शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 22:58 IST

सन २०१७ च्या खरीप हंगामात कापूस पिकावर बोंडअळी व धान पिकावर तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले़ शेतकरी कर्जबाजारी असून यंदाच्या हंगामाला पैसे नाहीत़ लागवडीकरीता बियाणे व खत खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ त्यामुळे तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी चंद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार खंडारे यांच्याकडे निवेदनातून केली आहे़

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : चंद्रपूर तहसीलदारांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सन २०१७ च्या खरीप हंगामात कापूस पिकावर बोंडअळी व धान पिकावर तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले़ शेतकरी कर्जबाजारी असून यंदाच्या हंगामाला पैसे नाहीत़ लागवडीकरीता बियाणे व खत खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ त्यामुळे तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी चंद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार खंडारे यांच्याकडे निवेदनातून केली आहे़चंद्रपूर तालुक्यातील बऱ्याच गावांमधील शेकडो शेतकऱ्यांचे पीक बोंडअळी व तुडतुडे रोगामुळे वाया गेले़ परंतु, मदत मिळाली नाही़ परिणामी, गुरुवारी जि़ प़ चे समाजकल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे यांच्या नेतृत्वात तहसीलदार खंडारे, यांची भेट घेवून शासनाच्या १७ मार्च २०१८ च्या निर्णयाची तातडीने अंमबजावणी करावी, अशी मागणी केली़ चंद्रपूर तालुक्यातील ३७९ शेतकऱ्यांच्या १९२.३१ हे.आर. जमिनीवरील धान पिकाचे नुकसान झाले़ नुकसानीकरिता १९ गावांतील बाधित शेतकºयांना १३ लाख ८ हजार रूपये, बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या २ हजार १४८ शेतकऱ्यांना २५९४.७९ रुपये मंजूर करण्यात आले़ २ हजार १४८ कापूस उत्पाद शेतकºयांचे २५९४.७९ हे.आर. क्षेत्रावर नुकसान झाले़ त्यांना १ कोटी ७६ लाख ५२ हजार रूपये मंजूर झाले आहे़ सध्या खरीप हंगाम सुरू झाला आहे़ शेतीच्या कामांसाठी पैशाची गरज आहे़ पण, निधी अजुनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाही़ कापूस व धान उत्पाद शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळाली असती तर खरीप हंगामातील आर्थिक अडचणी दूर झाल्या असत्या़ ही समस्या सोडविण्यासाठी महसूल विभागाकडे संबंधित शेतकऱ्यांनी वारंवार चकरा मारल्या़ पण, दखल घेण्यात आली नाही़ परिणामी यंदाचा हंगाम कसा करावा, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे़ शेतकºयांची आर्थिक कोंडी लक्षात घेवून रक्कम देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली़ यावेळी जिल्हा परिषदचे समाजकल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, नागाळाचे सरपंच शरद रणदिवे पिपरीचे सरपंच पिंपळकर, सुभाष पिंपळशेंडे, रंगराव पवार, अंजय्या गोपेल्लीवार, नरेश एल्कापेल्ली, प्रकाश येल्लरवार, उपसरपंच शेखर खांडारकर व तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते़