शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
2
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
3
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
4
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
5
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
6
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
7
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
8
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
9
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
10
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
11
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
12
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
13
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण
14
Upcoming IPO: २१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
15
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
16
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
स्पाय कॅमेरा, ७४ तरुणींचे व्हिडिओ, खाजगी एअरलाइन्समधील पायलटचं धक्कादायक कृत्य, असं फुटलं बिंग   
19
तिला फोटोशूटसाठी भारतात पाठवण्यास राजी नाही पाकिस्तान; वर्ल्ड कप आधी घेतला मोठा निर्णय
20
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला

घोषणाबाज सरकारच्या विरोधात रस्त्यावर या!

By admin | Updated: August 30, 2016 00:48 IST

केंद्रात आणि राज्यात असलेले भाजप सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले असून गेल्या अडीच वर्षांमध्ये ते घोषणा देण्यापलिकडे काहीच करू शकले नाही.

जयंत पाटील : राज्यातील जनतेला आता राष्ट्रवादी हा पर्यायभद्रावती : केंद्रात आणि राज्यात असलेले भाजप सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले असून गेल्या अडीच वर्षांमध्ये ते घोषणा देण्यापलिकडे काहीच करू शकले नाही. अशा घोषणाबाज सरकारविरोधात आंदोलनाच्या माध्यमातून सरकारची निष्क्रियता लोकांच्या नजरेत आणून द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री जयंत पाटील यांनी केले.स्थानिक अभिषेक मंगल कार्यालयात राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पाटील बोलत होते. भाजप सरकारच्या कारकिर्दीत शेतकरी व सामान्य माणूस भरडला जात असून आता राज्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिला नसल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचे कार्य तळागाळापर्यंत पोहचवावे, असेही आवाहन पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.याप्रसंगी मंचावर माजी मंत्री अनिल देशमुख, अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, बाबासाहेब वासाडे, राजेंद्र वैद्य, संदीप गड्डमवार, नितीन भटारकर, मुनाज शेख, शशिकांत देशकर, दीपक जयस्वाल, नितीन नेरकर, सुधाकर रोहणकर, राजेश मत्ते, प्रशांत काळे, सुजीत उपरे, अमोल ठाकरे, महिला राकाँ जिल्हाध्यक्ष बेबी उईके, ज्योती रंगारी आदी उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तरुणांना अत्यंत महत्त्व प्राप्त होणार असून राष्ट्रवादीच्या तरुण कार्यकर्त्यांनी कंबर कसून सज्ज राहावे, असे अनिल देशमुख म्हणाले.सदर कार्यक्रमाला १५ तालुक्यातील राष्ट्रवादी युवक पक्षाचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन संजय ठाकूर यांनी तर आभार मुनाज शेख यांनी मानले. यानिमित्ताने उपस्थित युवकांना विविध विषयांवर मार्गदर्शन केलेल्या प्रा. विवेक सरपटवार व बळीराज धोटे यांना संविधानाच्या प्रतिमा देऊन जयंत पाटील व अनिल देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन नितीन भटारकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मनोज कायरकर, भुपेश वादले, अमोल बडगे, सैयद अनवर, गौरव नंदुरकर, रोहण खुटेमाटे, मंगेश पोटवार, आदित्य भट, दिलीप पिट्टलवार, सिनू गोस्कृल्ला, गुरुदेव जुनघरे, किशोर पडवे, अनुराज चटप, आदित्य भाके, नागेश ईटकर आदींनी अथक परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)बेरोजगारांची क्रूर थट्टा सुरूमाजी मंत्री अनिल देशमुख म्हणाले की, शेती क्षेत्रात हे सरकार पूर्णपणे फसले असून या अडीच वर्षांत शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. त्याचप्रमाणे अडीच वर्षांत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करू, अशा थापा मारणाऱ्या भाजप सरकारने त्यांच्या कारकिर्दीत बेरोजगारांची क्रूर थट्टाच केली आहे.त्यामुळे भाजप आता तोंडघशी पडला असून जनतेमध्ये आता स्थान राहिले नाही.