शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

धान पिकाचे तातडीने सर्वेक्षण करुन आर्थिक मदत द्या

By admin | Updated: November 20, 2014 22:50 IST

मूल सर्कलमधील राजोली सिंचाई शाखेअंतर्गत येणाऱ्या गोलाभूज तलावाच्या लाभ क्षेत्रातील गांगलवाडी, चिखली, ताडभूज या गावातील शेतकऱ्यांचे शेकडो हेक्टरवरील धानाचे पीक संपूर्णपणे उद्धवस्त झाले.

चंद्रपूर : मूल सर्कलमधील राजोली सिंचाई शाखेअंतर्गत येणाऱ्या गोलाभूज तलावाच्या लाभ क्षेत्रातील गांगलवाडी, चिखली, ताडभूज या गावातील शेतकऱ्यांचे शेकडो हेक्टरवरील धानाचे पीक संपूर्णपणे उद्धवस्त झाले. त्यामुळे प्रत्यक्ष मोक्यावर जावून सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाईकरीता शासनाकडे अहवाल सादर करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. आपदग्रस्त शेतकऱ्यांनी केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर तसेच राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही निवेदन सादर करुन नुकसानीचे तातडीने सर्व्हेक्षण करण्याची विनंती केली आहे. यंदा अपुऱ्या पावसामुळे गोलाभूज तलाव न भरला नाही. रोवणीनंतर केवळ एकदाच तलावातील पाणी काही मोजक्याच गावातील शेतकऱ्यांसाठी सोडण्यात आले. मात्र तलावात पुरेशे पाणी नसल्याची सबब पुढे करुन पाणी बंद करण्यात आले. त्यानंतर गावातील बहुतांश शेतकऱ्यांच्या धान पिकास सिंचनाची सोय न झाल्याने शेकडो हेक्टर शेतजमिनीमधील धानाचे पीक नष्ट झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना संकटाला तोंड द्यावे लागत आहे. मात्र, नुकसानीचे प्रत्यक्ष मोक्यावर जावून सर्व्हेक्षन होत नसल्याने रस्त्याच्या लगत असलेल्या जमिनीमधील पिकांना अपेक्षित धरुन संबंधित अधिकारी आणेवारी घोषित करीत आहेत. त्यामुळे नुकसान होवूनही अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.यावर्षीही शेतकऱ्यांवर दरवर्षीसारखा अन्याय होऊ नये, गोलाभूज तलावाच्या लाभ क्षेत्रातील ज्या शेतकऱ्यांची पिके उद्धवस्त झाली त्या पिकांची प्रत्यक्ष मोका चौकशी तातडीने करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने तहसीलदार मूल व संबंधित तलाठ्यांना देण्यात यावे, अशी मागणी गांगलवाडी ग्रामपंचायतचे सरपंच ताराबाई चांभारे, उपसरपंच शालिकराम चांभारे, श्रीहरी चांभारे, सोनबाजी केवे, विनोद चांभारे, विठ्ठल काटकर, आत्माराम चिचघरे, शामसुंदर कडस्कर, चिखलीचे सरपंच लहुजी कडस्कर, मुकूंदराव खोडपे, संपतराव जेंगठे तसेच अन्य गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)