शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
2
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
3
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
4
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
5
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
6
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
7
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
8
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
9
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
10
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
11
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
12
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
13
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
14
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
15
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
16
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
17
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
18
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
19
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
20
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले

जीर्ण इमारतींना मनपाचाच टेकू

By admin | Updated: June 21, 2014 01:23 IST

पावसाळ्यात अनेक इमारती, घरे कोसळून वित्तहानी व एखाद्यावेळी जिवित हानीसुध्दा होते.

  रवी जवळे चंद्रपूर

पावसाळ्यात अनेक इमारती, घरे कोसळून वित्तहानी व एखाद्यावेळी जिवित हानीसुध्दा होते. त्यामुळे जीर्ण व खिळखिळ्या इमारतींना पडण्याआधीच पाडून टाकण्याचा शासकीय संकेत आहे. ही जबाबदारी नगरपालिका, महानगरपालिकांना दिली आहे. मात्र चंद्रपूर महानगरपालिकेला शहरातील धोकादायक इमारतींचा मागील काही वर्षांपासून विसर पडला आहे. त्यामुळे या इमारतींना जणू मनपा स्वत:च टेकू देत असावी, अशी शंका येते. परिणामी शहरात अनेक धोकादायक इमारती अजून उभ्याच आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. पावसाळ्यात वादळी वारा सुटतो. कधी चक्रीवादळाची स्थितीही निर्माण होते. अशावेळी मोठ्या प्रमाणात घरांची पडझड होते. याशिवाय सततच्या पावसामुळे घरे पडतात. यातील बहुतांश घरे व इमारती जीर्ण, खिळखिळी झालेली असतात, हे अनेकवेळा स्पष्ट झाले आहेत. अवेळी इमारती पडल्यामुळे वित्त हानी तर होतेच; शिवाय जिवित हानीदेखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे महानगरपालिकेच्या अ‍ॅक्टमध्ये अशा धोकादायक इमारतींना पडण्याआधीच पाडण्याची तरतूद केली आहे. या अ‍ॅक्टनुसार आधी शहरातील घरे व इमारतींचे सर्र्वेक्षण केले जाते. त्यानंतर धोकादायक इमारतींची नोंद केली जाते. अशा धोकादायक इमारतींच्या मालकांना ‘तुमची इमारत जीर्ण असून ती स्वत:च पाडून टाकावी, अशा आशयाची रितसर नोटीस बजावली जाते. या प्रक्रियेसाठी काही महिन्यांचा कालावधी दिला जातो. त्यानंतर आणखी रिमायंडर नोटीस पाठविली जाते. एवढे करूनही इमारतमालकांनी इमारत पाडली नाही तर महानगरपालिकेला स्वत: अशी इमारत पाडावी लागते. चंद्रपूर शहराची लोकसंख्या पावणेचार लाखांच्या घरात पोहचली आहे. या महानगरात एकूण ६४ वॉर्ड आहेत. या वॉर्डातून एखाद्याने फेरफटका मारला तर अनेक घरे व इमारती जीर्ण झालेल्या दिसून येतील. अनेक इमारती तर अर्ध्या पडलेल्या अवस्थेत आहेत. तरीही त्याकडे गांभीर्याने बघितले जात नाही. उगाच पैशांच्या खर्च म्हणून घरमालक जीर्ण घर पाडण्याच्या फंदात पडत नाही. काही जण घर पाडले तर जायचे कुठे, या विवंचनेत जीर्ण घरातच संसाराचा गाडा हाकत आहे. त्यामुळे या इमारतीतशाच उभ्या आहेत. सुदैवाने ही घरे पडली नाहीत. मात्र प्रत्येकवर्षी सुदैव पाठिशीही राहीलच याची हमी नाही. त्यामुळे ही बाब निदान महानगरपालिकेने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मात्र मागील अनेक वर्षापासून मनपा याबाबत गंभीर झालेले दिसत नाही. चंद्रपुरात या संदर्भात मनपाच्या पथकाने सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणातून त्यांना केवळ सहा ते सात इमारतीच जीर्ण व धोकादायक दिसून आल्या. त्यामुळे या इमारत मालकांना नोटीस बजावून मनपा प्रशासन स्वस्थ बसले आहे. नोटीस बजावण्यापलिकडे मनपाने यासंदर्भात आजवर कोणतेच पाऊल उचललेले नाही. त्यामुळे जीर्ण इमारती सध्या धोक्याची घंटा वाजवत तशाच उभ्या आहेत.