शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

पाणी आणि स्वच्छता पार्कच्या माध्यमातून स्वच्छतेविषयी लोकजागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 00:39 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण देशात स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

सुधीर मुनगंटीवार : मूल येथे पाणी आणि स्वच्छता पार्कचा लोकार्पण सोहळा मूल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण देशात स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सर्वांना शुध्द पाणी मिळणे गरजेचे आहे. ग्रामीण भागाकरिता कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना आवश्यक असून शोष खडडे करून सांडपाण्याचा निचरा होणे गरजेचे आहे. पाणी आणि स्वच्छता पार्कच्या माध्यमातून या संदभार्तील मोहीम अधिक गतीमान होईल व त्या माध्यमातून लोकजागरण होत, या प्रक्रियेत चंद्रपूर जिल्हा अग्रेसर होईल, असा विश्वास राज्याचे वित्त व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषद चंद्रपूर द्वारा पंचायत समिती मूलच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या पाणी आणि स्वच्छता पार्कच्या लोकार्पण सोहळयात ना. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, उपाध्यक्ष कृष्णा सहारे, माजी जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, पंचायत समितीच्या सभापती पूजा डोहणे, उपसभापती चंदू मारगोनवार, नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज अवताडे, शितल बांबोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अशोक सिरसे, गटविकास अधिकारी प्रदिप पांढरबळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.मूल शहरात उभारण्यात आलेल्या या पाणी आणि स्वच्छता पार्कच्या माध्यमातून स्वच्छतेविषयी जनजागरण होतानाच पाण्याची साठवण आणि पाण्याचा वापर तसेच नियोजन याबाबत सुध्दा लोकजागरण होणार आहे. नागरिकांनी यासंदर्भात प्रशासनाला व शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी बोलताना केले. यावेळी ना. मुनगंटीवार यांनी पार्कची पाहणी केली. नांदेड पॅर्टन सोप पिट बॉयोगॅस टॉयलेट, घरगुती बाथरूम ओटा अशा विविध वैशिष्यपूर्ण मॉडेल्सच्या माध्यमातून या पार्कमध्ये स्वच्छतेविषयी संदेश देण्यात आले आहे. कार्यक्रमाला शहरातील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)