शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी येथे लोकसहभागातून शाळेची संरक्षण भिंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:25 IST

आर्वी गावाला आदर्श गाव घडवण्यासाठी संपूर्ण नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे, गावात लोकसहभागातून शाळेची संरक्षण भिंत बांधकाम, रस्त्याच्या ...

आर्वी गावाला आदर्श गाव घडवण्यासाठी संपूर्ण नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे, गावात लोकसहभागातून शाळेची संरक्षण भिंत बांधकाम, रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करणे, पांदन रस्ते स्वच्छ करणे, महिलांच्या सबलीकरणासाठी मार्गदर्शन मेळावा घेणे, शेती संबंधी मार्गदर्शन शिबिर राबविणे यासह अन्य उपक्रम सरपंच महासंघ अंतर्गत सुरु आहे.

गावातील नागरिकांनी ग्रामस्वच्छतेचा वसा उचललेला असून दररोज सकाळी गावातील रस्ते झाडून स्वच्छ करीत आहे. यात मोठ्याप्रमाणात गावातील युवक, युवती, महिला व पुरुष सहभागी होत असून गावच्या सरपंच शालू लांडे, उपसरपंच सुभाष काटवले, ग्रामसेवक जयश्री चंदनखेडे, सदस्य

वंदना मुसळे, सुवर्णा महाकुलकर, सुरेखा रामटेके, उषा उपरे, तानेबाई कोहपरे, मारोती महाकुलकर, भास्कर डोंगे, बंडू आईलवार यासह संपूर्ण आर्वीवासीय सहकार्य करीत आहे.