शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

धान पिकाचे तातडीने सर्वेक्षण करुन आर्थिक मदत द्या

By admin | Updated: November 20, 2014 22:50 IST

मूल सर्कलमधील राजोली सिंचाई शाखेअंतर्गत येणाऱ्या गोलाभूज तलावाच्या लाभ क्षेत्रातील गांगलवाडी, चिखली, ताडभूज या गावातील शेतकऱ्यांचे शेकडो हेक्टरवरील धानाचे पीक संपूर्णपणे उद्धवस्त झाले.

चंद्रपूर : मूल सर्कलमधील राजोली सिंचाई शाखेअंतर्गत येणाऱ्या गोलाभूज तलावाच्या लाभ क्षेत्रातील गांगलवाडी, चिखली, ताडभूज या गावातील शेतकऱ्यांचे शेकडो हेक्टरवरील धानाचे पीक संपूर्णपणे उद्धवस्त झाले. त्यामुळे प्रत्यक्ष मोक्यावर जावून सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाईकरीता शासनाकडे अहवाल सादर करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. आपदग्रस्त शेतकऱ्यांनी केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर तसेच राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही निवेदन सादर करुन नुकसानीचे तातडीने सर्व्हेक्षण करण्याची विनंती केली आहे. यंदा अपुऱ्या पावसामुळे गोलाभूज तलाव न भरला नाही. रोवणीनंतर केवळ एकदाच तलावातील पाणी काही मोजक्याच गावातील शेतकऱ्यांसाठी सोडण्यात आले. मात्र तलावात पुरेशे पाणी नसल्याची सबब पुढे करुन पाणी बंद करण्यात आले. त्यानंतर गावातील बहुतांश शेतकऱ्यांच्या धान पिकास सिंचनाची सोय न झाल्याने शेकडो हेक्टर शेतजमिनीमधील धानाचे पीक नष्ट झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना संकटाला तोंड द्यावे लागत आहे. मात्र, नुकसानीचे प्रत्यक्ष मोक्यावर जावून सर्व्हेक्षन होत नसल्याने रस्त्याच्या लगत असलेल्या जमिनीमधील पिकांना अपेक्षित धरुन संबंधित अधिकारी आणेवारी घोषित करीत आहेत. त्यामुळे नुकसान होवूनही अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.यावर्षीही शेतकऱ्यांवर दरवर्षीसारखा अन्याय होऊ नये, गोलाभूज तलावाच्या लाभ क्षेत्रातील ज्या शेतकऱ्यांची पिके उद्धवस्त झाली त्या पिकांची प्रत्यक्ष मोका चौकशी तातडीने करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने तहसीलदार मूल व संबंधित तलाठ्यांना देण्यात यावे, अशी मागणी गांगलवाडी ग्रामपंचायतचे सरपंच ताराबाई चांभारे, उपसरपंच शालिकराम चांभारे, श्रीहरी चांभारे, सोनबाजी केवे, विनोद चांभारे, विठ्ठल काटकर, आत्माराम चिचघरे, शामसुंदर कडस्कर, चिखलीचे सरपंच लहुजी कडस्कर, मुकूंदराव खोडपे, संपतराव जेंगठे तसेच अन्य गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)