शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 22:58 IST

सन २०१७ च्या खरीप हंगामात कापूस पिकावर बोंडअळी व धान पिकावर तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले़ शेतकरी कर्जबाजारी असून यंदाच्या हंगामाला पैसे नाहीत़ लागवडीकरीता बियाणे व खत खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ त्यामुळे तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी चंद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार खंडारे यांच्याकडे निवेदनातून केली आहे़

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : चंद्रपूर तहसीलदारांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सन २०१७ च्या खरीप हंगामात कापूस पिकावर बोंडअळी व धान पिकावर तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले़ शेतकरी कर्जबाजारी असून यंदाच्या हंगामाला पैसे नाहीत़ लागवडीकरीता बियाणे व खत खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ त्यामुळे तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी चंद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार खंडारे यांच्याकडे निवेदनातून केली आहे़चंद्रपूर तालुक्यातील बऱ्याच गावांमधील शेकडो शेतकऱ्यांचे पीक बोंडअळी व तुडतुडे रोगामुळे वाया गेले़ परंतु, मदत मिळाली नाही़ परिणामी, गुरुवारी जि़ प़ चे समाजकल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे यांच्या नेतृत्वात तहसीलदार खंडारे, यांची भेट घेवून शासनाच्या १७ मार्च २०१८ च्या निर्णयाची तातडीने अंमबजावणी करावी, अशी मागणी केली़ चंद्रपूर तालुक्यातील ३७९ शेतकऱ्यांच्या १९२.३१ हे.आर. जमिनीवरील धान पिकाचे नुकसान झाले़ नुकसानीकरिता १९ गावांतील बाधित शेतकºयांना १३ लाख ८ हजार रूपये, बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या २ हजार १४८ शेतकऱ्यांना २५९४.७९ रुपये मंजूर करण्यात आले़ २ हजार १४८ कापूस उत्पाद शेतकºयांचे २५९४.७९ हे.आर. क्षेत्रावर नुकसान झाले़ त्यांना १ कोटी ७६ लाख ५२ हजार रूपये मंजूर झाले आहे़ सध्या खरीप हंगाम सुरू झाला आहे़ शेतीच्या कामांसाठी पैशाची गरज आहे़ पण, निधी अजुनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाही़ कापूस व धान उत्पाद शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळाली असती तर खरीप हंगामातील आर्थिक अडचणी दूर झाल्या असत्या़ ही समस्या सोडविण्यासाठी महसूल विभागाकडे संबंधित शेतकऱ्यांनी वारंवार चकरा मारल्या़ पण, दखल घेण्यात आली नाही़ परिणामी यंदाचा हंगाम कसा करावा, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे़ शेतकºयांची आर्थिक कोंडी लक्षात घेवून रक्कम देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली़ यावेळी जिल्हा परिषदचे समाजकल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, नागाळाचे सरपंच शरद रणदिवे पिपरीचे सरपंच पिंपळकर, सुभाष पिंपळशेंडे, रंगराव पवार, अंजय्या गोपेल्लीवार, नरेश एल्कापेल्ली, प्रकाश येल्लरवार, उपसरपंच शेखर खांडारकर व तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते़