शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

धान पिकाचे तातडीने सर्वेक्षण करुन आर्थिक मदत द्या

By admin | Updated: November 20, 2014 22:50 IST

मूल सर्कलमधील राजोली सिंचाई शाखेअंतर्गत येणाऱ्या गोलाभूज तलावाच्या लाभ क्षेत्रातील गांगलवाडी, चिखली, ताडभूज या गावातील शेतकऱ्यांचे शेकडो हेक्टरवरील धानाचे पीक संपूर्णपणे उद्धवस्त झाले.

चंद्रपूर : मूल सर्कलमधील राजोली सिंचाई शाखेअंतर्गत येणाऱ्या गोलाभूज तलावाच्या लाभ क्षेत्रातील गांगलवाडी, चिखली, ताडभूज या गावातील शेतकऱ्यांचे शेकडो हेक्टरवरील धानाचे पीक संपूर्णपणे उद्धवस्त झाले. त्यामुळे प्रत्यक्ष मोक्यावर जावून सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाईकरीता शासनाकडे अहवाल सादर करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. आपदग्रस्त शेतकऱ्यांनी केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर तसेच राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही निवेदन सादर करुन नुकसानीचे तातडीने सर्व्हेक्षण करण्याची विनंती केली आहे. यंदा अपुऱ्या पावसामुळे गोलाभूज तलाव न भरला नाही. रोवणीनंतर केवळ एकदाच तलावातील पाणी काही मोजक्याच गावातील शेतकऱ्यांसाठी सोडण्यात आले. मात्र तलावात पुरेशे पाणी नसल्याची सबब पुढे करुन पाणी बंद करण्यात आले. त्यानंतर गावातील बहुतांश शेतकऱ्यांच्या धान पिकास सिंचनाची सोय न झाल्याने शेकडो हेक्टर शेतजमिनीमधील धानाचे पीक नष्ट झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना संकटाला तोंड द्यावे लागत आहे. मात्र, नुकसानीचे प्रत्यक्ष मोक्यावर जावून सर्व्हेक्षन होत नसल्याने रस्त्याच्या लगत असलेल्या जमिनीमधील पिकांना अपेक्षित धरुन संबंधित अधिकारी आणेवारी घोषित करीत आहेत. त्यामुळे नुकसान होवूनही अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.यावर्षीही शेतकऱ्यांवर दरवर्षीसारखा अन्याय होऊ नये, गोलाभूज तलावाच्या लाभ क्षेत्रातील ज्या शेतकऱ्यांची पिके उद्धवस्त झाली त्या पिकांची प्रत्यक्ष मोका चौकशी तातडीने करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने तहसीलदार मूल व संबंधित तलाठ्यांना देण्यात यावे, अशी मागणी गांगलवाडी ग्रामपंचायतचे सरपंच ताराबाई चांभारे, उपसरपंच शालिकराम चांभारे, श्रीहरी चांभारे, सोनबाजी केवे, विनोद चांभारे, विठ्ठल काटकर, आत्माराम चिचघरे, शामसुंदर कडस्कर, चिखलीचे सरपंच लहुजी कडस्कर, मुकूंदराव खोडपे, संपतराव जेंगठे तसेच अन्य गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)