शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
5
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
6
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
7
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
8
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
9
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
10
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
11
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
12
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
13
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
14
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
15
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
16
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
17
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
18
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
19
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
20
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 22:58 IST

सन २०१७ च्या खरीप हंगामात कापूस पिकावर बोंडअळी व धान पिकावर तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले़ शेतकरी कर्जबाजारी असून यंदाच्या हंगामाला पैसे नाहीत़ लागवडीकरीता बियाणे व खत खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ त्यामुळे तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी चंद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार खंडारे यांच्याकडे निवेदनातून केली आहे़

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : चंद्रपूर तहसीलदारांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सन २०१७ च्या खरीप हंगामात कापूस पिकावर बोंडअळी व धान पिकावर तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले़ शेतकरी कर्जबाजारी असून यंदाच्या हंगामाला पैसे नाहीत़ लागवडीकरीता बियाणे व खत खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ त्यामुळे तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी चंद्रपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार खंडारे यांच्याकडे निवेदनातून केली आहे़चंद्रपूर तालुक्यातील बऱ्याच गावांमधील शेकडो शेतकऱ्यांचे पीक बोंडअळी व तुडतुडे रोगामुळे वाया गेले़ परंतु, मदत मिळाली नाही़ परिणामी, गुरुवारी जि़ प़ चे समाजकल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे यांच्या नेतृत्वात तहसीलदार खंडारे, यांची भेट घेवून शासनाच्या १७ मार्च २०१८ च्या निर्णयाची तातडीने अंमबजावणी करावी, अशी मागणी केली़ चंद्रपूर तालुक्यातील ३७९ शेतकऱ्यांच्या १९२.३१ हे.आर. जमिनीवरील धान पिकाचे नुकसान झाले़ नुकसानीकरिता १९ गावांतील बाधित शेतकºयांना १३ लाख ८ हजार रूपये, बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या २ हजार १४८ शेतकऱ्यांना २५९४.७९ रुपये मंजूर करण्यात आले़ २ हजार १४८ कापूस उत्पाद शेतकºयांचे २५९४.७९ हे.आर. क्षेत्रावर नुकसान झाले़ त्यांना १ कोटी ७६ लाख ५२ हजार रूपये मंजूर झाले आहे़ सध्या खरीप हंगाम सुरू झाला आहे़ शेतीच्या कामांसाठी पैशाची गरज आहे़ पण, निधी अजुनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले नाही़ कापूस व धान उत्पाद शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळाली असती तर खरीप हंगामातील आर्थिक अडचणी दूर झाल्या असत्या़ ही समस्या सोडविण्यासाठी महसूल विभागाकडे संबंधित शेतकऱ्यांनी वारंवार चकरा मारल्या़ पण, दखल घेण्यात आली नाही़ परिणामी यंदाचा हंगाम कसा करावा, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे़ शेतकºयांची आर्थिक कोंडी लक्षात घेवून रक्कम देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली़ यावेळी जिल्हा परिषदचे समाजकल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, नागाळाचे सरपंच शरद रणदिवे पिपरीचे सरपंच पिंपळकर, सुभाष पिंपळशेंडे, रंगराव पवार, अंजय्या गोपेल्लीवार, नरेश एल्कापेल्ली, प्रकाश येल्लरवार, उपसरपंच शेखर खांडारकर व तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते़