शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
2
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
3
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
4
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
5
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
6
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
7
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
8
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
9
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
10
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
12
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
13
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
14
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
15
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
16
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
17
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
18
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
19
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
20
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद

सार्वजनिक शौचालये पाण्याअभावी वापराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:28 IST

देश स्वतंत्र होण्यापेक्षाही स्वच्छता अधिक महत्त्वाची आहे, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी सांगत होते.

ठळक मुद्देस्वच्छ भारत मिशन कागदावरच : प्रशासनाचा दावा फोल

आॅनलाईन लोकमतसिंदेवाही : देश स्वतंत्र होण्यापेक्षाही स्वच्छता अधिक महत्त्वाची आहे, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी सांगत होते. त्यामुळे खेडे व शहरे स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता अभियान राबविणे जात आहे. शासनाने गावागावात सार्वजनिक शौचालये ेबांधली. मात्र पाण्याअभावी ही शौचालये वापराविना असल्याचे वास्तव सिंदेवाही तालुक्याचे आहे.शासनाने २००३ पासून निर्मलग्राम योजना राबवून स्वच्छतेचे महत्त्व विषद केले. त्यावेळी निर्मलग्राम योजनेला लोकसहभाग पाहण्यासारखा होता. गावांनी स्वयंस्फूर्तीने निर्मलग्राम चळवळीत सहभाग नोंदवून पुरस्कार मिळविण्यासाठी स्पर्धाच केली होती. २००३ मध्ये तालुक्यातील बºयाच ग्रामपंचायती निर्मल ग्राम पुरस्काराने सन्मानित झाल्या. पुढे ही योजना बदलून स्वच्छता अभियानासाठी बºयाच योजना आल्या. सद्यस्थितीत स्वच्छ भारत मिशन अभियान सुरू आहे. पण या योजनेत लोकसहभाग नाममात्रच आहे. पाण्याचा अभाव यामुळे सार्वजनिक शौचालये नावाचीच ठरली असल्याचे दिसून येते.दारे, टाईल्स चोरीला; सभोवताल कचऱ्याचे साम्राज्यभुरट्या चोरट्यांनी अनेक शौचालयाची दारेच चोरून नेली आहेत. तर काही ठिकाणची सार्वजनिक शौचालये पाण्याअभावी अस्वच्छ आहेत. शौचालयाच्या भिंतीवर लावलेल्या टाईल्स् गायब झाल्या असून शौचालयाच्या सभोवताल कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे शौचालयाचा वापर करण्यास समाजमन तयार नाही. शौचालयाच्या वापरासाठी पाणी घरून नेण्यासाठी गावकरी तयार नाही. त्यामुळे शासनाचा खर्च व्यर्थ जात आहे.