शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 22:58 IST

सन २०१७ च्या खरीप हंगामात कापूस पिकावर बोंडअळी व धान पिकावर तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले़ शेतकरी कर्जबाजारी असून यंदाच्या हंगामाला पैसे नाहीत़ लागवडीकरीता बियाणे व खत खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ त्यामुळे तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी चंद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार खंडारे यांच्याकडे निवेदनातून केली आहे़

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : चंद्रपूर तहसीलदारांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सन २०१७ च्या खरीप हंगामात कापूस पिकावर बोंडअळी व धान पिकावर तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले़ शेतकरी कर्जबाजारी असून यंदाच्या हंगामाला पैसे नाहीत़ लागवडीकरीता बियाणे व खत खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ त्यामुळे तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी चंद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार खंडारे यांच्याकडे निवेदनातून केली आहे़चंद्रपूर तालुक्यातील बऱ्याच गावांमधील शेकडो शेतकऱ्यांचे पीक बोंडअळी व तुडतुडे रोगामुळे वाया गेले़ परंतु, मदत मिळाली नाही़ परिणामी, गुरुवारी जि़ प़ चे समाजकल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे यांच्या नेतृत्वात तहसीलदार खंडारे, यांची भेट घेवून शासनाच्या १७ मार्च २०१८ च्या निर्णयाची तातडीने अंमबजावणी करावी, अशी मागणी केली़ चंद्रपूर तालुक्यातील ३७९ शेतकऱ्यांच्या १९२.३१ हे.आर. जमिनीवरील धान पिकाचे नुकसान झाले़ नुकसानीकरिता १९ गावांतील बाधित शेतकºयांना १३ लाख ८ हजार रूपये, बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या २ हजार १४८ शेतकऱ्यांना २५९४.७९ रुपये मंजूर करण्यात आले़ २ हजार १४८ कापूस उत्पाद शेतकºयांचे २५९४.७९ हे.आर. क्षेत्रावर नुकसान झाले़ त्यांना १ कोटी ७६ लाख ५२ हजार रूपये मंजूर झाले आहे़ सध्या खरीप हंगाम सुरू झाला आहे़ शेतीच्या कामांसाठी पैशाची गरज आहे़ पण, निधी अजुनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाही़ कापूस व धान उत्पाद शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळाली असती तर खरीप हंगामातील आर्थिक अडचणी दूर झाल्या असत्या़ ही समस्या सोडविण्यासाठी महसूल विभागाकडे संबंधित शेतकऱ्यांनी वारंवार चकरा मारल्या़ पण, दखल घेण्यात आली नाही़ परिणामी यंदाचा हंगाम कसा करावा, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे़ शेतकºयांची आर्थिक कोंडी लक्षात घेवून रक्कम देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली़ यावेळी जिल्हा परिषदचे समाजकल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, नागाळाचे सरपंच शरद रणदिवे पिपरीचे सरपंच पिंपळकर, सुभाष पिंपळशेंडे, रंगराव पवार, अंजय्या गोपेल्लीवार, नरेश एल्कापेल्ली, प्रकाश येल्लरवार, उपसरपंच शेखर खांडारकर व तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते़