शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सीटीपीएससमोर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 23:55 IST

विदर्भ क्षेत्र सर्वच बाबतीत संपन्न असताना ५७ वर्षे महाराष्ट्रात राहून राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे शेती, उद्योग, व्यापार, वीज, सिंचन, रोजगार, कल्याणकारी व लाभाच्या योजना या सर्वच क्षेत्रात मोठे शोषण झाले आहे.

ठळक मुद्देसंघर्षासाठी तरुणांनी पुढे यावे : वामनराव चटप यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विदर्भ क्षेत्र सर्वच बाबतीत संपन्न असताना ५७ वर्षे महाराष्ट्रात राहून राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे शेती, उद्योग, व्यापार, वीज, सिंचन, रोजगार, कल्याणकारी व लाभाच्या योजना या सर्वच क्षेत्रात मोठे शोषण झाले आहे. आता आपल्यावरील अन्यायाविरुद्ध वैदर्भीय जनतेने आणि आपल्या न्याय हक्कासाठी तरुणांनी पुढे येऊन संघर्षाचे बिगुल फुंकावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जेष्ठ नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केले.चंद्रपूर औष्णिक वीज केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारापुढे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे व आदी मागण्यांसाठी बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप बोलत होते. शेतकºयांना संपुर्ण कर्जमुक्ती मिळावी, शेतमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा, अशी पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या घोषणेची पुर्तता करावी, विजेचा दर निम्मे करावे, भारनियमन बंद करावे, विदर्भातील कोळशावर आधारीत नवीन १३२ वीज प्रकल्पाची मान्यता रद्द करावी, महिलांवरील माईक्रोफायनान्सचे कर्ज संपवावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.यावेळी विधानसभेचे माजी उपसभापती अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, संयोजक राम नेवले, माजी मंत्री डॉ. रमेश गजबे, किशोर पोतनवार, हिराचंद बोरकुटे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, अरुण केदार, पुरुषोत्तम पाटील, अयुबभाई कच्छी, रफिक रंगरेज, मितीन भागवत, अनिल ठाकुरवार, अ‍ॅड. अरुण धोटे, प्रभाकर दिवे, निळकंठ कोरांगे, मसुद अहमद, राजेंद्र झोटींग, रंजना मामर्डे, राजश्री झोटींग यांच्यासह अनेक नेते व्यासपिठावर उपस्थित होते.यावेळी बोलताना अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले म्हणाले, स्वतंत्र विदर्भ झाल्यास सक्षम आणि स्वयंपुर्ण स्वतंत्र राज्य निर्माण होणार आहे. राम नेवले म्हणाले, गेली ५७ वर्ष विदर्भ महाराष्ट्रात राहून आणि सोन्याची कोंबडी समजली जाणारी मुंबई सोबत असूनही विदभार्चा विकास का झाला नाही, असा प्रश्न उपस्थित केला.अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या दुटप्पी धोरणाचा निषेध नोंदविला. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.