शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

पिकांचे सर्वेक्षण करून तातडीने आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:31 IST

यंदा लांबलेल्या पावसामूळे खरीप पिकांवर आलेल्या संकटातून शेतकरी सावरत असतानाच अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : कृषिमंत्र्यांना पाठविले निवेदन

आॅनलाईन लोकमतब्रम्हपुरी: यंदा लांबलेल्या पावसामूळे खरीप पिकांवर आलेल्या संकटातून शेतकरी सावरत असतानाच अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान झाले. शिवाय, राज्यात ७ व्यक्तिंचा मृत्यू झाला. राज्य शासनाने तातडीने सर्वेक्षण करून भरपाई द्यावी, अशी मागणी विधीमंडळाचे उपगटनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे..विदर्भातील तूर, गहू, हरभरा, लाखोळी, ज्वारी, उडिद, मूग, संत्रा या पिकांसह अनेक पिके काढणीला आली आहेत. मात्र, अवकाळी पावसामूळे भुईसपाट झाले आहे. पाऊस व गारपिटीमूळे पिकांचे नकसान झाले असून शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकºयांना हेक्टरी सरसकट २५ हजार रुपये हेक्टरी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.यंदा लांबलेल्या पावसामूळे खरीप पिकांवर संकट आले. त्यातच किडी रोगांच्या प्रकोपाने खरीप हगांमातील नष्ट झालेले पिकामुळे शेतकरी पूर्णत: हवालदिल झाला. शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने रब्बी हंगामास सुरवात केली. परंतु, निसर्गाने दगा दिल्याने शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. विदर्भात तूर, गहू, हरभरा, लाखोळी, उडिद, मूग, ज्वारी, संत्रा, भाजीपाला आदी पिकांसह विविध पिकांची लागवड केली. पिके काढणीला आली आहेत. मात्र, दोन दिवसांपासून विदर्भासह राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली वादळी वाºयासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे. पावसाच्या तडाख्यात तूर, हरभरा, गहू, लाखोळी, मूग, ज्वारी,संत्रा, भाजीपाला ही पिके भुईसपाट झाली आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोडांशी आलेला घास वाया गेला. आंब्याचाही फुलोराही गळून पडला. खरीप आणि रब्बी पिकांच्या प्रंचड नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. आर्थिक संकटात सापडला. शेतकºयांना आधार देण्यासाठी अवकाळी पाऊस व गारपीटीमूळे नुकसान झालेल्या पिकांचे शासनाने तातडीने पंचनामे करावे. महसूल विभागाने विशेष पथक तयार करून राज्यातील सर्व जिल्ह्यांची पाहणी करावी, अशी मागणी आमदार वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.