोणतेच व्हीजन दिसत नाही.विधानसभा क्षेत्रातील मूळ समस्यांवर व मतदारांच्या हिताच्या बाबतीत समस्येला बगल दिली जात आहे. ब्रह्मपुरी-सावली, सिंदेवाही तालुक्यात विविध प्रश्न मार्गी लागल्यास येथील शेतकरी वर्ग सुजलाम सुफलाम होऊ शकतो. तालुक्यातील महत्त्वपूर्ण प्रश्न म्हणजे गोसीखुर्द कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. परंतु गोसीखुर्दच्या कामासाठी आतापर्यंत जो निधी मिळाला तो मी आणला आहे, असे बोलले जात आहे. पण त्यानंतरच्या पूर्णत्वास कामास लागणारी निधी कोण आणणार, हे मात्र उमेदवारांकडून सांगितले जात नाही. त्यामुळे केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम उमेदवारांकडून केले जात आहे. सर्वसामान्य मतदार गर्दीमध्ये हे सारे मूग गिळून ऐकूण घेताना दिसत आहे. हे विशेष.(प्रतिनिधी)