शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

जीर्ण इमारतींना मनपाचाच टेकू

By admin | Updated: June 21, 2014 01:23 IST

पावसाळ्यात अनेक इमारती, घरे कोसळून वित्तहानी व एखाद्यावेळी जिवित हानीसुध्दा होते.

  रवी जवळे चंद्रपूर

पावसाळ्यात अनेक इमारती, घरे कोसळून वित्तहानी व एखाद्यावेळी जिवित हानीसुध्दा होते. त्यामुळे जीर्ण व खिळखिळ्या इमारतींना पडण्याआधीच पाडून टाकण्याचा शासकीय संकेत आहे. ही जबाबदारी नगरपालिका, महानगरपालिकांना दिली आहे. मात्र चंद्रपूर महानगरपालिकेला शहरातील धोकादायक इमारतींचा मागील काही वर्षांपासून विसर पडला आहे. त्यामुळे या इमारतींना जणू मनपा स्वत:च टेकू देत असावी, अशी शंका येते. परिणामी शहरात अनेक धोकादायक इमारती अजून उभ्याच आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. पावसाळ्यात वादळी वारा सुटतो. कधी चक्रीवादळाची स्थितीही निर्माण होते. अशावेळी मोठ्या प्रमाणात घरांची पडझड होते. याशिवाय सततच्या पावसामुळे घरे पडतात. यातील बहुतांश घरे व इमारती जीर्ण, खिळखिळी झालेली असतात, हे अनेकवेळा स्पष्ट झाले आहेत. अवेळी इमारती पडल्यामुळे वित्त हानी तर होतेच; शिवाय जिवित हानीदेखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे महानगरपालिकेच्या अ‍ॅक्टमध्ये अशा धोकादायक इमारतींना पडण्याआधीच पाडण्याची तरतूद केली आहे. या अ‍ॅक्टनुसार आधी शहरातील घरे व इमारतींचे सर्र्वेक्षण केले जाते. त्यानंतर धोकादायक इमारतींची नोंद केली जाते. अशा धोकादायक इमारतींच्या मालकांना ‘तुमची इमारत जीर्ण असून ती स्वत:च पाडून टाकावी, अशा आशयाची रितसर नोटीस बजावली जाते. या प्रक्रियेसाठी काही महिन्यांचा कालावधी दिला जातो. त्यानंतर आणखी रिमायंडर नोटीस पाठविली जाते. एवढे करूनही इमारतमालकांनी इमारत पाडली नाही तर महानगरपालिकेला स्वत: अशी इमारत पाडावी लागते. चंद्रपूर शहराची लोकसंख्या पावणेचार लाखांच्या घरात पोहचली आहे. या महानगरात एकूण ६४ वॉर्ड आहेत. या वॉर्डातून एखाद्याने फेरफटका मारला तर अनेक घरे व इमारती जीर्ण झालेल्या दिसून येतील. अनेक इमारती तर अर्ध्या पडलेल्या अवस्थेत आहेत. तरीही त्याकडे गांभीर्याने बघितले जात नाही. उगाच पैशांच्या खर्च म्हणून घरमालक जीर्ण घर पाडण्याच्या फंदात पडत नाही. काही जण घर पाडले तर जायचे कुठे, या विवंचनेत जीर्ण घरातच संसाराचा गाडा हाकत आहे. त्यामुळे या इमारतीतशाच उभ्या आहेत. सुदैवाने ही घरे पडली नाहीत. मात्र प्रत्येकवर्षी सुदैव पाठिशीही राहीलच याची हमी नाही. त्यामुळे ही बाब निदान महानगरपालिकेने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मात्र मागील अनेक वर्षापासून मनपा याबाबत गंभीर झालेले दिसत नाही. चंद्रपुरात या संदर्भात मनपाच्या पथकाने सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणातून त्यांना केवळ सहा ते सात इमारतीच जीर्ण व धोकादायक दिसून आल्या. त्यामुळे या इमारत मालकांना नोटीस बजावून मनपा प्रशासन स्वस्थ बसले आहे. नोटीस बजावण्यापलिकडे मनपाने यासंदर्भात आजवर कोणतेच पाऊल उचललेले नाही. त्यामुळे जीर्ण इमारती सध्या धोक्याची घंटा वाजवत तशाच उभ्या आहेत.