शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

घोडाझरी, आसोलामेंढा तलावाचे पाणी पिकांसाठी तातडीने द्या

By admin | Updated: September 26, 2015 00:57 IST

यंदा खरीपाच्या हंगामात पावसाने दगा दिल्यामुळे पाण्याअभावी सावली, सिंदेवाही, नागभीड तालुक्यातील धान, ....

धान पिकांचा प्रश्न : विजय वडेट्टीवार यांची मागणीचंद्रपूर : यंदा खरीपाच्या हंगामात पावसाने दगा दिल्यामुळे पाण्याअभावी सावली, सिंदेवाही, नागभीड तालुक्यातील धान, सोयाबिन या पिकांसह अनेक पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. चार दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस पडलेला असला तरी त्या पावसाने शेपिकांना पुरेसा पाणी होऊ शकत नाही. पाण्याअभावी शेतातील उभे पीक करपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे घोडाझरी तलावाचे पाणी २६ सप्टेंबरपासून आणि आसोलामेंढा तलावाचे पाणी २९ सप्टेंबरपासून सोडून सावली, सिंदेवाही, नागभीड तालुक्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी माजी राज्यमंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता सिंचाई विभाग चंद्रपूर यांना पाठविलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे.आमदार विजय वडेट्टीवार यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, यंदा खरीपाचा हंगाम सुरू होताच पाऊस पडल्यामुळे सावली, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीड या तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्ज काढून धान, सोयाबीन यासह अनेक पिकांची लागवड केली. परंतु पावसाने दगा दिल्यामुळे बी-बियाणे नष्ट झाले. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामासाठी दुबार, तिबार पेरणी करावी लागली. दरवर्षी पेक्षा यावर्षी धान आणि सोयाबिन या पिकाची पेरणी करण्याकरीता दुपट्टीने खर्च आलेला आहे. शेतीशिवाय दुसरे साधन नसल्यामुळे दिवसंरात्र एक करुन शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी जागली जात आहे. त्यामुळे घोडाझरी व आसोलामेंढा तलावाचे पाणी त्वरीत सोडून पिकांना जीवत देण्याची मागणी आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)